शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

छत्रपती शिवाजी महाराजांना देव करू नका

By admin | Updated: June 1, 2017 00:45 IST

आनंद पाटील : शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेचा प्रारंभ, अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टतर्फे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आणि प्रतिमेचा वापर केवळ स्वार्थासाठी केला जात आहे. लढाई, मुत्सद्देगिरी, व्यवस्थापन कौशल्य आणि रयतेचा विश्वास या जोरावर महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. मात्र आता त्यांना देवपण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा मिथकांवर विश्वास न ठेवता महाराजांच्या कार्याची प्रेरणा पिढ्यान्पिढ्या मिळण्यासाठी त्यांना देव करू नका, असे आवाहन प्रा. डॉ. आनंद पाटील यांनी केले. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीने बुधवारपासून शिवराज्याभिषेक व्याख्यानमालेला प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी ‘महाराष्ट्राला माहीत नसलेले छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. यावेळी माजी आमदार राजीव आवळे, अशोक देशमुख, शैलजा भोसले, रामचंद्र यादव उपस्थित होते. पाटील म्हणाले, शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य आणि गरीब जनतेला सोबत घेऊन स्वराज्याचा संकल्प केला. सैन्यातील अधिकारी व मावळे निवडताना त्यांनी केवळ गुणवत्तेला प्राधान्य दिले. माणसांची जात, धर्म, वंश पाहिला नाही. म्हणूनच त्यांच्या ३३ सुरक्षारक्षकांपैकी ११ सुरक्षारक्षक हे मुस्लिम समाजाचे होते. समोर हजारोंच्या संख्येने शत्रुसेना असतानाही शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांच्या जोरावर लढाया जिंकल्या याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपला राजा स्वत: स्वराज्यासाठी लढतोय, हे पाहून मावळ्यांनाही स्फूरण चढायचे. महाराजांनी मुत्सद्देगिरीने शत्रूला नामोहरम केले. ते म्हणाले, सांस्कृतिक सत्ता ही राजसत्तेपेक्षा प्रबल असते. आपल्याकडे इतिहासाची माहिती सांगणारी साधने जपली गेली नाहीत; त्यामुळे लिहिता-वाचता येणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या सोयीने इतिहास लिहिला. आपल्याला अनेकदा शिवाजी महाराजांचा खोटाच इतिहास सांगितला गेला. मिथकं आणि इतिहासामध्ये पुसटशी रेषा असते. मिथकांवर विश्वास ठेवला की आपण गुलाम होतो आणि खरा इतिहास अंधारातच राहतो. या मिथकांनी शिवाजी महाराजांना देवपण देण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेमागील भूमिका विशद केली. आजचे व्याख्यानविषय : छत्रपती शिवाजी महाराज : प्रतिमा व राजकीय व्यवहार. वक्ते : प्रा. डॉ. प्रकाश पवार