शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

१०३० ग्रामपंचायतींना विकास निधी

By admin | Updated: January 11, 2016 00:50 IST

निवडलेल्या गावात काय कामे ?

आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावांत जागृतीचे काम सुरू आहे. येथे लोकसहभागातून विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, गावकरी सामुदायिक शपथ घेतील. मूलभूत अधिकार आणि कर्तव्य याबद्दल सामूहिक कटिबद्धता बिंबविणे, आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, पशु आरोग्य शिबिर घेणे, अंगणवाडीतील सेवेचा दर्जा सुधारणे, शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, वृक्षारोपण करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून काम करणे, जन धन योजनेंतर्गत बँक खाती उघडण्याची मोहीम राबविणे अशी कामे करून गावचा सर्वांगीण विकास करणे अपेक्षित आहे. अन्य गावांसमोर असा गावचा विकास करावा लागणार आहे. ग्रामविकास विभागातर्फे १४ व्या वित्त आयोगातून लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यातील १०३० ग्रामपंचायतींना कमीतकमी एक ते जास्तीतजास्त ८० लाखांपर्यंत विकास निधी मिळणार आहे. यामुळे गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. दरम्यान, पुढील वर्षी पाच वर्षांसाठी प्रत्येक गावांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतींना अनुदान दिले जाते. दोन टप्प्यात ६६ कोटी ८३ लाख १४ हजार रुपये मिळाले आहेत. हा निधी ग्रामपंचायतीला वर्ग करण्यात आला आहे. दुर्गम भागातील वाड्या, वस्त्या वगळता अन्य गावांत वीज, पाणी, रस्ते अशी मूलभूत विकासाची कामे झाली आहेत. स्मशानशेड, पाणीपुरवठा यांची कामेही होत आहेत.चौदाव्या वित्त आयोगातून सर्वच ग्रामपंचायतींना निधी मिळाला आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली आहे. बहुतांश गावात मूलभूत सुविधा झाल्या आहेत. -एम. एस. घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)आमदार आदर्श गावासाठी वेळापत्रक असे :३१ आॅक्टोबर २०१५ पर्यंत गावांची निवड.१५ नोव्हेंबर २०१५ पर्यंत निवडलेल्या ग्रामपंचायतीसाठी प्रभारी अधिकाऱ्याची नेमणूक करणे३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत जागृती व वातावरण निर्मिती करणे १ डिसेंबरपर्यंत काम सुरू करणे८ मार्च २०१६ पर्यंत प्रारूप ग्राम विकास आराखड्यास ग्रामसभेत मंजुरी घेणे८ मार्च ते ३० एप्रिल अखेर आराखड्यानुसार विविध घटकांच्या योजनांना तांत्रिक प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेणे.२ आॅक्टोबर २०१६ पर्यंत पहिले गाव आदर्श करणे.२०१९ पर्यंत अशाप्रकारे तीन गावे आदर्श करणे.