शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या ‘जलप्रवाहातून’ बालकांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 00:07 IST

शिक्षणासाठीचा प्रवास : राधानगरी ‘बालविकास’चा स्तुत्य उपक्रम; ३८ वर्षांनंतर मोहितेवाडीच्या मुलांना मिळाली हक्काची शाळा

श्रीकांत ऱ्हायकर ल्ल धामोडंमोहितेवाडी येथील विद्यार्थ्यांना जलाशयाच्या या तीरावरून पैलतीरावरचा एक किलोमीटरचा प्रवास करावा लागतोच; पण गेल्या दोन वर्षांपूर्वी यात थोडा बदल झाला, अन् तब्बल ३८ वर्षांनंतर या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा हा जीवघेणा जलप्रवास थांबला आहे.धरणासाठी गाव दिले... वडिलोपार्र्जित मिळकत धरणासाठी बहाल केली... स्वत:च्या संसारावर पाणी ओतून धरणग्रस्त नावाचा शिक्का कपाळी घेऊन तुळशी धरणाच्या निर्मितीनंतर केळोशी खुर्द या गावामध्ये गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या लोकांना विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे जलाशयाच्या वेगवेगळ्या तीरावर संसार थाटावा लागला. एवढ्यावरतीच या लोकांची परवड थांबली नाही, तर या गावातील लोकांना एकाच ग्रामपंचायतीत समाविष्ट करून शासनाने त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचेच प्रत्यंतर या लोकांना येत असून, त्याचा त्रास या लोकांना आजही सहन करावा लागतो. केळोशी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या मोहितेवाडी व केळोशी खुर्द या दोन गावांसाठी एकच शाळा आहे. इथे पहिली ते सातवीपर्यंतची शाळा असताना मात्र तुळशी जलाशयाच्या निर्मितीनंतर केळोशी खुर्द व मोहितेवाडी या एकाच गावातील लोकांना विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे दोन वेगवेगळ्या तीरावर राहावे लागले व यातून मोहितेवाडी व केळोशी खुर्द (कानकेकरवाडी) अशा दोन गावांची निर्मिती झाली. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची मोठी गोची निर्माण झाली. मोहितेवाडीतील विद्यार्थ्यांना जलाशयातूनच जीवघेणा प्रवास करून गेली ३८ वर्षे शिक्षण घ्यावे लागत आहे.या सर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे होणारे हाल व त्यांच्या शिक्षणासाठी चाललेला रोजचा जीवघेणा प्रवास थांबविण्याच्या उद्देशाने प्रकल्प कार्यालय व या विभागाचे पंचायत समिती सदस्य व माजी सभापती जयसिंग खामकर यांच्या पुढाकाराने या मोहितेवाडी गावासाठी स्वतंत्र बालवाडी सुरू करण्यात आली. त्यामुळे पालकांसह गावकऱ्यांनी उत्साहात हा वर्ग सुरू करून या विभागाचे व जयसिंग खामकर यांचे आभार मानले. गावकऱ्यांचा त्रास कायमबालवाडीने जरी विद्यार्थ्यांच्या किमान गरजा पूर्ण झाल्या असल्या, तरी अद्याप दैनंदिन व्यवहाराच्या गोष्टींसाठी येथील पुरुष अथवा महिला वर्गाला जीव मुठीत घेऊनच गावकऱ्यांनी तयार केलेल्या जलाशयावरील तराफ्यावरूनच केळोशी खुर्द गावी जावे लागते. या रोजच्या जीवघेण्या प्रवासातून जरी विद्यार्थी वर्गाची सुटका झाली असली, तरी गावकऱ्यांना मात्र हा त्रास सहन करावा लागतो आहे. तो कधी संपणार, याचीच उत्सुकता गावकऱ्यांना लागून राहिली आहे.