शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पाईपलाईन मार्गात बदल नका

By admin | Updated: November 25, 2014 23:52 IST

विरोधाची शक्यता : शेतकऱ्यांत अस्वस्थता; इस्पुर्लीऐवजी भोगावती मार्गे

राधानगरी : कोल्हापूरला काळम्मावाडी धरणातून नेण्यात येणाऱ्या पाण्याच्या थेट पाईपलाईनचा मार्ग बदलल्याने राधानगरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेने हा मार्ग इस्पुर्लीऐवजी भोगावती असा बदलला आहे. त्यामुळे पाईपलाईनच्या मार्गाला विरोध होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली ही योजना दोन वर्षांपूर्वी मंजूर झाली. दूधगंगा नदीवरील काळम्मावाडी धरणातून नैसर्गिक उताराने थेट पाईपलाईनमधून कोल्हापूरजवळ पाणी नेऊन तेथून ते शहरात पुरविण्यात येणार आहे. अनेक वर्षांत अडथळ्यांमुळे रेंगाळलेली ही योजना मंजूर झाली असली तरी ती राबविताना असंख्य अडचणी निर्माण होणार आहेत.धरणापासून सुरू होणाऱ्या मोठमोठ्या टेकड्या, डोंगर पार करावे लागणार आहेत. पूर्वी या पाईपचा मार्ग काळम्मावाडी-तुरंबे-इस्पुर्लीमार्गे कोल्हापूर असा होता. मात्र, हे अंतर वाढते. तसेच मोठा घाट पार करावा लागतो, म्हणून मार्ग बदलण्यात आला आहे. आता मांगेवाडी-खिंडीव्हरवडे ते भोगावतीमार्गे कोल्हापूर अशा मार्गाची पाहणी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या बाजूने ही पाईप टाकण्यात येणार आहे. या मार्गावर अगदी रस्त्याला खेटून असलेली राधानगरी तालुक्यातील १७ व करवीर तालुक्यातील आठ, अशी २५ गावे लागतात.सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या मध्यापासून किमान पंधरा मीटर अंतर सोडून पाईप टाकावी, असे कळविले आहे. काही ठिकाणी इतकीही जागा शिल्लक नाही. अगदी रस्त्याबरोबर घरे व व्यावसायिक इमारती आहेत. अशा हजारो इमारतींना अडथळा होणार आहे. ही पाईप काही ठिकाणी जमिनीवरून व काही ठिकाणी जमिनीखालून असणार आहे. जमिनीवर पाईप असेल तेथे ये-जा करण्यास अडचण होणार आहे, तर शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे नळ जमिनीखाली मोठ्या संख्येने आहेत. तेथेही अडचण होणार आहे. असंख्य झाडांची तोड होणार आहे. काही मंदिरे हटवावी लागणार आहेत. पाईपचे अंतर सुमारे पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त आहे.राधानगरी-कोल्हापूर हा आंतरराज्य मार्गाचा भाग आहे. भविष्यात कधीकाळी हा मार्ग चारपदरी करावा लागणार आहे. त्याचा विचार आताच करावा लागणार आहे; अन्यथा रस्ता रुंदीकरणावर मर्यादा येणार आहेत. रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या जमिनी संपादित करण्याचा पर्याय पुढे आल्यास शेतकऱ्यांमधून विरोध होण्याची शक्यता आहे. पर्यायी मार्गाचा विचार व्हावायोजनेच्या पाईपचा मार्ग रस्त्याऐवजी धरणाच्या डाव्या कालव्याच्या बाजूने न्यावा, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचविले होते. पाटबंधारे विभागाने कालव्यासाठी पूर्वी भरपूर जमीन संपादित केली आहे. धरण ते इस्पुर्लीपर्यंत कालवा आहे. तेथून रस्त्याच्या बाजूने पाईप नेल्यास एकही गाव रस्त्याच्या बाजूला लागत नाही. हे अंतर काही प्रमाणात वाढणार असले तरी यामुळे बाधित होणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे.