शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जीवघेण्या ‘जलप्रवाहातून’ बालकांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 00:07 IST

शिक्षणासाठीचा प्रवास : राधानगरी ‘बालविकास’चा स्तुत्य उपक्रम; ३८ वर्षांनंतर मोहितेवाडीच्या मुलांना मिळाली हक्काची शाळा

श्रीकांत ऱ्हायकर ल्ल धामोडंमोहितेवाडी येथील विद्यार्थ्यांना जलाशयाच्या या तीरावरून पैलतीरावरचा एक किलोमीटरचा प्रवास करावा लागतोच; पण गेल्या दोन वर्षांपूर्वी यात थोडा बदल झाला, अन् तब्बल ३८ वर्षांनंतर या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा हा जीवघेणा जलप्रवास थांबला आहे.धरणासाठी गाव दिले... वडिलोपार्र्जित मिळकत धरणासाठी बहाल केली... स्वत:च्या संसारावर पाणी ओतून धरणग्रस्त नावाचा शिक्का कपाळी घेऊन तुळशी धरणाच्या निर्मितीनंतर केळोशी खुर्द या गावामध्ये गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या लोकांना विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे जलाशयाच्या वेगवेगळ्या तीरावर संसार थाटावा लागला. एवढ्यावरतीच या लोकांची परवड थांबली नाही, तर या गावातील लोकांना एकाच ग्रामपंचायतीत समाविष्ट करून शासनाने त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचेच प्रत्यंतर या लोकांना येत असून, त्याचा त्रास या लोकांना आजही सहन करावा लागतो. केळोशी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या मोहितेवाडी व केळोशी खुर्द या दोन गावांसाठी एकच शाळा आहे. इथे पहिली ते सातवीपर्यंतची शाळा असताना मात्र तुळशी जलाशयाच्या निर्मितीनंतर केळोशी खुर्द व मोहितेवाडी या एकाच गावातील लोकांना विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे दोन वेगवेगळ्या तीरावर राहावे लागले व यातून मोहितेवाडी व केळोशी खुर्द (कानकेकरवाडी) अशा दोन गावांची निर्मिती झाली. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची मोठी गोची निर्माण झाली. मोहितेवाडीतील विद्यार्थ्यांना जलाशयातूनच जीवघेणा प्रवास करून गेली ३८ वर्षे शिक्षण घ्यावे लागत आहे.या सर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे होणारे हाल व त्यांच्या शिक्षणासाठी चाललेला रोजचा जीवघेणा प्रवास थांबविण्याच्या उद्देशाने प्रकल्प कार्यालय व या विभागाचे पंचायत समिती सदस्य व माजी सभापती जयसिंग खामकर यांच्या पुढाकाराने या मोहितेवाडी गावासाठी स्वतंत्र बालवाडी सुरू करण्यात आली. त्यामुळे पालकांसह गावकऱ्यांनी उत्साहात हा वर्ग सुरू करून या विभागाचे व जयसिंग खामकर यांचे आभार मानले. गावकऱ्यांचा त्रास कायमबालवाडीने जरी विद्यार्थ्यांच्या किमान गरजा पूर्ण झाल्या असल्या, तरी अद्याप दैनंदिन व्यवहाराच्या गोष्टींसाठी येथील पुरुष अथवा महिला वर्गाला जीव मुठीत घेऊनच गावकऱ्यांनी तयार केलेल्या जलाशयावरील तराफ्यावरूनच केळोशी खुर्द गावी जावे लागते. या रोजच्या जीवघेण्या प्रवासातून जरी विद्यार्थी वर्गाची सुटका झाली असली, तरी गावकऱ्यांना मात्र हा त्रास सहन करावा लागतो आहे. तो कधी संपणार, याचीच उत्सुकता गावकऱ्यांना लागून राहिली आहे.