शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर २६ जूनला धरणे

By admin | Updated: June 18, 2014 00:54 IST

टोलचा प्रश्न : सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचा निर्णय

कोल्हापूर : टोलविरोधातील लढाई ही कोल्हापूरच्या अस्मितेची व स्वाभिमानाची लढाई असून, त्याची जाणीव राज्य सरकारला करून देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कऱ्हाड येथील निवासस्थानी एक दिवसाचे लाक्षणिक धरणे धरण्याचा निर्णय आज, मंगळवारी येथे सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीतर्फे घेण्यात आला. अन्यायग्रस्त जनतेला ज्यांनी स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिवशी म्हणजे २६ जून रोजी हे धरणे धरण्यात येणार आहे.आज सायंकाळी येथील हिंदू एकता पक्षाच्या कार्यालयात कृती समितीची बैठक निवासराव साळोखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर शहरात आयआरबी कंपनीने टोलवसुली सुरू केली असून त्याच्याविरोधात गेल्या चार वर्षांपासून कोल्हापूरकरांनी आंदोलन छेडले आहे. तरीही सरकार टोल रद्द करण्याचा निर्णय घेत नाही. म्हणून आता राज्यकर्त्यांना तसा निर्णय घेण्यास भाग पाडण्याकरिता मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कऱ्हाड येथील निवासस्थानासमोर धरणे धरण्याचा आग्रह मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी धरला, त्यावेळी सर्वांनी तो तत्काळ मान्य केला. शाहू जयंतीदिवशी दसरा चौक येथे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घातल्यानंतर सर्व आंदोलक विविध वाहनांतून कऱ्हाड येथे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या घरासमोर जाऊन धरणे धरतील. ज्यांना या धरणे आंदोलनात भाग घ्यायचा आहे, त्यांनी कृती समितीकडे नावनोंदणी करावी, असे आवाहन साळोखे यांनी केले. या आंदोलनात कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजप-शिवसेना पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही सहभागी व्हावे आणि कोल्हापूरकरांच्या एकजुटीचे दर्शन घडवावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.