शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

व्याज परताव्याचा जिल्हा बँकेस २० कोटींचा बोनस

By admin | Updated: November 14, 2015 00:30 IST

सहकार विभागाचा आदेश : सहा टक्क्याने कर्ज देणाऱ्या बँकांना लाभ

प्रकाश पाटील- कोपार्डे-- खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांंना सहा टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांना व्याज परताव्यापोटी राज्य सरकारने २२८ कोटी रुपयांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या सहकार विभागाने शनिवारी (दि. ३१) या संदर्भात आदेश काढला आहे. जिल्हा, राष्ट्रीयीकृत, प्रादेशिक, ग्रामीण व खासगी अशा सर्व सहा टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकांना हा परतावा मिळणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पीक कर्जाच्या पुरवठ्यासाठी व्याज परतावा रक्कम २० कोटी ७० लाख रुपयांचा शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजनेतून शेतकऱ्यांना सहा टक्के व्याज दराने कृषी कर्ज वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या धोरणानुसार ज्या बँका शेतकऱ्यांना सात टक्के व्याज दराने कर्जपुरवठा करतात, अशा बँकांना व्याजातील एक टक्का फरकाच्या रकमेचा भार राज्य शासनाकडून उचलला जातो. सन २००६-०७ मधील खरीप आणि रब्बी हंगामापासून तत्कालीन राज्य सरकारने हा व्याज परतावा देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयीकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण बँकांना हा परतावा दिला जात होता; मात्र सन २०१३-१४ पासून खासगी बँकांनाही हा लाभ दिला जात आहे. तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत कर्जपुरवठा करणाऱ्या बँकांना या योजनेतून व्याज परतावा दिला जातो. राष्ट्रीयीकृत बँका, प्रादेशिक ग्रामीण आणि खासगी बँकांना तीन लाख रुपयांपर्यंतचा अल्पमुदत कर्ज पुरवठ्यावर वार्षिक एक टक्का परतावा मिळणार आहे, तर विकास सोसायट्याकडून पतपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या सभासदांना तीन लाख रुपयांपर्यंत अल्पमुदत कर्जपुरवठा करण्यासाठी जिल्हा बँकांनी चार टक्के व्याजदराने केलेल्या कर्जपुरवठ्यावर सरकारकडून अडीच टक्के व्याज परतावा दिला जाणार आहे. जिल्हा बँकांनी चार टक्के व्याजाने कर्जपुरवठा करावा आणि विकास सोसायट्यांनी शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजाने कर्जपुरवठा करावा, असे धोरण शासनाचे आहे. तसेच राज्य बँकेने नाबार्डकडून मिळणाऱ्या फेरकर्जावर पाव टक्का आकारून जिल्हा बँकांना पावणेपाच टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा केला जातो. या व्याज परताव्याच्या कर्जाचा हिशेब कर्ज दिल्याच्या तारखेपासून कर्जाची परतफेड करेपर्यंत किंवा मुदतीपर्यंत म्हणजे खरीप हंगामासाठी ३१ मार्च, तर रब्बी हंगामासाठी ३० जूननुसार करण्याचे निर्देश आहेत. ज्या बँकांनी शेतकऱ्यांकडून सात टक्क्यांनी व्याज आकारणी केली आहे, अशांना मात्र शासनाकडून मिळणाऱ्या व्याज परताव्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सन २०१४-१५ आणि त्यापूर्वीच्या हंगामामध्ये पीक कर्ज वाटप वरील व्याज परतावा धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी चालू वर्षात राज्य शासनाने ३२५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. त्यापैकी ७० टक्के म्हणजे २२८ कोटी रुपये राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हा बँकेकडून कर्ज वितरणचा तपशील विकास सोसायट्या : १ हजार ८५६२०१४-१५ मध्ये कर्ज वाटप : १२४२ कोटी ३० लाखएकूण शेतकरी - १ लाख ९३ हजार २६६ शेतकऱ्यांना कर्ज वाटप संस्थापीककर्ज वितरण उद्दिष्ट १५७ टक्के, शेतकरी - ७८ टक्के