शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

‘जन-धन’मध्ये कधी येणार 'धन'

By admin | Updated: November 25, 2014 23:56 IST

विम्याचा लाभ गुलदस्त्यात : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडून बँकांना नाहीत मार्गदर्शक सूचना

संदीप खवळे - कोल्हापूर -सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग कक्षेत आणण्यासाठी मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या ‘पंतप्रधान जन-धन योजनें’तर्गत बँक खाती उघडून साडेतीन महिने होत आले तरी, अपघाती विम्याच्या प्रक्रियेबाबत बँकांना कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत़ शून्य बॅलेन्सवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेला प्रतिसाद मिळण्यासाठी मोदी सरकारने अपघाती विमा संरक्षणाचे गाजर दाखविले होते़ अपघाती विम्याचा हप्ता सरकारच्यावतीने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन भरणार आहे, पण या कॉर्पोरेशनकडून बँकांना तसेच संबंधित विमा कंपन्यांना अपघाती विम्याच्या अदायगीबाबत कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत़ त्यामुळे जन-धन योजनेंतर्गत खाते उघडलेल्या एखाद्या खातेधारकाचा अपघात झाल्यास तूर्तास तरी त्याला जन-धन योजनेचा लाभ मिळणार नाही़ जन-धन योजनेंतर्गत १५ आॅगस्ट २०१४ पासून शून्य बॅलेन्सवर खाती उघडण्याची प्रक्रिया देशभरात राबविण्यात आली़ या योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील लीड बँकेच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व बँकांत आॅक्टोबरअखेर ९५,०९१ खाती उघडण्यात आली आहेत़ त्यातील ६३,४३८ खाती ग्रामीण भागातील आहेत़ संपुआ सरकारच्या काळातही बँकेच्या प्रवाहात नसलेल्या नागरिकांना बँकिंग प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक समावेशन योजना गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येत आहे़ जन-धन योजनेचा उद्देशही तोच आहे़ एक लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण, तीस हजार रुपयांचा जीवन विमा, पाच हजार रुपयांचा ओव्हर ड्राफ्ट हे लाभ या योजनेत समाविष्ट आहेत़ जन-धन योजनेंतर्गत खाती उघडण्याची सुरुवात १५ आॅगस्टला करण्यात आली़ कोल्हापूर जिल्ह्यातूनही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला, पण खाती उघडून साडेतीन महिने होत आले तरी, अपघाती विम्याबाबत कोणतीही सूचना बँकांना प्राप्त झालेली नाही़ अपघात विम्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया सरकारच्यावतीने खातेधारकांचे हप्ते भरणार आहे़ बँकांकडील खाती कोणत्या विमा कंपन्यांशी जोडायची याचीच प्रक्रिया सुरू आहे़ त्यामुळे सद्य:स्थितीत एखाद्या खातेधारकांचा अपघात झाला, तर त्याला जन-धन योजनेखाली एक लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार नाही, असेच चित्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली़ खातेदाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याला मात्र जन-धन योजनेतील ३० हजार रुपये विमा रक्कम मिळणार आहे़ या विम्याची रक्कम एलआयसी भरणार आहे़ त्यासाठी एलआयसी आपल्याकडील राखीव असलेल्या शंभर कोटी रुपयांचा राखीव निधी वापरणार आहे़ याबाबत शासनाने एलआयसीला मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्याची आठ दिवसांत अंमलबजावणी होणार आहे़ विम्याचा लाभ मिळण्यासाठी...अपघाती विमा संरक्षण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खातेदाराला ४५ दिवसांनी खात्यावरून व्यवहार करावे लागणार आहेत. तसेच रूपे कार्डाचा वापर आवश्यक आहे़ रूपे कार्ड नसल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही तसेच सहा महिने खात्यावर काही व्यवहार करावे लागणार आहेत़पंतप्रधान जन-धन विमा योजनेंतर्गत एक लाख रुपयाच्या अपघाती विमा संरक्षणाच्या प्रक्रियेबाबत अद्यापही कोणत्याही मार्गदर्शक सूचना बँकांना प्राप्त झालेल्या नाहीत़ अपघाती विम्याच्या रकमेचा हप्ता विमा कंपन्यांना देण्याची जबाबदारी शासनाने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडे सोपविली आहे - एम़ जी़ कुलकर्णी, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, बँक आॅफ इंडिया जिल्ह्यातील जन-धनची स्थिती९५,०९१ लीड बँकेच्या अखत्यारितील खाती६३,४३८ ग्रामीण भागातील खाती