शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

By admin | Updated: September 15, 2014 23:20 IST

मुक्त विद्यापीठ : शासनाच्या घटनाबाह्य कारभाराची पुष्टी

शिवाजी सावंत -गारगोटी -मुक्त विद्यापीठात शिकणाऱ्या सुमारे दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्री शिप नाकारुन शासनाने घटनाबाह्य कारभाराची पुष्टी केल्याचे कृतीतून सिद्ध केले असून मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे.घरचे अठराविश्व दारिद्र्य त्यामुळे नोकरी अथवा कोठे तरी काम करावे लागते. पण शिक्षण घेण्याची अनिवार इच्छाशक्ती काम करताना शिक्षणाची कवाडे शोधत असतात हे चित्र आहे दीनदलित मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांचे. या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी मुक्त विद्यापीठ व दूरशिक्षण पद्धती अस्तित्वात आली. विद्यापाठातून भटके-विमुक्त, जाती-जमाती, आर्थिक दुर्बल घटक, महिला अशा समाजातील वंचित घटकातील विद्यार्थी प्रवेश घेत असतो. मुळातच या प्रवर्गातील विद्यार्थी शिक्षण व समाजापासून दूर आहे. अशा या प्रवाहाबाहेरील घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागरण करणे, त्यांना सुविधा देणे आवश्यक असताना त्यांची स्कॉलरशिप, फ्री शिप नाकारुन शासन त्यांना प्रवाहाबाहेर ढकलण्यासाठी जाणीवपूर्व प्रयत्न करीत आहे का? असे या धोरणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.मुक्त विद्यापीठांच्या कोल्हापूर विभागाचा विचार करता शैक्षणिक साल २०१३-१४ या वर्षात २१ हजार ४८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर संपूर्ण राज्यात मुक्त विद्यापीठाच्या दहा विभागात दोन ते अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा व त्यांच्यापुढील पिढीचा विचार करून शासनाने हा निर्णय त्वरित मागे घेऊन या विद्यार्थ्यांना पाठबळ देणे आवश्यक आहे, अन्यथा अडीच लाख कुटुंबांवर वाताहतीची वेळ येईल. मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर केंद्राचे संचालक डॉ. एस. एस. चौगले यांनी कोल्हापूर विभागाचे समाजकल्याण आयुक्त गायकवाड यांना अशा आशयाचे निवेदन दिले आहे. यावेळी मधुकर बोरसे, यशवंत पाटील, विजयसिंह रजपूत, विश्वजित भोसले आदी उपस्थित होते.