शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

अंतरिम पगारवाढीऐवजी थेट पगारवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:25 IST

यड्राव : राज्यातील साखर कामगार गेल्या तीस महिन्यांपासून पगारवाढीच्या प्रतीक्षेत होता. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे पगारवाढीचा प्रश्न भिजत पडला ...

यड्राव : राज्यातील साखर कामगार गेल्या तीस महिन्यांपासून पगारवाढीच्या प्रतीक्षेत होता. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे पगारवाढीचा प्रश्न भिजत पडला होता. त्यातच त्रिपक्षीय समितीची संपत आलेली मुदत, साखर कारखान्याचा तोंडावर आलेला गळीत हंगाम यामध्ये साखर कामगारांचा असंतोष वाढण्याची शक्यता असल्याने कामगार संघटनांनी घेतलेली भूमिका व शरद पवार यांची मध्यस्थी सफल झाली. यामुळे राज्यातील दीड लाख साखर कामगारांना पगारवाढीच्या स्वरुपात बाप्पा पावला आहे.

साखर संकुल पुणे येथे झालेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत अंतरिम पगारवाढीऐवजी थेट पगारवाढीचा निर्णय घेऊन बारा टक्के वेतनवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यातील साखर कामगारांचा वेतन करार ३१ मार्च २०१९ रोजी संपला होता. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळासह विविध कामगार संघटनांच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे शासनाने त्रिपक्षीय समिती नेमली. दरम्यानच्या काळात कोरोनाचे संकट व संचारबंदीसह विविध कारणांमुळे निर्णय प्रक्रियेला विलंब लागला. साखर कारखानदार कमी पगारवाढीवर ठाम, तर कामगार संघटनांची मागणी जादा वाढीची भूमिका यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समन्वय साधून तोडगा काढल्याने साखर कामगारांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा झाला.

एप्रिल२०१४ ला झालेल्या पगारवाढीवेळी वेतनाची अंमलबजावणी पंधरा महिन्यांनंतर झाली होती. यामुळे पंधरा महिन्यांच्या फरकावर पाणी सोडावे लागले होते. यावेळी करार संपलेल्या तारखेपासून पगरवाढीची अंमलबजावणी होणार असल्याने तीस महिन्यांचा फरक कामगारांना मिळणार आहे.

प्रतिक्रिया

साखर कामगारांचे वेतन करार संपल्यावर त्रिपक्षीय समिती अंतरिम वाढ देऊन नंतर पगारवाढीचा निर्णय घेत होती. परंतु यावेळी अंतरिम पगारवाढीऐवजी थेट पगार वाढ होत असल्याने चांगली पगारवाढ झाली आहे. उशिरा का असेना पण थेट पगारवाढ व्हावी यासाठी आमचा आग्रह होता, तो पूर्ण झाला.

रावसाहेब पाटील, सदस्य त्रिपक्षीय समिती

टक्केवारी कमी, रुपयात वाढ

वेतन करार कालावधी---- टक्के वाढ------ रुपये वाढ

एप्रिल२००५ ते मार्च २००९- १५% वाढ रु. ८०० ते ९००

एप्रिल २००९ ते मार्च २०१४ - १८% रु.१३०० ते १५००

एप्रिल २०१४ ते मार्च २०१९- १५% रु. २००० ते २३००

एप्रिल २०१९ ते मार्च २०२४- १२% रु. २४०० ते २७५०