शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वळवाच्या हुलकावणीने मशागती खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:55 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पेरण्यांच्या मशागती खोळंबल्या आहेत. परिणामी ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पेरण्यांच्या मशागती खोळंबल्या आहेत. परिणामी २५ मे रोजी ‘रोहिणी’ नक्षत्रावर होणारा पेरा अडचणीत आला आहे. यंदा २ लाख ५७ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७ हजार हेक्टरने क्षेत्र वाढले आहे.जिल्ह्यात खरिपासाठी ४ लाख हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असते. त्यात पिकांच्या फेरपालटीमुळे थोडेफार कमीअधिक होते. गेल्यावर्षी मे महिन्यापर्यंत तीन-चार वळीव पावसाने हजेरी लावल्याने मशागत चांगल्या झाल्या होत्या. ‘रोहिणी’ नक्षत्रात बहुतांशी धूळवाफ पेरण्या झाल्या होत्या. भाताचे १ लाख १० हजार ५३७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र होते, त्यापैकी १ लाख ८ हजार २६६ हेक्टरवर पेरणी झाली. कडधान्य, भुईमूग व सोयाबीनच्या पेरण्या ९३ टक्क्यांपेक्षा अधिक झाल्या होत्या; पण मृग नक्षत्रात सुरू झालेल्या पावसाने सलग तीन महिने झोडपून काढल्याने ज्वारीच्या पेरण्यांवर परिणाम झाला. पावसाने उघडीपच न दिल्याने ज्वारीचे ६३३९ हेक्टरपैकी केवळ २९१६ हेक्टरवरच पेरण्या झाल्या. त्यामुळे भात व नागलीच्या रोप लागणीचे क्षेत्र वाढले. सर्वांत कमी पेरणी हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत झाली.गेल्या वर्षीच्या पावसाचा अंदाज गृहीत धरून शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली असली, तरी वळीव पाऊस नसल्याने मशागतीला अडचणी येत आहेत. रब्बीची पिके काढून शिवारे मोकळी झाली आहेत. शेणखत विस्कटून नांगरटीच्या दोन-तीन पाळ्या झाल्या की रान पेरणीसाठी लगेच हाताखाली येते; पण वळीव पाऊसच नसल्याने अनेक ठिकाणी नांगरटी खोळंबल्या आहेत. २५ मे रोजी रात्री ८.२५ वाजता सूर्य ‘रोहिणी’ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. साधारणता ‘रोहिणी’चा पेरा साधण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड असते. येत्या आठ दिवसांत वळवाने हजेरी लावली तरी पेरण्या वेळेत होतील. गेल्या वर्षी मृगानंतर एकसारखी पावसाने सुरुवात केली असली तरी धूळवाफ कमी होऊन रोप लागण वाढली. तरीही गत वर्षी २ लाख ५० हेक्टरवर पेरणी झाली होती. त्या तुलनेत यंदा खरीप क्षेत्रात ७ हजार हेक्टरने वाढ झाली असून, २ लाख ५७ हजार हेक्टर पेरक्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक भाताचे १ लाख १० हजार हेक्टर आहे. कडधान्याचे ८०० हेक्टर असून भूईमूग ५२ हजार, तर सोयाबीन ५३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र आहे.पाखाळ्यांकडे शेतकºयांच्या नजराजोतिबाची चैत्र यात्रा झाली की त्या पुढील पाच रविवारी होणाºया पाखाळणीला हमखास पाऊस लागतोच, हा इतिहास आहे. त्यामुळे शेतकºयांच्या नजरा प्रत्येक पाखाळण्याकडे होत्या; पण यंदा पाचही पाखाळण्या कोरड्या गेल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.उसाचे १.४०लाख हेक्टर क्षेत्रजिल्'ात उसाचे १ लाख ४० हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. गत वर्षी १०० टक्के उसाची लागण झाली. यंदाही तेवढ्याच क्षेत्रात उसाची लागवड केली आहे.शेतकºयांची धाकधूक वाढलीत्यात यंदा मान्सून लांबण्याचा अंदाज दिल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली आहे. जिथे पाण्याची सोय आहे, तिथेच भात, सोयाबीनच्या पेरणीची धाडस शेतकरी करणार आहे. उर्वरित ठिकाणी पावसाचा अंदाज बघूनच पेरणी करेल.पीक पेर क्षेत्रभात १,१०,५००ज्वारी ५,१००नागली २१,५००मका २,७००तूर २,३००मूग १,८००उडीद १,६००भुईमूग ५२,९०१सोयाबीन ५३,५००ऊस १,४०,७००एकूण ३,९२,६०१