शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

१०३० ग्रामपंचायतींना विकास निधी

By admin | Updated: January 11, 2016 00:50 IST

निवडलेल्या गावात काय कामे ?

आमदारांनी दत्तक घेतलेल्या गावांत जागृतीचे काम सुरू आहे. येथे लोकसहभागातून विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, गावकरी सामुदायिक शपथ घेतील. मूलभूत अधिकार आणि कर्तव्य याबद्दल सामूहिक कटिबद्धता बिंबविणे, आरोग्य शिबिराचे आयोजन करणे, पशु आरोग्य शिबिर घेणे, अंगणवाडीतील सेवेचा दर्जा सुधारणे, शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, वृक्षारोपण करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून काम करणे, जन धन योजनेंतर्गत बँक खाती उघडण्याची मोहीम राबविणे अशी कामे करून गावचा सर्वांगीण विकास करणे अपेक्षित आहे. अन्य गावांसमोर असा गावचा विकास करावा लागणार आहे. ग्रामविकास विभागातर्फे १४ व्या वित्त आयोगातून लोकसंख्येच्या प्रमाणात जिल्ह्यातील १०३० ग्रामपंचायतींना कमीतकमी एक ते जास्तीतजास्त ८० लाखांपर्यंत विकास निधी मिळणार आहे. यामुळे गावांच्या विकासाला चालना मिळणार आहे. दरम्यान, पुढील वर्षी पाच वर्षांसाठी प्रत्येक गावांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतींना अनुदान दिले जाते. दोन टप्प्यात ६६ कोटी ८३ लाख १४ हजार रुपये मिळाले आहेत. हा निधी ग्रामपंचायतीला वर्ग करण्यात आला आहे. दुर्गम भागातील वाड्या, वस्त्या वगळता अन्य गावांत वीज, पाणी, रस्ते अशी मूलभूत विकासाची कामे झाली आहेत. स्मशानशेड, पाणीपुरवठा यांची कामेही होत आहेत.चौदाव्या वित्त आयोगातून सर्वच ग्रामपंचायतींना निधी मिळाला आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळाली आहे. बहुतांश गावात मूलभूत सुविधा झाल्या आहेत. -एम. एस. घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)आमदार आदर्श गावासाठी वेळापत्रक असे :३१ आॅक्टोबर २०१५ पर्यंत गावांची निवड.१५ नोव्हेंबर २०१५ पर्यंत निवडलेल्या ग्रामपंचायतीसाठी प्रभारी अधिकाऱ्याची नेमणूक करणे३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत जागृती व वातावरण निर्मिती करणे १ डिसेंबरपर्यंत काम सुरू करणे८ मार्च २०१६ पर्यंत प्रारूप ग्राम विकास आराखड्यास ग्रामसभेत मंजुरी घेणे८ मार्च ते ३० एप्रिल अखेर आराखड्यानुसार विविध घटकांच्या योजनांना तांत्रिक प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेणे.२ आॅक्टोबर २०१६ पर्यंत पहिले गाव आदर्श करणे.२०१९ पर्यंत अशाप्रकारे तीन गावे आदर्श करणे.