शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

‘गोकुळ’च्या संचालकांना डामडौल विसरावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालकांच्या खर्चासह इतर कारभारावर नेत्यांचा अंकुश राहणार आहे. संचालक म्हटले ...

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालकांच्या खर्चासह इतर कारभारावर नेत्यांचा अंकुश राहणार आहे. संचालक म्हटले की, जो डामडौल असायचा, तो आता विसरावा लागणार आहे. एकूणच कारभारातील काटकसर, व्यवस्थापनाला शिस्त, दूध वाढीसह इतर ‘ॲक्शन प्लॅन’ नेत्यांनी तयार केला असून, संघाच्या हिताला बाधा ठरेल, असे एकालाही काम करता येणार नाही, असा दमच नेत्यांनी संचालकांना दिला आहे.

जिल्ह्याच्या राजकारण व अर्थकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या ‘गोकुळ’ व जिल्हा बँकेवरील सत्तेला खूप महत्त्व आहे. येथील सत्तेचे पडसाद ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या राजकारणावर पडतात. म्हणूनच ‘गोकुळ’ ताब्यात घेण्यासाठी विरोधी आघाडीने मोट बांधली आणि त्यात यश मिळवले. पारदर्शी कारभार करून दूध उत्पादकांना दोन रुपये जादा दर देण्याचे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सभासदांना दिले आहे. त्यानुसार आता कारभार करावा लागणार आहे.

आमदारकी नको; पण ‘गोकुळ’चे संचालकपद हवे, अशी प्रतिमा समाजात निर्माण झाली आहे. त्याला कारणेही तशीच आहेत, निवडून गेले की, पाच वर्षांत संचालकाचा चेहरा-मोहराच बदलतो. नोकरभरती, विविध टेंडर या सगळ्यातून मिळणाऱ्या अर्थार्जनाची चर्चा सामान्य माणसात अधिक आहे. या सगळ्या प्रकारामुळे जिल्हा बँक आतबट्ट्यात आली होती, सत्तेवर येताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी सगळ्या गोष्टींना फाटा देत एकूणच व्यवस्थापनाला शिस्त लावली आणि बँक पाच वर्षांत राज्यात आदर्शवत बनवली. ‘गोकुळ’ दूध संघ सक्षम आहे. मात्र, तेथील काही जुन्या प्रथांना पायबंद घालण्याची गरज आहे. काटकसर, व्यवस्थापनाला शिस्त लावत असतानाच दूध उत्पादकांना दोन रुपये जादा दर कसा द्यायचा, याचा ॲक्शन प्लॅन तयार केला खरा. मात्र, त्याची अंमलबजावणी त्याच ताकदीने झाली तरच सामान्य दूध उत्पादकांना चार पैसे जादा मिळतील.

नेतृत्वाच्या ‘विश्वासा’ची कसोटी

‘गोकुळ’च्या इतिहासात पहिल्यांदाच सभासदांनी परिवर्तन केले. विरोधी आघाडीच्या नेत्यांनी गेली पाच वर्षे केलेला संघर्ष, त्यातून सभासदांमध्ये निर्माण केलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले. आता सभासदांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत असताना त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता कारभार करताना नेत्यांची कसोटी लागणार आहे.

‘काळ बदलला... दृष्टिकोन बदलला’ होर्डिंग लक्षवेधी

‘गोकुळ’च्या संचालकांचे अभिनंदन करणारे होर्डिंग सध्या लक्षवेधी ठरत आहेत.‘ काळ बदलला... दृष्टिकोन बदलला, आता वर्तमान बदलू या, गोकुळ समृद्ध बनवू या.’ अशा प्रकारचे नवीद मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचे अनेक होर्डिंग कारभाराची दिशा सांगून जातात.