शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

पीक कर्जातून ठेवीचा गल्ला

By admin | Updated: June 16, 2015 01:17 IST

शेतकऱ्यांवर सुलतानी संकट : मुदतीनंतर ११ टक्के दराने व्याज आकारणी

दत्तात्रय पाटील - म्हाकवे -उसाची बिले वेळेवर न मिळाल्यामुळे आर्थिक अरिष्टात आलेल्या शेतकऱ्यांना आधारवड असणाऱ्या जिल्हा बँकेने आधार देण्याऐवजी त्यांना जोर का झटका देणाराच निर्णय घेतला आहे. पीक कर्जाच्या परतफेडीसाठी ३६५ दिवस (वर्षाची) मुदत असते; मात्र आर्थिक ओढाताणीमुळे हे कर्ज शेतकऱ्यांना भरता आले नाही आणि ३६६ वा दिवस उजाडला, तर त्यात बिनव्याजी कर्जमाफीचा लाभ मिळणार नाहीच, त्याशिवाय सहाऐवजी तब्बल ११ टक्क्यांनी कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. बँकेत ठेवीचा गल्ला वाढविण्यासाठी यापुढे मंजूर पीक कर्जाच्या पाच टक्के रक्कम ठेव म्हणून कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे उसाची बिले वेळेत नाहीत, इतर पीक आणि धान्यांनाही दर नाही, रोगराईचा वाढता प्रभाव यामुळे आर्थिक कचाट्यात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे आणखी एका संकटाचा खड्डाच खोदला जाणार असल्याने याबाबत शेतकऱ्यांसह संघटनांतून संताप व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांना अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी काँग्रेस सरकारने कर्जमाफीची योजना राबविली, तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतच्या पीक कर्जाला व्याज आकारणी न करता ही रक्कम त्याला वर्षभर वापरायला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. सध्या ही योजना सुरू आहे. सेवा संस्था, जिल्हा बँक, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.मात्र, सेवा संस्थेसह कोल्हापूर जिल्हा बँक याचा पुरेपूर लाभ उठवत आहेत. काही सेवा संस्था शेतकऱ्यांकडून पाच ते दहा टक्क्यांपर्यंत बिनपरतीचे शेअर्स भांडवल अनामत रक्कम कपात करूनच उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या हातावर ठेवते. विशेष म्हणजे या कपात केलेल्या रकमेसह मुद्दल व व्याजाची परतफेड शेतकऱ्यांना करावी लागते, तर आर्थिक गैरव्यवहाराचा शिक्का रोजच गडद करीत दिनक्रम सुरू असणाऱ्या जिल्हा बँकेकडे ठेवीदाराचा ओघ कमी झाला असून, बहुतांश ठेवीदार आपल्या ठेवी परत घेण्यासाठीच प्रयत्न करीत असल्याचे प्रकर्षाने दिसत आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारावर परिणाम होऊ नये यासाठी आता प्रशासनाने शक्कल लढवीत शेतकऱ्यांचा पीक कर्जातून पाच टक्के ठेव ठेवून घेण्याबाबत विचारविनिमय सुरू केला आहे. त्यामुळे ही बाबच मुळात अन्यायकारक आहे.दरम्यान, सेवा संस्थेसह जिल्हा बँकेने कपात केलेल्या ठेवीच्या रकमेच्या व्याजाचा भुर्दंडही संबंधित शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. तसेच एखाद्या शेतकऱ्याला मुदतीत कर्जाची परतफेड करता आली नाही तर त्यांच्याकडून सहा टक्क्यांप्रमाणे व्याज आकारणी केली जात होती. मात्र, आता यापुढे ११ टक्क्यांप्रमाणे व्याज आकारणी करण्यासंबंधी जिल्हा बँक प्रशासनाने विचारविनिमय सुरू केला आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’ आज ना उद्या येतील या भाबड्या आशेवर जगणाऱ्या शेतकऱ्यांवर उजाडणारा दिवस संकटे घेऊनच येत असल्याच्या तीव्र प्रतिक्रियाही उमटत आहेत.खते, कीटकनाशके, बी-बियाणे आणि मशागतीच्या खर्चासाठी आज आमच्याकडे पैसे नाहीत म्हणून आम्ही पीक कर्ज घेत आहोत. त्यामुळे या कर्जातून ठेवी घेणे ही बाबच दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे. तसेच, आर्थिक सक्षमता होईल त्यावेळी आम्ही स्वत:हून बँकेत ठेवी ठेवू.- काकासाहेब सावडकर,शेतकरी, आणूरपीक कर्जावर कृषी कर्जासाठी नाबार्डकडून आर्थिक पुरवठा केला जातो. त्यामुळे केडीसीसी बँकेने ठेवी कपात करण्याचा संबंधच नाही. ठेवीच्या कपातीसह थकीत शेतकऱ्यांना ११ ऐवजी पूर्वीप्रमाणेच सहा टक्क्यांप्रमाणे व्याज आकारणी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारावे लागेल. - कॉ. संभाजी यादव, जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा