शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

रानमेव्याच्या मार्केटिंगमध्ये धनगर महिलांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:17 IST

आंबा : ‘रानचा मेवा कुणी बी खावा’ अशी आरोळी देत करवंद, जांभळे विक्री करणारा धनगर समाज एप्रिल व मे ...

आंबा : ‘रानचा मेवा कुणी बी खावा’ अशी आरोळी देत करवंद, जांभळे विक्री करणारा धनगर समाज एप्रिल व मे महिन्यांत कुटुंबासह उदरनिर्वाहासाठी म्हणून हा व्यवसाय करतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, आजरा, चंदगड या डोंगराळ भागात पिढ्यान्पिढ्या वास्तव्य केलेला धनगर समाज जंगलातील करवंद, जांभळे, तोरणे, आळू, फणस , शिकेकाई यांची विक्री करून वर्षभराच्या पोटाची बेगमी करण्यात दिवसरात्र एक करतो.तहान-भूक विसरून चिकाटीने ग्राहकांना रानमेवा पुरवितात. शिकलेला तरुण नोकरीसाठी मुंबई गाठतो. मात्र, येथे राहणाऱ्या महिला रानमेव्याच्या सुगीत भल्या पहाटेडोंगर गाठून ३-४ किलोमीटरची पायपीटकरून २० ते २५ किलोचा रानमेवा जमवतात. करवंदागणिक काट्यांचे बोच सोसत ऊन डोक्यावर येण्यापूर्वी शेजारच्या बाजारात विक्रीसाठी दाखल होतात. पुरुष मंडळी ७० ते ८० किलोमीटरचा प्रवास करून कोल्हापूर, इस्लामपूर, सांगली, वडगावसारख्या शहरात डोक्यावर पाटी घेऊन घरोघरी रानमेवा विकतात. शहरातून परतणारी मंडळी मध्यरात्रीनंतर घरात विसावतात. बहुतेक वाड्यांवर नेमके या सुगीत पाणीटंचाई डोके वर काढते. त्यामुळे पाण्यासाठी रात्रीची झºयाकडे पायपीट करावी लागत असल्याची खंत बोरमाळच्या बजाबाई कोकरे यांनी व्यक्त केली. रानमेवा सुगी वगळता काही मंडळी तवे, पत्र्याच्या पाट्या विकण्याचा व्यवसाय करतात.गेल्या दोन दशकांत वणवे, प्लॉटिंगमुळे रानमेव्याची झाडे कमी झाली आहेत. महामार्ग रुंदीकरणात गावठी आंबे, फणस, जांभूळ यांची तोड झाल्याने पाटीभर रानमेवा जमवण्यास ३ ते ४ किलोमीटरची पायपीट करावी लागते, असे बोरमाळ येथील सिंधू लांबोर यांनी स्पष्ट केले. पिढ्यान्पिढ्या हा हंगामी व्यवसाय चालतो. वर्षांनुवर्षे झाडे कमी होत असल्याने पन्नास टक्क्यांवर हा व्यवसाय घटल्याचे ग्रा.पं. सदस्या नंदा कोळा पटे यांनी सांगितले.