शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

तीन शासकीय कार्यालयातील पाणीपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:17 IST

कोल्हापूर : शहरातील रेल्वे विभाग, समाज कल्याण, विभागीय वन या शासकीय कार्यालयांकडील लाखो रुपये थकबाकी भरणा न केल्यामुळे ...

कोल्हापूर : शहरातील रेल्वे विभाग, समाज कल्याण, विभागीय वन या शासकीय कार्यालयांकडील लाखो रुपये थकबाकी भरणा न केल्यामुळे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागातर्फे त्यांचे नळ कनेक्शन बुधवारी खंडित करण्यात आले. तर आयटी पार्कची थकबाकी असल्याने सोमवारीच त्यांचे नळ कनेक्शन खंडित करण्यात आले.

पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीपट्टी वसुली धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत बुधवारी रेल्वे विभागाकडील चार कनेक्शन, समाज कल्याण कार्यालयाचे एक कनेकशन, विभागीय वन कार्यालय यांचे एक कनेक्शन, आयटी पार्क यांचे एक कनेक्शन खंडित करण्यात आले.

ही कारवाई प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता नारायण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वसुली पथक प्रमुख मोहन जाधव, मीटर रीडर रमेश मगदूम, फिटर तानाजी माजगावकर, वसंत ढेरे यांनी भाग घेतला.

- शासकीय कार्यालयाकडील थकबाकी- सीपीआर कार्यालय (८,४२,०२,२२७ ), १२ ग्रामपंचायती (६,९४,६४,९२७), रेल्वे विभाग (२,०५,५३,१८८), पाटबंधारे, वारणा विभाग (९८,५९,७३१), सार्वजनिक बांधकाम कार्यालय (७१,७७,४६१), शिवाजी विद्यापीठ कार्यालय (६६,३८,६९६ ), पाटबंधारे पंचगंगा (६३,०५,९३३), जिल्हाधिकारी कार्यालय (२४,८९,०८१), सीपीआर अधिष्ठाता (२०,२३,९३७), जिल्हा परिषद कार्यालय (१८,५३,३१२), टेलिफोन विभाग (१६,१७,३६१).

शासकीय कार्यालये व अन्य शासकीय कार्यालयाकडील सुमारे २१ कोटींची थकबाकी असून, ती थकीत त्वरित भरण्याबाबत पाणीपुरवठा कार्यालयाकडून यापूर्वी वारंवार लेखी नोटीस देण्यात आली आहे. तसेच बलकवडे यांनी संबंधित विभागप्रमुख यांना अर्धशासकीय पत्र देण्यात आले आहे. जर संबंधित कार्यालयांनी थकीत रक्कम भरणा केला नाही तर पाणी कनेक्शन खंडित करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.