शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

साखर कामगारांच्या बोनसमध्येही वाटमारी--स्पष्ट धोरणाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:50 IST

कोल्हापूर : साखर कारखान्यांकडून कामगारांना दिल्या जाणाºया बोनसमध्ये काही कारखाना चालकांकडून वाटमारी होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देनवे सूत्र ठरविण्याच्या हालचालीबोनस देण्याबाबत राज्य पातळीवर काहीतरी सूत्र निश्चित केले जावे

विश्वास पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : साखर कारखान्यांकडून कामगारांना दिल्या जाणाºया बोनसमध्ये काही कारखाना चालकांकडून वाटमारी होत असल्याचे चित्र आहे. जाहीर बोनसमधील काही टक्के रक्कम काढून घेऊन कामगारांना बोनस देण्याचे प्रकार होतात. ही रक्कम संस्थाचालकांच्या नावे सुरू असलेली फौंडेशन, अध्यक्ष, आलिशान गाडीसाठी वापरली जाते. विशेष म्हणजे कामगारांना किती बोनस द्यावा, यासंबंधीचे स्पष्ट धोरणच अस्तित्वात नाही.यशवंतनगर कराड येथे साखर कामगारांच्यावतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार झाला. त्यामध्ये ऊसाची एफआरपी वर्षाला वाढत असताना बोनसही चांगला मिळावा अशी मागणी कामगारांनी केली. त्यामध्ये पवार यांनी उसाचा दर वाढत गेला परंतु कामगारांचा बोनस काय वाढत नाय हे वागणं बरं नव्हं, असा चिमटा काढला व बोनस देण्याबाबत राज्य पातळीवर काहीतरी सूत्र निश्चित केले जावे असे सुचविले. त्यानुसार साखर संघ व उद्योगाच्या पातळीवरही तशा हालचाली सुरु झाल्या आहेत.या कामगारांना बोनस मिळायलाच हवा, याबद्दल कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही; परंतु तो जास्तीत जास्त किती द्यावा, याचे काहीतरी धोरण निश्चित होण्याची गरज आहे. माजी केंद्रीय कामगारमंत्री र. कृ. खाडिलकर यांच्या काळात सर्वच कामगारांना कमीत कमी ८.३३ टक्के बोनस देण्याचा निर्णय झाला. एवढा बोनस म्हणजे किमान एक पगार होतो. तेवढा तरी किमान बोनस देणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे ८.३३ पासून ते ४० टक्क्यांपर्यंत बोनस देण्याच्या घोषणा होतात. प्रत्यक्षात त्यातील काही टक्के रक्कम कपात केली जाते. एका कारखान्याकडे किमान ५०० च्या वर कायम व ३०० पर्यंत हंगामी कर्मचारी असतात. त्याशिवायही कंत्राटी पद्धतीवर काही कर्मचारी घेतले जातात. हंगामी व कायम कर्मचाºयांना १६ हजारांपासून ३५ हजारांपर्यंत पगार आहेत. हंगामी कर्मचाºयांना आॅफ सिझनमध्ये त्यांच्या पगाराच्या २९ ते ५२ टक्क्यांपर्यंत पगार मिळतो.कामगारांना बोनस असो की पगार हा शेतकºयाला उसाची बिले ज्या प्रमाणात दिली जातात, त्या प्रमाणात दिला जावा, असा एक संकेत आहे. कागलच्या शाहू साखर कारखान्यात संस्थापक नेते दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांनी त्यासाठी एक ‘फॉर्म्युला’ निश्चित करून दिला. त्यानुसार हा कारखाना फक्त एफआरपी देईल त्यावर्षी ८.३३ टक्के बोनस देतो व जेव्हा एफआरपीच्या वर ऊसदर दिला जातो, तेव्हा वाढीव प्रत्येक शंभर रुपयांना २ टक्के बोनस दिला जातोराज्यातील साखर उद्योगराज्यात एकूण १७० साखर कारखाने आहेत. त्यापैकी ११९ सहकारी व उर्वरित खासगी कारखाने आहेत. ४५ लाख ऊस उत्पादक कुटुंबे असून, या उद्योगात वार्षिक ३५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. या उद्योगात कारखान्यात नोकरी करणारे सुमारे अडीच लाखांवर कामगार आहेत. यातून राज्याला एक हजार ५३३ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. तसेच १००० मेगावॅट विजेची निर्मिती देखील होते.