शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पुनर्वसन केल्याशिवाय झोपड्या हटवू नका

By admin | Updated: June 12, 2015 00:43 IST

फासेपारधी कुटुंबीयांचे आंदोलन : इचलकरंजी नगरपालिकेसमोरच पेटविल्या चुली

इचलकरंजी : झोपडपट्टी हटवून त्याठिकाणी बाजारकट्टा बांधण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींचा निषेध करत नगरपालिकेच्या प्रवेशद्वारातच चुली पेटवून तेथे वास्तव्यास असलेल्या फासेपारधी समाजातील कुटुंबीयांनी गुरूवारी आंदोलन केले. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांबरोबर त्यांची शाब्दिक चकमकही उडाली. अखेर नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी पुनर्वसन केल्याशिवाय झोपड्या हलविल्या जाणार नाहीत, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी माघार घेतली.येथील स्वामी मळा परिसरात पालिकेच्या मालकीची ३४ गुंठे जमीन आहे. तेथे १९८७-८८ सालापासून फासेपारधी समाजातील वीस कुटुंबे झोपड्या बांधून राहत होते. काही वर्षांपूर्वी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई करून नऊ झोपड्या हटविल्या. मात्र, तेथे अद्यापही अकराच झोपड्या आहेत. झोपड्या हटविताना समाजातील नागरिकांनी आंदोलन केले. त्यावेळी तत्कालीन मुख्याधिकारी नितीन देसाई यांनी पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ठरावही करण्यात आला. मात्र, नगरपालिकेच्यावतीने अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या जागेवर बाजार कट्ट्याचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे तेथे आमदार निधीतून बाजार कट्टा बांधण्यासाठी २३ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर बाजार कट्टा बांधण्याच्या हालचाली गतिमान झाल्या. त्यासाठी तेथील झोपडपट्ट्या हटविणे गरजेचे आहे. याची कुणकुण लागल्याने फासेपारधी कुटुंबीयांनी जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत नगरपालिकेसमोरच चूली पेटवू, असा इशारा दिला. त्याप्रमाणे गुरूवारी आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मोहन काळे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर असलेल्या जागेत कुटुंबीयांनी चुली पेटवून स्वयंपाक करण्यास सुरूवात केली. आंदोलनात महिला, मुले व वृद्ध या सर्वांनी भाग घेऊन ठिय्या मारला. त्याचबरोबर प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे काही काळ चांगलाच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्याबरोबरही आंदोलकांची शाब्दिक चकमक उडाली.नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, पाणीपुरवठा सभापती रवी रजपुते आणि अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी आंदोलकांची भेट घेतली. काळे यांनी समाजाच्या अडचणी मांडल्या. त्या ऐकून घेऊन नगराध्यक्षा बिरंजे यांनी या जागेवरील सर्वच कुटुंबांचे पुनर्वसन केल्याशिवाय झोपड्या हटविल्या जाणार नाहीत. प्रत्येकाला साईट नंबर १०२ मध्ये हक्काची जागा देण्यात येईल, असे आश्वासन दिले. आश्वासनानंतर आंदोलकांनी तयार केलेले जेवण तेथेच जेऊन आंदोलन मागे घेतले. आंदोलनात शंकर चव्हाण, सावंता चव्हाण, सिकंदर काळे, गोपाळ काळे यांच्यासह समाजातील नागरिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)