शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही एलआयसी कर्मचाऱ्यांची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:18 IST

कोल्हापूर : भारतीय जीवन विमा महामंडळामध्ये (एलआयसी) २० मे १९८५ ते ४ मार्च १९९१ या काळात काम केलेल्या अस्थायी ...

कोल्हापूर : भारतीय जीवन विमा महामंडळामध्ये (एलआयसी) २० मे १९८५ ते ४ मार्च १९९१ या काळात काम केलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊन सहा वर्षे उलटली, तरी एलआयसीचे व्यवस्थापन या कर्मचाऱ्यांना सेवेत दाखल करून घ्यायला तयार नाही. त्यातील काहींची वयोमर्यादा संपत आली असल्याने त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. महाराष्ट्रात सुमारे दोन हजारांहून जास्त असे कर्मचारी आहेत.

एलआयसीमध्ये अस्थायी असिस्टंट म्हणून हे लोक त्या काळात ८५ दिवस रोजंदारीवर काम करत होते. ज्यांनी त्या काळात ७० दिवस काम केले आहे, त्यांना सेवेत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. हा निकाल १८ मार्च २०१५ ला न्यायालयाने दिला. त्याची अंमलबजावणी निकाल लागल्यापासून दोन महिन्यांच्या आत करण्याचे आदेश दिले होते; परंतु तरी या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश नव्याने द्यावेत म्हणून नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ इन्शुरन्स वर्कर्स संघटनेने पु्न्हा न्यायालयात धाव घेतली. परंतु कोरोनामुळे त्या याचिकेची अद्याप सुनावणी झाली नसल्याचे संघटनेचे नेते नारायण लळित यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व लोकांना नोकरीत सामावून घ्या आणि मागील ५० टक्के पगार द्यावा, असे आदेशात म्हटले होते. परंतु एलआयसीने विविध त्रुटी काढून या लोकांना सेवेत कसे घेता येणार नाही, असेच प्रयत्न केले आहेत. कोल्हापुरातून विजय कुलकर्णी, शिवानंद नकाते हे या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी झटत आहेत.