शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वीस टक्के अनुदानावर समाधानी राहू नका : तात्यासाहेब मस्कर

By admin | Updated: April 30, 2017 18:58 IST

राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे कृतज्ञता सोहळा

 आॅनलाईन/लोकमत

कोल्हापूर, दि. ३0 : वीस टक्के अनुदानावर मी समाधानी नाही. तुम्ही देखील राहू नका. पूर्ण अनुदान मिळविण्यासाठीच्या लढ्यासाठी एकी कायम ठेवा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब मस्कर यांनी रविवारी येथे केले.

येथील मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवनमध्ये समितीतर्फे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील होते. कायम विनअनुदानित शाळा कृती समितीच्या १७ वर्षांच्या लढ्यात २० टक्के अनुदान मिळवून देण्यासाठी सहकार्य केलेल्या मान्यवरांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.

अध्यक्ष मस्कर म्हणाले, विविध स्वरुपातील आंदोलनाच्या माध्यमातून अविरतपणे लढा दिल्याने २० टक्के अनुदान मिळविण्यात आपल्याला यश आले. शिक्षणमंत्र्यांनी वाढीव अनुदान देण्याचा शब् द दिला आहे. मात्र, सध्याच्या २० टक्के अनुदानाबाबत मी समाधानी नाही. समितीतील शिक्षक, कार्यकर्त्यांनी देखील यावर समाधानी राहू नये. शंभर टक्के अनुदान मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पूर्ण अनुदान मिळविण्यासाठी समितीतर्फे यापुढेही लढा द्यावा लागणार आहे. यासाठी संघटनेतील एकी कायम ठेवा, त्याच्यावर जोरावर यश मिळत राहील.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील म्हणाले, वीस टक्के अनुदानाबाबतचे यश सहजासहजी मिळालेले नाही. यात अनेकांचे योगदान आहे. पूर्ण अनुदानासाठीच्या कायदेशीर लढ्याला समिती, शिक्षकांनी तयार रहावे. त्यासाठी शैक्षणिक व्यासपीठांच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल.

या कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष मस्कर यांचा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांना बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांतर्फे ‘बुलेट’ प्रदान करण्यात आली. तिची चावी जगदाळे यांच्याकडे संतराम मुंडे,विकास टेकाळे यांनी प्रदान केली. यानंतर दादा लाड यांची भाषणे झाली.

यावेळी कोल्हापूर वेतन पथकाचे अधीक्षक शंकरराव मोरे, लेखाधिकारी वैभव राऊत, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार,मुख्याध्यापक संघ विनाअनुदान समितीचे अध्यक्ष एस. एम. पाटील, विनअनुदानित शाळा कृती समितीचे प्रकाश पाटील, सुनिल कल्याणी, गजानन काटकर, शिवाजी खापणे, जनार्दन दिंडे, जयंत आसगांवकर, एस. डी. लाड, भरत रसाळे, एस. एन. मस्कर, राजेश वरक, के. के. पाटील, आदी उपस्थित होते. मच्छिंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले. राजू मोरे यांनी सूत्रसंचालन केले. राम कदम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)