शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

ऊसदर मागणीला वाटाण्याच्या अक्षता

By admin | Updated: November 14, 2014 00:00 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अप्रत्यक्ष परवानगीशिवाय ऊस गळीत हंगामात

गणपती कोळी / कुरुंदवाडस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अप्रत्यक्ष परवानगीशिवाय ऊस गळीत हंगामात कारखान्यांची धुराडे पेटली जात नसत. यंदा मात्र ही परंपरा मोडीत काढत ‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेतील दराच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत व त्यांच्या मागणीला न जुमानता सर्व साखर कारखाने चालू झाले आहेत. यामुळे ‘स्वाभिमानी’चा साखर कारखानदारावरील वचक ओसरल्याचे स्पष्ट होत असून, ऊस परिषदेतील दराच्या मागणीबाबत किती रेठा लावून यशस्वी होतो, यावरच भविष्यातील ऊस परिषदेचे महत्त्व टिकविण्याचे आव्हान राहणार आहे.ऊस आंदोलन म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना हे समीकरण झाले आहे. आंदोलनातून उसाच्या दराबाबत योग्य मागणी, योग्य वेळी थांबण्याची भूमिका व विश्वासात्मक दरामध्ये तडजोड हे खासदार राजू शेट्टी यांनी अंगीकारल्याने संपूर्ण ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या पाठीशी राहिला. यातूनच त्यांच्या नेतृत्वाखाली मोठा दबाव गट निर्माण झाल्याने स्वाभिमानीच्या ग्रीन सिग्नलशिवाय ऊसतोड चालू होत नसे, ही गेल्या बारा वर्षांची जिल्ह्यातील परंपरा आहे. त्यामुळे जयसिंगपूर येथील ऊस परिषदेकडे व त्यांच्या मागणीकडे साखरसम्राट, शासन व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहत असे.यंदा मात्र ‘स्वाभिमानी’च्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांच्या एकजुटीला विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ग्रहण लागले. राजकीय उलथापालथ, स्वाभिमानीत फूट, निवडणुकीत झालेला दारुण पराभव अन् ऊस परिषदेतील नेत्यांचे मवाळ धोरण. यामुळे साखरसम्राटांसह राजकीय विरोधकांचे चांगलेच फावले. ऊस परिषदेमध्ये यंदाच्या गाळपाच्या उसाला पहिली उचल २७०० रुपये देण्याची मागणी केली. मात्र, मुळातच मागणी मवाळ झाल्याने परिषदेतील स्वाभिमानीच्या दबदब्याची हवाच निघून गेली. ऊस परिषदेतील दराची मागणी व त्याबाबत योग्य निर्णय झाल्याशिवाय साखर कारखाने चालू तर होत नव्हतेच शिवाय ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकही मजुरांना आणण्याचे धाडसही करत नसे. यावेळी मात्र ही परंपरा मोडीत निघाली.शासनाच्या मदतीकडे लक्षशाहू कारखाना (कागल) व गुरुदत्त शुगर्स (टाकळीवाडी) वगळता कोणत्याही कारखान्याने पहिली उचल जाहीर न करता साखर कारखाने सुरू केले आहेत. त्यामुळे साखर कारखानदारीवरील ‘स्वाभिमानी’चा दबदबा कमी झाल्याचे सध्या तरी स्पष्ट दिसत आहे. परिषदेतील दराची मागणी योग्यच आहे. मात्र, ती शासनाच्या मदतीने कायद्याच्या धाकातून शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्यात खासदार शेट्टी कितपत यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून, यामध्ये यशस्वी झाले तरच भविष्यातील ऊस परिषदेचे महत्त्व टिकणार आहे, अन्यथा मागणी आणि गर्दी इतिहासात जमा होण्याचीही शक्यता आहे.