शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेतील मुलाखत : भास्करराव पेरे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:17 IST

काेल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले असून, ग्रामीण राजकारण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. निवडणुकीत साम, ...

काेल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले असून, ग्रामीण राजकारण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. निवडणुकीत साम, दाम, दंड या नीतीचा सर्रास वापर होतो. कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायतीवर आपली सत्ता आणण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींत टोकाचा संघर्ष पाहावयास मिळतो. मात्र सत्ता आल्यानंतर विकास कामात ती इर्षा दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात अजूनही वाड्या-वस्त्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्या आहेत. ग्रामीण विकासासाठी स्थानिक नेत्यांसह सदस्यांनी कोणती भूमिका घेऊन ग्रामपंचायतींमध्ये जावे, याबाबत पाटोदा (जि. औरंगाबाद) चे आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांच्याशी साधलेला संवाद.....

प्रतिष्ठेसाठी गावाचे वाटाेळे करू नये : भास्करराव पेरे-पाटील

भावकी, जात, धर्माच्या आधारे निवडणुका होऊ नयेत : विकासाची दृष्टी, अभ्यासू असणाऱ्यांनाच मतदारांनी निवडून द्यावे

प्रश्न : पाटोदा गावच्या विकासाचे सूत्र काय आहे?

उत्तर : पाटोदा आदर्श करण्यासाठी मी काय जादूची कांडी वापरली नाही. ग्रामस्थांच्या खूप कमी अपेक्षा ग्रामपंचायतीकडून असतात. आपण मूलभूत सुविधांची वेळेत पूर्तता केली की लोक समाधानी राहतात. त्याशिवाय खूप करण्यासारखे असते, तशी दृष्टी ठेवून आपण वाटचाल केली, तर महाराष्ट्रातील सर्वच गावे ‘पाटोदा’ होण्यास वेळ लागणार नाही.

प्रश्न ; महाराष्ट्रातील अनेक गावेही आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करताना दिसत आहेत?

उत्तर : ही वस्तुस्थिती आहे. अर्ध्या महाराष्ट्रात पाणी नाही, पाण्याबरोबर अनेक गावे रस्त्याविना चाचपडत पुढे जाताना पाहून खूप वेदना होतात. दोेष कोणाला द्यायचा? दोष देत बसण्यापेक्षा ग्रामपंचायतींने सक्षमपणे विकासाचा आराखडा तयार करून पुढे गेले पाहिजे. त्यासाठी सरपंच व सदस्यांची इच्छाशक्ती पाहिजे. ती असेल, तर गावाला विकासापासून कोणी रोखू शकत नाही.

प्रश्न : शासन कोट्यवधीचा निधी ग्रामस्तरावर देते, मग खेडी विकासाऐवजी भकास कशी?

उत्तर : आईला गर्भ राहिल्यापासून ते मनुष्याच्या मरणापर्यंत ग्रामपंचायत वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसाठी काम करीत असते. सेवा-सुविधा पुरवित असते. गावकी-भावकीच्या राजकारणात आपण आपले भविष्य पुसून टाकत आहोत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. शासनाच्या ग्रामपंचायतीसाठी अनेक योजना आहेत. मात्र यामधील किती योजना आपल्याला माहिती आहेत. जात, धर्म यामधून जे सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत. ते आपण अजून मिटवू शकलो नाही. ते प्रश्न जैसे थे असताना, दररोज नवनवीन सामाजिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. मग खेडी भकास होणार नाही तर काय होणार.

प्रश्न : ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत, इच्छुकांची भाऊगर्दी पाहावयास मिळते?

उत्तर : माझ्या मते ज्याला गावासाठी वेळ देता येतो, त्यांनीच निवडणुकीला उभे रहावे. प्रतिष्ठेसाठी गावाचे वाटोळे करू नये, विकासाची दृष्टी असणाऱ्यांनीच जनतेसमोर मते मागण्यासाठी जावे.

प्रश्न : नवीन येणाऱ्या सरपंच व सदस्यांना आपण काय सांगाल?

उत्तर : रस्ते, गटारी, पाणी या मूलभूत गरजांची पूर्तता सगळ्यांनाच करावी लागते, किंबहुना ते आपले कर्तव्यच आहे. त्याशिवाय खूप करण्यासारखे आहे. गाव सर्वांगीण कसे समृध्द होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. शासकीय निधी योग्य ठिकाणी आणि दर्जेदारपणे खर्च झाला पाहिजे. जिथे विकास कामात आर्थिक स्वार्थ गुंतला आहे, तिथे कागदावरच विकास दिसतो. सरपंच व सदस्यांनी हे प्रकर्षाने टाळावे, यासाठीच ज्याच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगले आहे, जे वेळ देऊ शकतात, त्यांनीच ग्रामपंचायतीमध्ये यावे, असे सांगत असतो.

प्रश्न : आपण पाटोळेचा कायापालट करण्यासाठी विकासनिधी कसा आणला?

उत्तर : ग्रामपंचायतीला खूप निधी येतो. पैशाची कमतरता अजिबात नाही. अलीकडे तर थेट ग्रामपंचायतींना निधी येतो. फक्त त्याचे नियोजन व्यवस्थित करून शंभर टक्के खर्च करण्याची मानसिकता आपली हवी.

प्रश्न : निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय आवाहन कराल?

उत्तर : ग्रामपंचायत निवडणुका भावकी, जात, धर्म यांच्या आधार घेऊन होऊ नयेत. आरोग्य, व्यसनाधीनता, रोजगार आणि गावाचा सर्वार्थाने विकास करणाऱ्याच्या मागे उभे राहा. जात-भावकीसाठी मत वाया घालवून येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य कोणाच्याही दावणीला बांधू नका.

दडपशाहीने बिनविरोधपेक्षा निवडणूकच बरी

गावच्या भल्यासाठी चार माणसे बसून गावातील अंतर्गत विरोध मिटवत असतील व ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल, तर त्याचे स्वागत करायला हवे. मात्र पैशाचे आमिष दाखवून कोणी ग्रामपंचायत बिनविरोध करू पाहत असेल, तर निवडणूक व्हायला हवी. ही निवडणूक निकोप असावी. गावाच्या भल्यासाठी कोणी झटू पाहत असेल तर अशा होतकरू व्यक्तीला जात, भावकी, धर्म विसरून ग्रामस्थांनी साथ द्यायला हवी, असे आवाहन पेरे-पाटील यांनी केले.