शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

वळवाच्या हुलकावणीने मशागती खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:55 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पेरण्यांच्या मशागती खोळंबल्या आहेत. परिणामी ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पेरण्यांच्या मशागती खोळंबल्या आहेत. परिणामी २५ मे रोजी ‘रोहिणी’ नक्षत्रावर होणारा पेरा अडचणीत आला आहे. यंदा २ लाख ५७ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७ हजार हेक्टरने क्षेत्र वाढले आहे.जिल्ह्यात खरिपासाठी ४ लाख हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असते. त्यात पिकांच्या फेरपालटीमुळे थोडेफार कमीअधिक होते. गेल्यावर्षी मे महिन्यापर्यंत तीन-चार वळीव पावसाने हजेरी लावल्याने मशागत चांगल्या झाल्या होत्या. ‘रोहिणी’ नक्षत्रात बहुतांशी धूळवाफ पेरण्या झाल्या होत्या. भाताचे १ लाख १० हजार ५३७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र होते, त्यापैकी १ लाख ८ हजार २६६ हेक्टरवर पेरणी झाली. कडधान्य, भुईमूग व सोयाबीनच्या पेरण्या ९३ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्या होत्या; पण मृग नक्षत्रात सुरू झालेल्या पावसाने सलग तीन महिने झोडपून काढल्याने ज्वारीच्या पेरण्यांवर परिणाम झाला. पावसाने उघडीपच न दिल्याने ज्वारीचे ६३३९ हेक्टरपैकी केवळ २९१६ हेक्टरवरच पेरण्या झाल्या. त्यामुळे भात व नागलीच्या रोप लागणीचे क्षेत्र वाढले. सर्वांत कमी पेरणी हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत झाली.गेल्या वर्षीच्या पावसाचा अंदाज गृहीत धरून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली असली, तरी वळीव पाऊस नसल्याने मशागतीला अडचणी येत आहेत. रब्बीची पिके काढून शिवारे मोकळी झाली आहेत. शेणखत विस्कटून नांगरटीच्या दोन-तीन पाळ्या झाल्या की रान पेरणीसाठी लगेच हाताखाली येते; पण वळीव पाऊसच नसल्याने अनेक ठिकाणी नांगरटी खोळंबल्या आहेत. २५ मे रोजी रात्री ८.२५ वाजता सूर्य ‘रोहिणी’ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. साधारणता ‘रोहिणी’चा पेरा साधण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड असते. येत्या आठ दिवसांत वळवाने हजेरी लावली तरी पेरण्या वेळेत होतील. गेल्या वर्षी मृगानंतर एकसारखी पावसाने सुरुवात केली असली तरी धूळवाफ कमी होऊन रोप लागण वाढली. तरीही गत वर्षी २ लाख ५० हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा खरीप क्षेत्रात ७ हजार हेक्टरने वाढ झाली असून, २ लाख ५७ हजार हेक्टर पेरक्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक भाताचे १ लाख १० हजार हेक्टर आहे. कडधान्याचे ८०० हेक्टर असून भूईमूग ५२ हजार, तर सोयाबीन ५३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे.पाखाळ्यांकडे शेतकºयांच्या नजराजोतिबाची चैत्र यात्रा झाली की त्या पुढील पाच रविवारी होणाºया पाखाळणीला हमखास पाऊस लागतोच, हा इतिहास आहे. त्यामुळे शेतकºयांच्या नजरा प्रत्येक पाखाळण्याकडे होत्या; पण यंदा पाचही पाखाळण्या कोरड्या गेल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.उसाचे १.४०लाख हेक्टर क्षेत्रजिल्'ात उसाचे १ लाख ४० हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. गत वर्षी १०० टक्के उसाची लागण झाली. यंदाही तेवढ्याच क्षेत्रात उसाची लागवड केली आहे.शेतकºयांची धाकधूक वाढलीत्यात यंदा मान्सून लांबण्याचा अंदाज दिल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली आहे. जिथे पाण्याची सोय आहे, तिथेच भात, सोयाबीनच्या पेरणीची धाडस शेतकरी करणार आहे. उर्वरित ठिकाणी पावसाचा अंदाज बघूनच पेरणी करेल.पीक पेर क्षेत्रभात १,१०,५००ज्वारी ५,१००नागली २१,५००मका २,७००तूर २,३००मूग १,८००उडीद १,६००भुईमूग ५२,९०१सोयाबीन ५३,५००ऊस १,४०,७००एकूण ३,९२,६०१