शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक : चौकशी रद्दसाठी साकडे

By admin | Updated: August 13, 2014 23:35 IST

१५७ कोटींचा गैरव्यवहार : मुंबईत सहकारमंत्र्यांसमोर संचालकांची सुनावणी

सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या १५७ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेली चौकशी रद्द करावी, असे साकडे माजी संचालकांनी आज बुधवारी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना घातले. पण सहकारमंत्र्यांनी संचालकांची ही मागणी अमान्य करीत म्हणणे मांडण्यासाठी आणखी एक संधी संचालकांना दिली. गेल्या पंधरा वर्षांत संचालक मंडळाने २१ संस्थांना नियमबाह्य कर्जाचे वाटप केले, तर १७ संस्थांना एकरकमी कर्ज परतफेडीचा लाभ दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून शैलेश कोतमिरे यांची नियुक्ती झाल्यानंतर हा गैरकारभार उजेडात आला होता. बँकेच्या संचालक मंडळाच्या कालावधित नियमबाह्य कर्जवाटपाची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कलम ८३ नुसार चौकशी करण्यात आली. या चौकशीत २१ संस्थांना नियमबाह्य कर्जवाटप करून १५० कोटी व १७ संस्थांना एकरकमी कर्ज परतफेडीत ७ कोटी ९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. कऱ्हाडचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी ४७ माजी संचालक व ३ कार्यकारी संचालकांना नोटिसा बजाविल्या होत्या. संचालकांकडून खुलासा मागविला होता. आज बुधवारी मुंबईत बॅँकेचे संचालक विलासराव शिंदे, राजेंद्रअण्णा देशमुख, मोहनराव कदम, सिकंदर जमादार यांनी सहकारमंत्र्यांची भेट घेऊन चौकशी रद्दचे साकडे घातले. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील हेही उपस्थित होते. विनातारण कर्जाचा ठपका अमान्य करीत बँकेने दिलेल्या कर्जाला तारण घेतले आहे. तसेच कर्जदार संस्थाची हमीही घेतली आहे. त्यांना वसुलीसाठी नोटिसाही बजाविल्या आहेत. त्यात लेखापरीक्षणानंतर पाच वर्षातील कारभाराचीच चौकशी करता येते, इथे मात्र दहा ते बारा वर्षांची चौकशी सुरू आहे. ती बेकायदेशीर असल्याचे म्हणणे संचालकांनी मांडले, तर अरविंद देशमुख यांनी चौकशी सुरू असून, संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी दिली असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)आणखी एक संधीसंचालकांनी चौकशी रद्दची मागणी केली असली, तरी सहकारमंत्र्यांनी ही प्रक्रिया कायदेशीर असल्याचे स्पष्ट करीत संचालकांनी आणखी एकदा आपले म्हणणे चौकशी अधिकाऱ्यांसमोर सादर करावे, अशी सूचना केली. त्यामुळे संचालकांना आणखी एक संधी मिळाली आहे.