शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

संघटीत राहण्याचा व्यापाऱ्यांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST

कोल्हापूर : व्यापाऱ्यांना जगण्यासाठी व्यापार सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. व्यापार सुरु करणे हा आपला अधिकार आहे. मात्र, यासाठीसुद्धा व्यापाऱ्यांची ...

कोल्हापूर : व्यापाऱ्यांना जगण्यासाठी व्यापार सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. व्यापार सुरु करणे हा आपला अधिकार आहे. मात्र, यासाठीसुद्धा व्यापाऱ्यांची संघटीत शक्ती आवश्यक आहे. यापुढील काळातही व्यापाऱ्यांनी संघटीत राहण्याचा निर्धार रविवारी येथे केला.

महाव्दार रोड व्यापारी संघ, सराफ व्यापारी संघ तसेच ज्योतिबा रोड, ताराबाई रोड परिसरातील व्यापाऱ्यांनी संयुक्तपणे महाव्दार रोड येथे सभा आयोजित केली होती. या सभेत हा निर्धार व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यावेळी म्हणाले, जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांना समजून घेऊन व्यापार सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. पालकमंत्री, आमदारांनी प्रयत्न केले आहेत. पण अद्यापही शासनाने निर्णय न घेणे हे व्यापाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. व्यापाऱ्यांची सहनशीलता संपली आहे, व्यापाऱ्यांची आर्थिक घडीही विस्कटली आहे. या परिसरातील व्यापाऱ्यांनी सोमवारपासून व्यापार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला महाराष्ट्र चेंबरच्यावतीने पूर्ण पाठिंबा देऊन आवश्यक ते सहकार्य केले जाईल.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, सलग तीन महिन्यांपासून लॉकडाऊन केल्याने व्यापाऱ्यांवर अन्याय झाला आहे. वीज, पाणी, घरफाळ्यात सवलत दिलेली नाही. याउलट दुकाने बंद ठेवण्यास सांगितले आहे. हे चुकीचे आहे. जीएसटीचा करही सुरूच आहे. मग दुकाने का बंद ठेवायची? आता दुकानदार, व्यापाऱ्यांचा संयम सुटला आहे. ते आज (सोमवार)पासून दुकाने सुरू करतील. गेल्या दोन आठवड्यात शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे शहरातील दुकानदार, व्यापाऱ्यांनी सरसकट दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड म्हणाले, आता व्यापार सुरू करण्याशिवाय पर्याय नाही. सर्व व्यापाऱ्यांचेही असेच म्हणणे आहे.

माजी महापौर सुनील कदम म्हणाले, शहराच्या विकासासाठी सर्व व्यापार सुरू राहणे गरजेचे आहे. त्यामुळे दुकाने सुरू करावीत. आमदार, खासदारांनी दुकानदारांच्या बाजूने उभे राहावे.

माजी नगरसेवक किरण नकाते म्हणाले, लॉकडाऊन काळातील घरफाळा, पाणीपट्टी व वीजबिल माफीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

महाव्दार रोड व्यापारी संघाचे अध्यक्ष शामराव जोशी यांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी व व्यापारावर आलेले संकट हा जीवन-मरणाचा प्रश्न बनला असल्याचे सांगितले.

चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव जयेश ओसवाल, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे सचिव रंजित पारेख, संचालक माणिक पाटील -चुयेकर, अनिल पिंजानी, जयंत गोयानी, श्याम बासरानी, राहुल नष्टे यांच्यासह गुजरी, भेंडी गल्ली, ज्योतिबा रोड, महाव्दार रोड, ताराबाई रोड, बाबुजमाल परिसरातील व्यापारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : ०४०७२०२१-कोल- गुजरी कोपरा सभा

कोल्हापुरातील गुजरी येथे झालेल्या व्यापाऱ्यांच्या कोपरा सभेत रविवारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कुलदीप गायकवाड, शामराव जोशी, संजय शेटे, किरण नकाते, जयेश ओसवाल, आदी उपस्थित होते.