शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

चांदोलीच्या विस्थापितांना गलथान कारभाराचा फटका

By admin | Updated: April 13, 2015 00:08 IST

दयनीय अवस्था : अभयारण्यग्रस्तांच्या नशिबी अजूनही हालअपेष्टाच

मलकापूर : शासनाच्या गलथान कारभाराचा फटका चांदोली अभयारण्यातील विस्थापितांना बसत आहे. स्वत:च्या जमिनी शासनाकडे सोपवून विस्थापित झालेल्या आठ गावांतील कुटुंबीयांना हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. ‘ना नोकरी ना धंदा’ अशी अवस्था विस्थापित कुटुंबीयांची बनली आहे. शासनाने योग्य सुविधा न दिल्यामुळे या विस्थापितांची दयनीय अवस्था बनली आहे.गेल्या दहा वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्या चांदेल, ठाकळे, निवळे, तनाळी, देवाचे गोठणे, सोनार्लीपैकी धनगरवाडी, कुल्याचीवाडी या गावातील चांदोली अभयारण्यग्रस्तांना अनेक जीवघेण्या यातना भोगाव्या लागत आहेत. राहायला घर नाही, शेतीवाडी नाही, पोटाला अन्न नाही, अशी अवस्था या गावातील विस्थापित कुटुंबाची झाली आहे. सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याचा पर्याय त्यांच्याजवळ शिल्लक राहिला आहे.राज्य शासनाच्या वन विभागाने २३.९३० हेक्टर क्षेत्रांमध्ये चांदोली अभयारण्य करण्याच्या घोषणेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील चांदेल, निवळे, ढाकळे, सोनार्लीपैकी धनगरवाडी, कुल्याचीवाडी, तनाळी या सहा गावांची अनुक्रमे भादोले, नवे पारगाव, वाठार, पेठवडगाव (ता. हातकणंगले), बोरपाडळे (ता. पन्हाळा) या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली, पण आजही या वसाहती मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. येथील काहींना अद्याप जमीन मिळालेली नाही, तर काही ठरावीक लोकांना अपुऱ्या जमिनी मिळाल्या आहेत.चांदोली अभयारण्य पूर्ण क्षमतेने विकसित करण्यात आल्यामुळे तेथे जंगली प्राण्यांच्या संख्येत वाढ होत आहे. श्वापदांच्या मुक्त वावरण्याने उदगिरी धनगरवाडा ग्रामस्थांनादेखील या प्राण्यांचा त्रास होत आहे. देवाचे गोठणे, सोनार्ली, धनगरवाडा या गावांतील कुटुंबांचे पुनर्वसन केले असले तरी त्यांना अद्याप सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. शासनाने या अभयारण्यग्रस्तांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकालात काढावा.त्यांच्या मुलांना शासकीय नोकरीत अग्रक्रमाने घ्यावे. त्यांना स्थलांतरित केलेल्या वसाहतींना मूलभूत सुविधा पुरवाव्यात. त्यांना जमीन उपलब्ध करून द्यावी. शासकीय अधिकाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबवावी. अभयारण्यग्रस्तांना शाहूवाडी ते कोल्हापूर असे हेलपाटे शासकीय कार्यालयात मारावे लागत आहेत. शासनाकडून मिळालेली तुटपुंजी रक्कम संपली आहे. विस्थापित कुटुंबाची अवस्था ना घरका ना घाटका, अशी झाली आहे. नोकरीसाठी सरकारी उंबरठे झिजवणे सुरूचथोड्या प्रमाणात मिळालेली रक्कमही उदरनिर्वाहासाठी संपून गेली. भूकंपग्रस्त निधी, झाडाचे पैसे, उदरनिर्वाह भत्ता अद्याप मिळालेला नाही. शासनाकडून प्रकल्पग्रस्त विशेषत: अभयारण्यातून व्यक्ती म्हणून कुटुंबातील एका व्यक्तीस प्राधान्याने नोकरी देण्याच्या कायद्याच्या बंधनाची सक्ती असताना कुटुंबातील लोकांना नोकरी अद्याप दिलेली नाही. नोकरीसाठी युवकांचे सरकारी उंबरठे झिजवणे सुरू आहे.