शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

जीवघेण्या ‘जलप्रवाहातून’ बालकांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2016 00:07 IST

शिक्षणासाठीचा प्रवास : राधानगरी ‘बालविकास’चा स्तुत्य उपक्रम; ३८ वर्षांनंतर मोहितेवाडीच्या मुलांना मिळाली हक्काची शाळा

श्रीकांत ऱ्हायकर ल्ल धामोडंमोहितेवाडी येथील विद्यार्थ्यांना जलाशयाच्या या तीरावरून पैलतीरावरचा एक किलोमीटरचा प्रवास करावा लागतोच; पण गेल्या दोन वर्षांपूर्वी यात थोडा बदल झाला, अन् तब्बल ३८ वर्षांनंतर या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा हा जीवघेणा जलप्रवास थांबला आहे.धरणासाठी गाव दिले... वडिलोपार्र्जित मिळकत धरणासाठी बहाल केली... स्वत:च्या संसारावर पाणी ओतून धरणग्रस्त नावाचा शिक्का कपाळी घेऊन तुळशी धरणाच्या निर्मितीनंतर केळोशी खुर्द या गावामध्ये गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या लोकांना विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे जलाशयाच्या वेगवेगळ्या तीरावर संसार थाटावा लागला. एवढ्यावरतीच या लोकांची परवड थांबली नाही, तर या गावातील लोकांना एकाच ग्रामपंचायतीत समाविष्ट करून शासनाने त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचेच प्रत्यंतर या लोकांना येत असून, त्याचा त्रास या लोकांना आजही सहन करावा लागतो. केळोशी खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या मोहितेवाडी व केळोशी खुर्द या दोन गावांसाठी एकच शाळा आहे. इथे पहिली ते सातवीपर्यंतची शाळा असताना मात्र तुळशी जलाशयाच्या निर्मितीनंतर केळोशी खुर्द व मोहितेवाडी या एकाच गावातील लोकांना विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे दोन वेगवेगळ्या तीरावर राहावे लागले व यातून मोहितेवाडी व केळोशी खुर्द (कानकेकरवाडी) अशा दोन गावांची निर्मिती झाली. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची मोठी गोची निर्माण झाली. मोहितेवाडीतील विद्यार्थ्यांना जलाशयातूनच जीवघेणा प्रवास करून गेली ३८ वर्षे शिक्षण घ्यावे लागत आहे.या सर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे होणारे हाल व त्यांच्या शिक्षणासाठी चाललेला रोजचा जीवघेणा प्रवास थांबविण्याच्या उद्देशाने प्रकल्प कार्यालय व या विभागाचे पंचायत समिती सदस्य व माजी सभापती जयसिंग खामकर यांच्या पुढाकाराने या मोहितेवाडी गावासाठी स्वतंत्र बालवाडी सुरू करण्यात आली. त्यामुळे पालकांसह गावकऱ्यांनी उत्साहात हा वर्ग सुरू करून या विभागाचे व जयसिंग खामकर यांचे आभार मानले. गावकऱ्यांचा त्रास कायमबालवाडीने जरी विद्यार्थ्यांच्या किमान गरजा पूर्ण झाल्या असल्या, तरी अद्याप दैनंदिन व्यवहाराच्या गोष्टींसाठी येथील पुरुष अथवा महिला वर्गाला जीव मुठीत घेऊनच गावकऱ्यांनी तयार केलेल्या जलाशयावरील तराफ्यावरूनच केळोशी खुर्द गावी जावे लागते. या रोजच्या जीवघेण्या प्रवासातून जरी विद्यार्थी वर्गाची सुटका झाली असली, तरी गावकऱ्यांना मात्र हा त्रास सहन करावा लागतो आहे. तो कधी संपणार, याचीच उत्सुकता गावकऱ्यांना लागून राहिली आहे.