शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

पदाधिकारी निवडीवेळी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर सभागृहामध्ये अधिकारी का आले नाहीत, याची चर्चा आता सुरू झाली आहे. राजवर्धन निंबाळकर ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर सभागृहामध्ये अधिकारी का आले नाहीत, याची चर्चा आता सुरू झाली आहे. राजवर्धन निंबाळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही हा विषय गांभीर्यांने घेतला असून, याबाबत त्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्याकडे विचारणा केली आहे.

जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीनंतर एकदा का पीठासन अधिकारी निवड प्रक्रिया पूर्ण करून निघून गेले की, त्यानंतर जिल्हा परिषदेचे अधिकारी सभागृहात येतात आणि नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतात, अशी पद्धत आहे. परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नंतरच्या सभापती निवडीवेळीही अधिकारी उपस्थित नसल्याने भाजपचे सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

सोमवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते. त्यांनी नूतन अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे अभिनंदन केले. परंतु सभागृहातील निवड प्रक्रिया संपली आहे, असा निरोपच न गेल्याने अन्य खाते प्रमुख सभागृहात आलेच नाहीत. यातील अनेक अधिकारी जवळपास थांबून होते; परंतु माहिती न मिळाल्याने सर्वजण बाहेर थांबले.

मंगळवारीही हाच प्रकार घडला. खुद्द चव्हाण हे निवड प्रक्रिया झाली की सभागृहात येऊन नूतन चारही सभापतींचे अभिनंद करणार होते. त्यासाठी ते निरोपाच्या प्रतीक्षेत होते. परंतु निवड झाल्याचा त्यांना निरोपच मिळाला नाही. ते जिल्हा परिषदेत येईपर्यंत निवडी होऊन, भाषणेही झाली. जिल्हा परिषदेच्या प्रवेशदारात गर्दीतच मग चव्हाण यांनी या चारही पदाधिकाऱ्यांच्या पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. याबाबत त्यांनी मनीषा देसाई यांच्याकडे चौकशी केली. मी तुमच्या निरोपाची वाट पाहत होतो. तो वेळेत दिला असता तर सभागृहातच अभिनंदन करता आले असते, असे ते म्हणाले. या वेळी सामान्य प्रशासन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून तसा प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात निरोप दिला असल्याचे देसाई यांनी सांगितले. तसेच निवड प्रक्रिया सुरू असताना अन्य अधिकारी सभागृहात उपस्थित नसतात, असेही त्या म्हणाल्या.

चौकट

अधिकाऱ्यांची धावाधाव

सभागृहातच नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करता न आल्याने मग नंतरच्या तासाभरात आपापल्या समित्यांच्या सभापतींचे अभिनंदन करताना अधिकाऱ्यांची धावाधाव झाली. सभापती नेमके कुठे आहेत अशी विचारणा करून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अधिकारी पोहोचले.