शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जाचक नियमामुळेच असंतोष

By admin | Updated: May 4, 2017 22:14 IST

अभयारण्याला विरोध नाही : नियम लागू झाले तर येथील लोकांना जगणे मुश्कील होण्याची भीती

संजय पारकर --राधानगरी -हे अभयारण्य देशातीलच नव्हे, तर जगातील अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. जागतिक वारसास्थळात याचा समावेश झाला आहे. यामुळे राधानगरीची ख्याती सर्वत्र झाली याचा येथील लोकांना अभिमान आहे. अभयारण्य घोषित झाल्यावर वन संपदेत प्रचंड वाढ झाली. बाहेरील लोकांचा येथे ओघ वाढला आहे. त्यामुळे अभयारण्याला लोकांचा विरोध नाही. मात्र, याच्या जाचक नियमांचा फटका बसत असल्याने लोकांमध्ये असंतोष आहे.राधानगरी एवढे मोठे महत्त्व असलेले अभयारण्य आहे. मात्र, त्याचा पर्यटनस्थळ म्हणून अपेक्षित विकास झालेला नाही. वन्यजीव विभाग वर्षानुवर्षे विकास आराखडा तयार करून पाठवतो. कोट्यवधीची मागणी होते. मात्र, तुटपुंजा निधी मिळतो. त्यामुळे काहीच काम होत नाही. अभयारण्याला जोडून असलेली तीन मोठी धरणे, काही पर्यटनस्थळे विकसित झाली तर हा व्यवसाय वाढून अनेकांना रोजगार मिळू शकतो. कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, गोवा या राज्यांत अशी ठिकाणे मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहेत. त्याचा स्थानिकांना मोठा फायदा होतो. त्यामुळे लोकच यासाठी पुढे येतात अशी तेथे स्थिती आहे.तसे चित्र येथे दिसत नाही.याउलट वन्यजीव विभागाच्या जाचक निर्बंधामुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. त्याचा विकासावर विपरीत परिणाम झाला आहे. दहा वर्षांपूर्वी केंद्र शासनाच्या १२ व्या वित्त आयोगाकडून राज्याला मिळालेल्या निधीतून दाजीपूर येथील पर्यटन महामंडळाच्या निवासस्थानाच्या विकासासाठी पाच कोटी रुपये मिळाले होते. या कामाचे तत्कालीन मंत्र्यांनी उद्घाटन केले, पण वन्यजीव विभागाने त्यात खोडा घातल्याने ते रद्द झाले. राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा ता तीन तालुक्यांना वरदान ठरणारा धामणी धरण प्रकल्प वन्यजीव विभागाच्या आडकाठीमुळे रेंगाळला आहे. त्याची झळ लोक सहन करत आहेत. परिसरातील कामतेवाडी, बनाचीवाडी, फेजिवडे हे लघु प्रकल्प रखडल्याने मोठ्या प्रमाणात शेती कोरडवाहू राहिली आहे.वाकीघोलात जाणारा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जातो. तेथे डांबरीकरण व अन्य काम करण्यास मनाई आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्ता बंद होतो. परिणामी या भागाचा चार महिने संपर्क तुटतो. त्यावेळी त्यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. राधानगरी ते गगनबावडा यांना जोडणाऱ्या रस्त्यात केवळ दीड किलोमीटरचे अंतर आहे. मात्र, वन हद्दीमुळे हा रस्ता पक्का होण्यास अडथळा होत आहे.वन्यप्राण्यांकडून होणारा त्रास न सांगण्यासारखा आहे. आतापर्यंत हत्तीने दोन बळी घेतले आहेत. गव्यांनी यापेक्षा जास्त बळी घेतले आहेत. यामुळे मरण पावणाऱ्या पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे. मध्यंतरी सध्याच्या अभयारण्यात राधानगरी, भुदरगड व गगनबावडा तालुक्यांतील १४ गावे समाविष्ट करून याचे क्षेत्रफळ आणखी ८५ चौरस किमीने वाढवून ते ४३६.१६ किमी करण्याचा विचार चालू होता. हा प्रस्ताव केव्हाही डोके वर काढू शकतो.यासंदर्भात झालेल्या एका बैठकीत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सध्या वन विभाग केवळ दहा टक्के नियमांची सक्ती करतो, असे सांगितले होते. म्हणजे पूर्ण नियम लागू झाले तर येथील लोकांना जगणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनाबरोबर आम्हाला माणूस म्हणून जगण्याची सोय करा, एवढीच मागणी या लोकांची आहे.