शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पतंगरावांना धोबीपछाड, जयंतरावांना धक्का

By admin | Updated: February 23, 2017 22:50 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : भाजपमधील आयात नेत्यांचं ‘चांगभलं’; समीकरणे बदलली

सांगली : जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातील वजनदार नेते म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील आणि कॉँग्रेस नेते आ. पतंगराव कदम यांना सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून क्लिन बोल्ड व्हावे लागले. दुसरीकडे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांचे या निवडणुकीने चांगभलं केलं असून, जिल्ह्यात व पक्षीय स्तरावर त्यांचे वजन वाढले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील नेतृत्वाची स्पर्धा सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांमध्ये लागली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील, कॉँग्रेसचे पतंगराव कदम, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, भाजपचे खासदार संजयकाका पाटील, माजी आ. पृथ्वीराज देशमुख आदी नेते आघाडीवर होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही त्यांच्या मुलाच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. दुसरीकडे शिवसेनेची व मतदारसंघातील स्वत:ची ताकद सिद्ध करण्यासाठी आ. अनिल बाबर यांनी शड्डू ठोकला होता. त्यामुळे या नेत्यांनी अस्तित्वाची लढाई पूर्ण ताकदीने लढली. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक धक्का पतंगराव कदम यांना बसला. सत्तेपर्यंत पोहोचणारा पक्ष म्हणून कॉँग्रेसची गणती केली जात होती. या पक्षाचे नेतृत्व सध्या पतंगराव कदम यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. याशिवाय कडेगाव आणि पलूस हे दोन तालुके पतंगरावांचे बालेकिल्ले समजले जातात. या दोन्ही तालुक्यात त्यांना केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी या दोन्ही तालुक्यात देवराष्ट्रे वगळता सर्व जागा जिंकून आपली ताकद सिद्ध केली. त्यामुळे पक्षीय स्तरावर त्यांचे वजन वाढले आहे. माजी मंत्री आ. शिवाजीराव नाईक यांनीही शिराळा तालुक्यातील लढाई प्रतिष्ठेची केली होती. याठिकाणी त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. याशिवाय त्यांचे पुत्र सत्यजित नाईकही पराभूत झाले. जिल्हा परिषदेतील सत्तेत वाटेकरी झाल्यास नाईक यांना मंत्रीपद दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे शिराळ््यातील पराभव नाईकांना धक्का देणारा ठरला. आटपाडीत राष्ट्रवादीतून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या राजेंद्रअण्णा देशमुख यांनी भाजपच्या पारड्यात तालुक्यातील सर्व जागा टाकल्या. त्यामुळे पक्षातील त्यांचा दबदबाही वाढणार आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना कवठेमहांकाळ तालुका वगळता अन्यत्र यश मिळाले नाही. (प्रतिनिधी)खासदारांना धक्काभाजपचे खासदार संजयकाका पाटील यांना तासगाव आणि कवठेमहांकाळ या त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात धक्का बसला. तासगाव तालुक्यात दोनच जागा त्यांच्या पदरी पडल्या. कवठेमहांकाळमध्ये त्यांना खातेही उघडता आले नाही. भाजप सत्तेकडे वाटचाल करीत असतानाही संजयकाका आणि आ. नाईक यांचा व्यक्तिगत ‘फरफॉर्मन्स’ चांगला झाला नाही. मिरज, जतमधील नेत्यांना यशजतचे आ. विलासराव जगताप आणि मिरज तालुक्यातील आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ यांनीही तालुक्यात जोरदार ताकद लावली. या दोन तालुक्यांमध्येच १३ जागा भाजपच्या पदरात पडल्याने दोन्ही तालुक्यातील नेत्यांचे पक्षाच्या राज्यदरबारी वजन वाढले आहे. जिल्ह्यातील या नेत्यांची निराशाजनक कामगिरीकॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना त्यांच्या मतदारसंघात एकही जागा निवडून आणता आली नाही. दादा गटातील प्रतीक पाटील, विशाल पाटील यांनी ताकद पणाला लावूनही मिरज तालुक्यात त्यांना केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनाही वाळवा तालुक्यात फार यश मिळाले नाही. त्यांचे पुत्र वैभव शिंदेही निवडणुकीत पराभूत झाले.