शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन मार्गात बदल नका

By admin | Updated: November 25, 2014 23:52 IST

विरोधाची शक्यता : शेतकऱ्यांत अस्वस्थता; इस्पुर्लीऐवजी भोगावती मार्गे

राधानगरी : कोल्हापूरला काळम्मावाडी धरणातून नेण्यात येणाऱ्या पाण्याच्या थेट पाईपलाईनचा मार्ग बदलल्याने राधानगरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. महापालिकेने हा मार्ग इस्पुर्लीऐवजी भोगावती असा बदलला आहे. त्यामुळे पाईपलाईनच्या मार्गाला विरोध होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली ही योजना दोन वर्षांपूर्वी मंजूर झाली. दूधगंगा नदीवरील काळम्मावाडी धरणातून नैसर्गिक उताराने थेट पाईपलाईनमधून कोल्हापूरजवळ पाणी नेऊन तेथून ते शहरात पुरविण्यात येणार आहे. अनेक वर्षांत अडथळ्यांमुळे रेंगाळलेली ही योजना मंजूर झाली असली तरी ती राबविताना असंख्य अडचणी निर्माण होणार आहेत.धरणापासून सुरू होणाऱ्या मोठमोठ्या टेकड्या, डोंगर पार करावे लागणार आहेत. पूर्वी या पाईपचा मार्ग काळम्मावाडी-तुरंबे-इस्पुर्लीमार्गे कोल्हापूर असा होता. मात्र, हे अंतर वाढते. तसेच मोठा घाट पार करावा लागतो, म्हणून मार्ग बदलण्यात आला आहे. आता मांगेवाडी-खिंडीव्हरवडे ते भोगावतीमार्गे कोल्हापूर अशा मार्गाची पाहणी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या बाजूने ही पाईप टाकण्यात येणार आहे. या मार्गावर अगदी रस्त्याला खेटून असलेली राधानगरी तालुक्यातील १७ व करवीर तालुक्यातील आठ, अशी २५ गावे लागतात.सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या मध्यापासून किमान पंधरा मीटर अंतर सोडून पाईप टाकावी, असे कळविले आहे. काही ठिकाणी इतकीही जागा शिल्लक नाही. अगदी रस्त्याबरोबर घरे व व्यावसायिक इमारती आहेत. अशा हजारो इमारतींना अडथळा होणार आहे. ही पाईप काही ठिकाणी जमिनीवरून व काही ठिकाणी जमिनीखालून असणार आहे. जमिनीवर पाईप असेल तेथे ये-जा करण्यास अडचण होणार आहे, तर शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे नळ जमिनीखाली मोठ्या संख्येने आहेत. तेथेही अडचण होणार आहे. असंख्य झाडांची तोड होणार आहे. काही मंदिरे हटवावी लागणार आहेत. पाईपचे अंतर सुमारे पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त आहे.राधानगरी-कोल्हापूर हा आंतरराज्य मार्गाचा भाग आहे. भविष्यात कधीकाळी हा मार्ग चारपदरी करावा लागणार आहे. त्याचा विचार आताच करावा लागणार आहे; अन्यथा रस्ता रुंदीकरणावर मर्यादा येणार आहेत. रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या जमिनी संपादित करण्याचा पर्याय पुढे आल्यास शेतकऱ्यांमधून विरोध होण्याची शक्यता आहे. पर्यायी मार्गाचा विचार व्हावायोजनेच्या पाईपचा मार्ग रस्त्याऐवजी धरणाच्या डाव्या कालव्याच्या बाजूने न्यावा, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुचविले होते. पाटबंधारे विभागाने कालव्यासाठी पूर्वी भरपूर जमीन संपादित केली आहे. धरण ते इस्पुर्लीपर्यंत कालवा आहे. तेथून रस्त्याच्या बाजूने पाईप नेल्यास एकही गाव रस्त्याच्या बाजूला लागत नाही. हे अंतर काही प्रमाणात वाढणार असले तरी यामुळे बाधित होणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे.