शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

अकरावी प्रवेशापासून वंचित राहू नये

By admin | Updated: June 10, 2015 00:25 IST

एम. के. गोंधळी : विद्यार्थ्यांना नियमाने प्रवेश द्या; शाळा प्रवेशाच्या बैठकीत आवाहन

कोल्हापूर : सर्व विद्यार्थ्यांना अकरावीसाठी प्रवेश मिळावा, यासाठी संस्थाचालक, प्राचार्यांनी सकारात्मक राहावे. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, असे आवाहन विभागीय उपसंचालक एम. के. गोंधळी यांनी मंगळवारी केले. काही शिक्षण संस्थाचालकांनी शाळेतच पुस्तके, गणवेश, वह्या यांची दुकानदारी मांडली आहे. असा ‘साईड बिझनेस’ करीत असलेल्या शिक्षणसंस्थांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेनेच्या मागणीनुसार येथील मेन राजाराम हायस्कूलमध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योस्त्ना शिंदे, शिक्षण निरीक्षक ए. आर. पोतदार, प्रशासनाधिकारी पी. एस. सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. गोंधळी म्हणाले, कोल्हापुरातील अकरावीसाठीची केंद्रीय प्रवेश परीक्षा राज्यात आदर्श ठरली आहे. अन्य जिल्ह्यात कोल्हापूरच्या प्रवेश प्रक्रियेचे अनुकरण केले जात आहे. यंदाही नियोजनबद्ध प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. शिक्षण हक्क कायद्यानुसार सर्व खासगी शाळांनी २५ टक्के प्रवेश मोफत देणे बंधनकारक आहे. २५ टक्क्यांमधून येथे प्रवेश दिले जातील, असा मोठा फलक शाळांनी लावावा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे अधिकाधिक प्रवेश होतील, याकडे लक्ष द्यावे.इचलकरंजी, सांगली येथून पुस्तक विके्रत्यांनी निवेदन देऊन, काही शिक्षणसंस्थांनी शालेय साहित्याची दुकानदारी सुरू केल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे विभागातील सर्व जिल्ह्यांंतील शिक्षण संस्थांची तपासणी करण्याचे आदेश दिले. बालकांना मोफत व हक्काचे शिक्षण कायद्यातील निकषानुसार सेवा-सुविधा द्याव्यात, असे आदेश शिक्षण संस्थांना दिले. महत्त्वाचे दहा निकष पूर्ण न करणाऱ्या संस्थांवर कारवाई करणार आहे. शासन आता वेतनेतर अनुदान देत आहे. शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांचे वेतनेतर अनुदान रोखले जाईल. शासनाने नोकरभरतीवर निर्बंध आणले असले तरी आवश्यक तेथे शिक्षकभरती करण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे सकारात्मक आहेत.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, शासनाचे नियम न पाळणाऱ्या मुजोर शिक्षणसंस्थांचे कामकाज शिवसेना बंद पाडणार आहे. भरमसाठ देणगी उकळणाऱ्या आणि दर्जेदार सुविधा न देणाऱ्या संस्थांचाही बुरखा फाडणार आहोत.शिक्षण निरीक्षक ए. आर. पोतदार यांनी, अकरावीच्या प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नये, असे सांगितले. प्राचार्य बी. बी. शिंदे, शिवाजी भोसले यांची भाषणे झाली. सौ. एस. बी. शिंदे, एम. ई. सातपुते, ग्राहक संरक्षण मंचचे कमलाकर जगदाळे, आदी उपस्थित होते. निवेदनास मज्जाव...बैठक सुरू असताना शिक्षण उपसंचालक गोंधळी यांना निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे फिरोज सरगूर व्यासपीठाकडे आले. त्यांना निवेदन देण्यापासून शिवसेनेचे पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मज्जाव केला. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. सरगूर हे निवेदन न देताच गेल्याने गोंधळ शांत झाला.