शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

पदाधिकारी निवडीवेळी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर सभागृहामध्ये अधिकारी का आले नाहीत, याची चर्चा आता सुरू झाली आहे. राजवर्धन निंबाळकर ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर सभागृहामध्ये अधिकारी का आले नाहीत, याची चर्चा आता सुरू झाली आहे. राजवर्धन निंबाळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही हा विषय गांभीर्यांने घेतला असून, याबाबत त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्याकडे विचारणा केली आहे.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर एकदा का पीठासन अधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण करून निघून गेले की, त्यानंतर जिल्हा परिषदेचे अधिकारी सभागृहात येतात आणि नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतात, अशी पद्धत आहे. परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नंतरच्या सभापती निवडीवेळीही अधिकारी उपस्थित नसल्याने भाजपचे सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

सोमवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते. त्यांनी नूतन अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे अभिनंदन केले. परंतु सभागृहातील निवड प्रक्रिया संपली आहे, असा निरोपच न गेल्याने अन्य खाते प्रमुख सभागृहात आलेच नाहीत. यातील अनेक अधिकारी जवळपास थांबून होते; परंतु माहिती न मिळाल्याने सर्वजण बाहेर थांबले.

मंगळवारीही हाच प्रकार घडला. खुद्द चव्हाण हे निवड प्रक्रिया झाली की सभागृहात येऊन नूतन चारही सभापतींचे अभिनंद करणार होते. त्यासाठी ते निरोपाच्या प्रतीक्षेत होते. परंतु निवड झाल्याचा त्यांना निरोपच मिळाला नाही. ते जिल्हा परिषदेत येईपर्यंत निवडी होऊन, भाषणेही झाली. जिल्हा परिषदेच्या प्रवेशदारात गर्दीतच मग चव्हाण यांनी या चारही पदाधिकाऱ्यांच्या पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. याबाबत त्यांनी मनीषा देसाई यांच्याकडे चौकशी केली. मी तुमच्या निरोपाची वाट पाहत होतो. तो वेळेत दिला असता तर सभागृहातच अभिनंदन करता आले असते, असे ते म्हणाले. या वेळी सामान्य प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तसा प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात निरोप दिला असल्याचे देसाई यांनी सांगितले. तसेच निवड प्रक्रिया सुरू असताना अन्य अधिकारी सभागृहात उपस्थित नसतात, असेही त्या म्हणाल्या.

चौकट

अधिकाऱ्यांची धावाधाव

सभागृहातच नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करता न आल्याने मग नंतरच्या तासाभरात आपापल्या समित्यांच्या सभापतींचे अभिनंदन करताना अधिकाऱ्यांची धावाधाव झाली. सभापती नेमके कुठे आहेत अशी विचारणा करून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अधिकारी पोहोचले.