शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

बसेसचा थांबा बदलू नका

By admin | Updated: January 7, 2015 23:53 IST

इंटकचा इशारा : कोल्हापुरातील निर्णयाने सिंधुदुर्गवासीयांना भुर्दंड

कणकवली : वाहतूक कोंडीचे कारण देत सिंधुदुर्गातील बसेस रंकाळा आणि मध्यवर्ती बसस्थानकावर न आणता संभाजीनगर आगार येथे थांबवून मागे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामुळे सिंधुदुर्गातील प्रवाशांना भुर्दंड पडत आहे. याचा सिंधुदुर्गातील एसटी वाहतुकीवर परिणाम होणार असून इंटक याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करील, असा इशारा संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी दिला आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरून पुढे पुणे, सांगली, सातारा आदी ठिकाणी जाणाऱ्या बसेस रंकाळा स्थानकावर न आणता नवीन वाशीनाका, संभाजीनगर, विद्यापीठ कॉर्नर, रेल्वे फाटक, ताराराणी चौकमार्गे मध्यवर्ती बसस्थानकावरून येऊन पुढे मार्गस्थ करण्याचे ठरवले आहे. हा मार्गबदल फक्त सिंंधुदुर्गातील गाड्यांच्या बाबतीत करण्यात आला आहे. वास्तविक कोल्हापूर विभागाच्या गारगोटीकडे १३० फेऱ्या असून मुरगूड व गारगोटी फेऱ्या प्रचंड वर्दळ असणाऱ्या गोखले कॉलेज, लक्ष्मीपुरी या मार्गावरून चालवल्या जातात. सद्यस्थितीत कोल्हापूर विभागाच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून सुटणाऱ्या कोल्हापूर विभागाच्या फेऱ्यांच्या मार्गात बदल करण्यात आलेला नाही. या निर्णयाची अंमलबजावणी करताना गोवा व कर्नाटक राज्य परिवहनच्या गाड्या मात्र बिनदिक्कत जुन्या मार्गानेच ये-जा करत आहेत. तसेच वाहतूक कोंडीही कमी झालेली दिसत नाही. मात्र, या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील व्यापारी, प्रवाशांची प्रचंड गैरसोय झालेली आहे. या निर्णयाचा तात्काळ फेरविचार होण्याची आवश्यकता असून इंटकचा या निर्णयास तीव्र विरोध असल्याचे पत्रकात म्हटले आहे.कोल्हापूर येथील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचा बोजा सिंधुदुर्गवासीयांना भोगावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाने याबाबत त्वरित दखल घेण्याची मागणी इंटकतर्फे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)भारमानात लक्षणीय घटगगनबावडा मार्गावर एक टप्प्याने व फोंडा मार्गावर एका टप्प्याने वाढ होणार आहे. आधीच मार्ग बदल केल्याने या विभागाच्या फेऱ्यांना अर्धा ते पाऊण तास फेरा मारून यावा लागतो. या सर्व बदलांचा अनिष्ट परिणाम सिंधुदुर्ग विभागाच्या सर्व फेऱ्यांवर होऊन भारमानात लक्षणीय घट झाली आहे. अवैध प्रवासी वाहतुकीस मोठी वाढ झाली आहे. बसेस संभाजीनगर येथे प्रवास संपवत असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळे तीव्र असंतोष पसरला आहे.