शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

कर्जातून टोलमुक्ती नकोच

By admin | Updated: April 15, 2015 00:43 IST

शहरवासीयांची प्रतिक्रिया : प्रकल्पाच्या घोटाळ्याची चौकशी करा

 कोल्हापूर : शहरातील सर्वच टोलनाक्यांवर आंदोलकांच्या धास्तीने कोल्हापूरकरांसाठी टोलमुक्ती कधीच सुरू झाली. आता २२० कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी व्याजासह ४५० कोटींपेक्षा अधिकची रक्कम देण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. महापालिकेवर पर्यायाने शहरवासीयांवर टोलच्या कर्जाचे ओझे देऊन ठेकेदाराची तुंबडी भरण्याचा हा उद्योग शहरवासीयांना अमान्य आहे. त्यामुळे शासनाने अनुदानातून टोलमुक्ती करावी; अन्यथा परिस्थिती ‘जैसे थे’च असू दे, असाच सूर शहरवासीयांसह सेवाभावी संस्था व टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यांतून उमटत आहे. जुन्या शासनाने केलेली घाण निपटणे इतके सोपे नाही, हे कळते. शासनाने सर्वसामान्य माणसाच्या खिशात हात न घालता टोलमुक्ती करावी. जे करार चुकीचे झाले, याचे कर्तेधर्ते जे कोणी असतील, त्यांची चौकशी झाली पाहिजे. कराराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणे आवश्यक आहे. जनतेवर कर्जाचा भार न टाकता इतर पर्यायांतून टोलची रक्कम सरकारने भरावी, असे मत कृती समितीचे सदस्य अ‍ॅड. बाबा इंदुलकर यांनी व्यक्त केले. कर्जरूपाने टोलचे पैसे भागवून टोलचा भार कोल्हापूरकरांवरच देण्याचा प्रयत्न म्हणजे टोलमुक्तीची ही घोषणाच फसवी व अभासी आहे. त्यामुळे ‘आयआरबी’स धार्जिणा असा हा निर्णय सरकारने बदलावा, यासाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई व बुरहान नायकवडी यांनी दिला आहे. जो प्रकल्प कोल्हापूरकरांनी नाकारला आहे, त्याचा भार पुन्हा कशासाठी टाकला जात आहे? ‘आयआरबी’ला तीन लाख चौरस मीटरचा मोठा भूखंड एक रुपया भाड्याने दिला आहे. त्याची किंमत ठरवावी. उर्वरित रकमेसाठी वाढीव एफएसआय द्यावा. या पैशातून टोलमुक्ती करावी, असा सल्ला कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी दिला. रस्ते प्रकल्पाचे पैसे भागविण्यासाठी कर्ज न देता अनुदान स्वरूपात द्यावेत, अशी मागणी बाबूराव कदम यांनी पक्षातर्फे केली.