शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

मजुरीवाढीसाठी लवाद नेमणार

By admin | Updated: December 28, 2016 00:14 IST

प्रांत कार्यालयात निर्णय : खर्चीवाल्यांच्या प्रश्न पुन्हा लांबणीवर; कारखाने सुरू

इचलकरंजी : पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या रीतीनुसार लवाद समितीचे पुनर्गठन करून त्यातून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसंदर्भात निर्णय करण्यात येईल. त्यासाठी व्यापक बैठक घेण्याचे प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. त्यामुळे मजुरीवाढीचा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडला आहे. दरम्यान, बैठकीनंतर यंत्रमागधारकांनी आपले कारखाने सुरू करण्याचे आवाहन केल्यामुळे यातून यंत्रमागधारकांच्या हाती काहीच लागले नसल्याची चर्चा सुरू होती.यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळावी, यासाठी दहा दिवस ‘मी स्वाभिमानी कारखानदार’ या संघटनेच्यावतीने आमरण उपोषण करण्यात आले होते. सोमवारी (दि. २६) वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर बाळ महाराजांनी उपोषण मागे घेतले. त्यावेळी खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसंदर्भात चक्री उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, त्याला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या आंदोलनाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तर मजुरीवाढीसंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकाही निष्फळ ठरल्याने हा प्रश्न निकालात निघणार की नाही, असा सवाल होता.या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी बैठक घेतली. यावेळी यंत्रमागधारकांच्यावतीने सचिन हुक्किरे, अजय जावळे, बाळकृष्ण लवटे, अमोद म्हेतर, विकास चौगुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधींनी म्हणणे मांडताना आजवर झालेल्या विविध आंदोलनांमध्ये मार्ग काढण्यासाठी आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व शासकीय प्रतिनिधी यांची लवाद समिती नेमली गेली आहे. या प्रश्नीही लवाद समितीचे पुनर्गठण करण्यात यावे आणि हा प्रश्न निकाली काढावा, असे सांगण्यात आले. त्यावर प्रांताधिकारी शिंगटे यांनी या समिती सदस्यांना कळवून समितीचे पुनर्गठण करून लवकरच व्यापक बैठकीद्वारे हा प्रश्न सोडविण्याचा निर्णय जाहीर केला. बैठकीनंतर अजय जावळे, सचिन हुक्किरे यांनी कारखाने सुरू करण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)मंडप गायब : गोंधळखर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसंदर्भात चक्री उपोषणाची घोषणा झाली असताना गांधी पुतळा येथील उपोषणावेळी घातलेला मंडप गायब झाल्याने यंत्रमागधारकांचा गोंधळ उडाला. गांधी पुतळ्याजवळ यंत्रमागधारक जमल्याची माहिती मिळताच पोलिस तेथे आले. त्यांनी यंत्रमागधारकांना तेथून हुसकावून लावले. त्यामुळे त्यांनी थेट बाळ महाराजांच्या घराकडे मोर्चा वळविला व त्यांना खर्चीवाल्यांच्या प्रश्नाबाबत जाब विचारला. त्यावर या प्रश्नाबाबत चार दिवसांत तोडगा न निघाल्यास शुक्रवारी मेळावा घेणार असल्याचे बाळ महाराजांनी सांगितले. या सर्व गोंधळाच्या वातावरणामुळे आंदोलनाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती.