शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

शहर, जिल्ह्यात डेंगी, चिकनगुनियाचा फैलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनापाठोपाठ शहर आणि जिल्ह्यात डेंगी, चिकनगुनिया या साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनापाठोपाठ शहर आणि जिल्ह्यात डेंगी, चिकनगुनिया या साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. यामुळे आरोग्य प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. डासांची उत्पत्ती स्थान नष्ट करणे आणि डासांपासून बचाव करण्याकडे नागरिकांनी विशेष लक्ष केंद्रित करावे, असे आरोग्य प्रशासनाने आवाहन केले आहे.

दोन महिन्यांपासून शहर, जिल्ह्यात कोरोना आजाराचा उद्रेक झाला आहे. या आजाराने मृत होणाऱ्यांची संख्याही दोन अंकी आहे. अशातच डेंगी, चिकनगुनिया अशा साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. शुक्रवारी कळंबा येथे एका महिलेचा डेंगी सदृश्य आजाराने मृत्यू झाल्याने आरोग्य प्रशासनातही खळबळ उडाली आहे. आरोग्य प्रशासन त्या महिलेचा नेमका कोणत्या आजाराने मृत्यू झाला, याचा शोध घेत आहे.

सध्या कळंबा, उचगाव, पुलाची शिरोली, मुडशिंगी, कणेरी, सांगवडे, सांगवडेवाडी, शिरोळ, कागल येथे डेेंगी आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे जिल्हा हिवताप विभागाचे अधिकारी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने जनजागृती करीत आहेत. जास्त दिवस पाण्याची साठवणूक करू नये, घर आणि परिसरातील डासांची उत्पत्तीस्थान नष्ट करावेत, डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदानीचा वापर करावा, अशी जागृती केली जात आहे. पण जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने पाणी साठून राहण्याचे आणि दलदलीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गटारांचीही नियमित स्वच्छता न झाल्याने डास कमी होत नसल्याचे चित्र आहे.

चौकट

उपनगरातही

सदरबाजार, जवाहरनगर, सुभाषनगर, जागृतीनगर, टेंबलाईवाडी, शाहू मिल कॉलनी येथे डेंगी, चिकनगुनिया आजाराचा फैलाव गतीने होत आहे. घरात साठवून ठेवलेल्या पाण्यात आणि घराशेजारी असलेल्या दुचाकी, चारचाकीचे टायर, प्लॅस्टिक, पत्र्याच्या डब्यात साठलेल्या पावसाच्या पाण्यात डास तयार होत आहेत. यामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढते आहे.

कोट

शहर, उपनगरे आणि जिल्ह्यातील काही गावांत डेंगी, चिकनगुनियाचे रुग्ण सापडत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने डासही वाढले आहेत. परिणामी साथीच्या आजाराचाही प्रसार होत आहे. यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे. घर, परिसराची स्वच्छता राखावी. डासांपासून बचाव करून घ्यावा. डबक्यातील पाण्यात डास तयार होऊ नये, यासाठी गप्पी मासे सोडावेत.

डॉ. विनोद मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी