शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विकासात ‘अडसर’ नको, ‘शिल्पकार व्हा!

By admin | Updated: June 30, 2016 23:54 IST

‘गडहिंग्लज’चे महालक्ष्मी मंदिर : १७ माजी नगराध्यक्षांचे आवाहन’

गडहिंग्लज : तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत शासनाकडून निधी मिळालेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराच्या सुशोभीकरणामुळे गडहिंग्लजच्या वैभवात भर पडणार असून, धर्मशाळा व प्राथमिक शाळा इमारतीमुळे गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची हेळसांड थांबणार आहे. त्यामुळे ‘विकासात अडसर ठरू नका, विकासाचे शिल्पकार व्हा’, असे आवाहन विद्यमान नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांच्यासह १७ माजी नगराध्यक्षांनी निवेदनाद्वारे संबंधितांना केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषद व नागरिकांच्या सहकार्याने आणि शैक्षणिक, वैद्यकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील कामामुळे गडहिंंग्लज शहर हे उपजिल्ह्याचे ठिकाण असून, नावारूपास येत असल्यामुळे येथील नागरिकांची जबाबदारी वाढली आहे.तीर्थक्षेत्र विकास योजनेतून नगरपालिकेला चार कोटी २६ लाखांचा निधी मिळाला आहे. त्यामध्ये महालक्ष्मी मंदिर परिसर विकासकामांचा समावेश आहे. त्यामध्ये मूळ गाभाऱ्याला हात न लावता परिसर सुशोभीकरण, मंडप मजबूत व आकर्षक करणे, धर्मशाळा व प्राथमिक शाळा व स्टेज बांधकाम आदी कामे प्रस्तावित आहेत.मंदिराच्या बाजूच्या रिकाम्या जागेत गेली अनेक वर्षे धर्मशाळा होती. त्यानंतर त्या ठिकाणी भरणाऱ्या प्राथमिक शाळेत अनेक मान्यवरांनी शिक्षण घेतले असून, त्या ठिकाणी गोरगरिबांची मुले शिकतात. २००४-०५ मध्ये शाळा इमारत जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका नको म्हणून इमारत उतरविण्यात आली. त्यामुळे ही शाळा सुपर मार्केट व महादेव मंदिराच्या जीर्ण खोल्यांत भरत असून, मुलांच्या शिक्षणाची हेळसांड होत आहे.धर्मशाळा असतानाही अनेकवेळा महालक्ष्मी यात्रा यशस्वीरीत्या पार पडली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शाळा व धर्मशाळा झाल्यामुळे कोणतीही अडचण होत नाही. धर्मशाळेचा हॉल नागरिकांच्या घरगुती व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्ट, यात्रा समितीसह आबालवृद्धांनी मंदिर परिसराच्या सुशोभीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.निवेदनावर उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, प्रा. विठ्ठल बन्ने, शिवाजी खणगावे, दत्तात्रय बरगे, राजन पेडणेकर, वसंत यमगेकर, अकबर मुल्ला, महादेवी नेवडे, बापू म्हेत्री, निरुपमा बन्ने, स्वाती कोरी, बसवराज खणगावे, राजेंद्र मांडेकर, अरुणा शिंदे, मंजूषा कदम, लक्ष्मी घुगरे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)शांतता भंग नको; निधी परत जाऊ नयेकोणत्याही प्रकारे असंतोष निर्माण होऊन शहराची शांतता भंग होऊ नये आणि शासकीय निधी परत जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी संबंधित सर्वांची संयुक्त बैठक घेऊन प्रस्तावित काम सुरू करण्याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंतीदेखील माजी नगराध्यक्ष यांनी केली आहे.