शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

बसेसचा थांबा बदलू नका

By admin | Updated: January 7, 2015 23:53 IST

इंटकचा इशारा : कोल्हापुरातील निर्णयाने सिंधुदुर्गवासीयांना भुर्दंड

कणकवली : वाहतूक कोंडीचे कारण देत सिंधुदुर्गातील बसेस रंकाळा आणि मध्यवर्ती बसस्थानकावर न आणता संभाजीनगर आगार येथे थांबवून मागे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामुळे सिंधुदुर्गातील प्रवाशांना भुर्दंड पडत आहे. याचा सिंधुदुर्गातील एसटी वाहतुकीवर परिणाम होणार असून इंटक याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करील, असा इशारा संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी दिला आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरून पुढे पुणे, सांगली, सातारा आदी ठिकाणी जाणाऱ्या बसेस रंकाळा स्थानकावर न आणता नवीन वाशीनाका, संभाजीनगर, विद्यापीठ कॉर्नर, रेल्वे फाटक, ताराराणी चौकमार्गे मध्यवर्ती बसस्थानकावरून येऊन पुढे मार्गस्थ करण्याचे ठरवले आहे. हा मार्गबदल फक्त सिंंधुदुर्गातील गाड्यांच्या बाबतीत करण्यात आला आहे. वास्तविक कोल्हापूर विभागाच्या गारगोटीकडे १३० फेऱ्या असून मुरगूड व गारगोटी फेऱ्या प्रचंड वर्दळ असणाऱ्या गोखले कॉलेज, लक्ष्मीपुरी या मार्गावरून चालवल्या जातात. सद्यस्थितीत कोल्हापूर विभागाच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून सुटणाऱ्या कोल्हापूर विभागाच्या फेऱ्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेला नाही. या निर्णयाची अंमलबजावणी करताना गोवा व कर्नाटक राज्य परिवहनच्या गाड्या मात्र बिनदिक्कत जुन्या मार्गानेच ये-जा करत आहेत. तसेच वाहतूक कोंडीही कमी झालेली दिसत नाही. मात्र, या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील व्यापारी, प्रवाशांची प्रचंड गैरसोय झालेली आहे. या निर्णयाचा तात्काळ फेरविचार होण्याची आवश्यकता असून इंटकचा या निर्णयास तीव्र विरोध असल्याचे पत्रकात म्हटले आहे.कोल्हापूर येथील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचा बोजा सिंधुदुर्गवासीयांना भोगावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाने याबाबत त्वरित दखल घेण्याची मागणी इंटकतर्फे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)भारमानात लक्षणीय घटगगनबावडा मार्गावर एक टप्प्याने व फोंडा मार्गावर एका टप्प्याने वाढ होणार आहे. आधीच मार्ग बदल केल्याने या विभागाच्या फेऱ्यांना अर्धा ते पाऊण तास फेरा मारून यावा लागतो. या सर्व बदलांचा अनिष्ट परिणाम सिंधुदुर्ग विभागाच्या सर्व फेऱ्यांवर होऊन भारमानात लक्षणीय घट झाली आहे. अवैध प्रवासी वाहतुकीस मोठी वाढ झाली आहे. बसेस संभाजीनगर येथे प्रवास संपवत असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळे तीव्र असंतोष पसरला आहे.