शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

घरगुती वीज बिलापोटी कनेक्शन तोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यात अजूनही लाॅकडाऊन आहे. जिथे लाॅकडाऊनमध्ये सूट दिलेली आहे, तेथेही उद्योगधंदे चालू नाहीत. आजही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यात अजूनही लाॅकडाऊन आहे. जिथे लाॅकडाऊनमध्ये सूट दिलेली आहे, तेथेही उद्योगधंदे चालू नाहीत. आजही लोकांच्या हाताला काम नाही, अशी परिस्थिती आहे. गरीब मध्यमवर्ग यांना रोजचे जीवन जगायला पैसे नाहीत. ते महावितरण कंपनीची वीजबिले कशी भरणार? अशी स्थिती असल्याने घरगुती ग्राहकांची कनेक्शन तोडू नयेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्यावतीने विक्रांत पाटील यांनी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच वीज ग्राहक वीजबिले भरण्याच्या बाबतीत राज्यात अग्रक्रमावर आहेत. महामारीमुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. पहिल्या लाटेपासून सामान्य जनतेने प्रा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीजबिल सवलतीसाठी आंदोलने केली आणि घरगुती ग्राहकांना शेजारील राज्यांप्रमाणे वीजबिल सवलत मिळावी, अशी सातत्याने मागणी केली. सरकारनेही त्याबद्दल तयारी दाखविली, पण प्रत्यक्षात मदत केली नाही. आता दुसरी लाट असल्याने अनेक महिने सर्व व्यवहार बंद आहेत. सध्या सामान्य वीज ग्राहक अडचणीत असल्याने त्याबाबत विचार करून त्यांना त्रास होणार नाही, अशा प्रकारचे धोरण राज्य शासनाने ठरवावे. माणुसकीच्या नात्याने गरीब व कृषिपंपधारकांची वीज कनेक्शन तोडू नयेत. महारामारीमध्ये सर्वांत जास्त फटका हा या वर्गाला बसला आहे. ग्रामपंचायत पिण्याच्या नळ पाणीपुरवठा योजनांची वीज कनेक्शनही महावितरणने थकबाकीसाठी तोडण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे गावागावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली.