शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

परीक्षाकाळात पाल्यांना घराचा तुरुंग नको !

By admin | Updated: February 27, 2017 23:32 IST

अभ्यासाचा तणाव टाळावा : मोकळ्या वातावरणात वावरल्याने मुलांच्या मेंदूला चालना; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

दहावी आणि बारावी ही शैक्षणिक वर्षे आता युद्धसदृश भासू लागली आहेत. मुलांच्या करिअरची अतोनात काळजी करणाऱ्या काही पालकांनी तर एक महिन्यापासून त्यांच्या मुलांना घरात नजरकैदेत ठेवले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ‘गेलेली वेळ भरून येणार नाही’ असा गर्भित इशारा देऊन अक्षरश: मुलांचा मानसिक छळ सुरू केला आहे. परीक्षाकाळात मुलांच्या कलाने वागणं सर्वांसाठी हिताचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. संध्याकाळचा किमान एक ते दीड तास अभ्यासाव्यतिरिक्त मोकळ्या वातावरणात मुलांनी जाणं हे त्यांच्या मेंदूला चालना देणारे ठरते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.मुलांची परीक्षा जवळ आली की, टीव्ही बंद करणं, मुलांचे खेळ बंद करणं, त्याला घराबाहेर पडू न देणं, अशा गोष्टी पालकांकडून सर्रास केल्या जातात. यामुळे मुलांवर परीक्षांचा अनावश्यक ताण पडतो हे पालकांच्या लक्षातच येत नाही. संध्याकाळचा एक ते दीड तास त्यांनी अभ्यासाशिवाय घालवणं, मैदानी खेळ खेळणं यात काही गैर नाही उलट यामुळे त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचा चांगला परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो. मित्र-मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी बोलून त्यांचा ताण हलका होत असेल तर त्यांना तसंही करू द्यावं. शिवाय नुसतं पडून त्यांना टीव्ही पाहावा, असं वाटत असेल तर तोही पाहू देण्याची मुभा पालकांनी विनाकटकट द्यावी. परीक्षेच्या काळात टीव्ही वगैरे बंद ठेवण्याची गरज नाही. फक्त त्यांना टीव्ही नेहमीपेक्षा मर्यादित काळापुरता पाहू द्यावा. घरात अभ्यासाशिवाय दुसरी काही चर्चाच नको, असं वातावरण ठेवू नये. तसेच नाष्ट्याच्या वेळेस, जेवणाच्या वेळेस हलक्या-फुलक्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारून वातावरणातील ताण निवळावा. एकूणच काय तर मुलांच्या परीक्षांच्या काळात घराचा तुरुंग होणार नाही याची दक्षता पालकांनी घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)काय करू नये !सकाळी उठल्याबरोबर परीक्षा तोंडावर आली आहे आणि यांना झोपायचे सुचते, असं म्हणू नये. चहा-नाष्टा झाल्याबरोबर लगेच ‘चला आवरा आता, कालची रिव्हीजन करा,’ असं म्हणणं टाळावं. जेवताना अभ्यासाचा विषय टाळावा. शेजारचा मुलगा/मुलगी किती वाजता उठतो/उठते हे वारंवार सांगू नये. लावलेल्या ट्यूशन क्लासच्या फीचा आकडा, आई-वडिलांनी घेतलेले कष्ट हे दिवसभर उठता-बसता सांगू नये. मुलगा/मुलगी टीव्ही समोर थोडा वेळ बसल्यास त्यांच्यासमोर डोळे मोठे करून येरझाऱ्या घालू नयेत. मुलाला/मुलीला रात्री अभ्यास करताना झोप येत असल्यास ‘मी दहावीत/बारावीत असताना पहाटे तीन वाजेपर्यंत अभ्यास करत होतो,’ असं खोटं सांगू नये. थोडा वेळ मुलांनी मोबाईल हातात घेतला तर हिसकावून घेऊ नये.दिवसभर अभ्यासाचा जप टाळावा.मुलांनी काय खावं, काय टाळावं?या काळात काही मुलांना खूप भूक लागते, तर काही मुलं काहीच खात नाही. ही दोन्ही त्यांच्यावरील अतिताणाची लक्षणं आहे. त्यापेक्षा अभ्यासाच्या वेळेत त्यांना विशिष्ट अंतरानं खायला द्यावं. दिवसातून दोनच वेळा मुलांना पोटभर जेवायला न देता चारवेळा विभागून थोडं-थोडं खायला द्यावं. मधल्या वेळेच्या खाण्यात त्यांना फळं, सुकामेवा खाण्यास द्यावा. परीक्षेला जाण्याआधी त्यांना लिंबू सरबत द्यावं. परीक्षेवरून आल्यावर त्यांना धपाटे, धिरडे असा थोडा चटकदार खाऊ दिला तरी चालेल. प्रथिनं असलेला आहार मुलांना द्यावा.मुलं पहाटे लवकर उठून अभ्यासाला बसत असतील तर पहाटे उठल्यावर त्यांना नुसताच चहा किंवा दूध देऊ नये. त्याबरोबर फळे किंवा सुकामेवा द्यावा. हे दोन्ही नसतील तर पोळी किंवा बिस्किटं पण चालतील. तसेच मुलं रात्री अकरानंतर जर अभ्यास करत असतील तर रात्री नुसताच चहा न देता थोडं खायलाही द्यावं. नुसत्या चहानं मुलांना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते. मुलांना परीक्षेच्या काळात बाहेरचं किंवा जंक फूड, फास्ट फूड देऊ नये. आपल्या हातानं बनवलेलं ताजं-ताजं मुलांना खायला द्यावं.परीक्षेचा काळ म्हणजे भर उन्हाळ्याचा काळ असतो. त्यांच्या शरीरात पुरेसं पाणी जाण्याची आवश्यकता असते. तेव्हा थोड्या-थोड्या वेळानं त्यांना पाणी प्यायला द्यावं. मधून-मधून सरबत द्यावा. फळांचे ज्यूस देऊ नयेत त्यापेक्षा लिंबाच्या सरबताला प्राधान्य द्यावं.पालकांनो, परीक्षेच्या काळात मुलांना तुमच्याकडून शिस्तीची, सूचनांची किंवा तुमच्या सहानुभूतीची नव्हे, तर तुमच्या सहकार्याची, संवादाची गरज असते. तसेच आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करत बसू नका. त्यांना प्रेमानं सहकार्य करा. त्यांच्यातील गुणांची, क्षमतांची, त्यांच्यातील ताकदीची त्याला जाण्