शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

उत्तरकार्यानिमित्त एक हजार भगवद‌्गीताचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:21 IST

हुपरी: समाजातील लोप पावत चाललेली तत्वनिष्ठा कायम टिकून राहावी. सामाजिक संस्काराचे होत चाललेले अध:पतन थांबावे. तसेच भावी पिढीवर योग्य ...

हुपरी: समाजातील लोप पावत चाललेली तत्वनिष्ठा कायम टिकून राहावी. सामाजिक संस्काराचे होत चाललेले अध:पतन थांबावे. तसेच भावी पिढीवर योग्य प्रकारचे धार्मिक व आध्यात्मिक संस्कार व्हावेत व सामाजिक चळवळीला नव्याने ऊर्जितावस्था प्राप्त व्हावी. या हेतूने येथील तरुण चांदी उद्योजक विवेक व रवी विलासराव नाईक यांनी आईच्या निधनानंतर उत्तर कार्याच्या दिवशी पंचपक्वान्न जेवणाचे आयोजन न करता एक हजार भगवद‌्गीता धर्म ग्रंथाचे घरपोच वाटप केले.

हुपरी परिसरातील सहकार व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे नाईक कुटुंब. या कुटुंबातील श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँकेचे व चांदी कारखानदार असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक विलासराव यशवंतराव नाईक यांच्या पत्नी विद्या विलास नाईक यांचे १३ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या उत्तरकार्यानिमित्त सांत्वनासाठी भेटून गेलेल्या व्यक्तीं प्रती ऋण मानण्यासाठी एक हजार जणांना भगवद‌्गीता धर्म ग्रंथ घरपोच केला. आपल्या आईच्या उत्तरकार्यादिवशी हा धर्म ग्रंथ भेट देऊन एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवून नाईक कुटुंबाने आईला अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

---------::--------

फोटो - २५ विद्या नाईक