शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विकास आराखड्याचा आज होणार फैसला ?

By admin | Updated: March 4, 2015 00:30 IST

शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित विकास आराड्यासाठी राज्य शासनाकडून मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत मुदतवाढ मिळालेली नाही.

सरवडे : दुर्गमानवाड (ता. राधानगरी) येथील हिंडाल्को कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या गेले ३१ दिवस पगारवाढीसंदर्भात सुरू असलेल्या बंदमुळे बॉक्साईट वाहतूक ठप्प आहे. कंपनी आणि कामगार युनियन यांच्या वादात मात्र सुमारे ४०० ट्रकमालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान, सोमवारी कंपनी अधिकारी, कामगार युनियन व ट्रकमालक यांच्या संयुक्त बैठकीत तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्या उपस्थितीत कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय झाला. मात्र, बंद कालावधीतील पगार मिळावा, या कामगारांच्या मागणीवर आता घोडे अडले आहे.हिंडाल्को कंपनीने बेळगाव येथील कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली. मात्र, जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगारांना पगारवाढ दिली नाही. त्यामुळे कंपनीकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने २ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले. त्यानंतर एकदिवसीय उपोषणही करण्यात आले. हिंद मजदूर कामगार संघटनेने त्रैवार्षिक करारानुसार पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला. प्रत्येक तीन वर्षाने कंपनी पगारवाढ देते. सध्याच्या कराराची ३० जून २०१४ ला मुदत संपली तरी कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. म्हणून कामगारांनी पगारवाढीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनास अधिक वेळ लागल्याने ट्रकमालकांनीही बॉक्साईट वाहतूक सुरू करा; अन्यथा कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.त्यामुळे कंपनीचे अधिकारी, ट्रकमालक व कामगार युनियनचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी झाली. त्यावेळी कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय झाला. मात्र, काम बंद कालावधीतील दिवसांचा पगार कंपनीने द्यावा, ही मागणी कंपनीने मान्य केली नाही. त्यामुळे अजून बॉक्साईट वाहतूक बंद आहे.दुर्गमानवाड येथून १९९२ पासून बॉक्साईट वाहतूक सुरू आहे. बॉक्साईट उत्खननास २००४ पर्यंत कोणतीच तक्रार नव्हती. परंतु, त्यानंतर विविध कारणामुळे तणाव, वाद सुरू झाले. सध्या त्रैवार्षिक करारानुसार कर्मचाऱ्यांना वेळेत पगार न दिल्यामुळे कंपनीच्या विरोधात कामगारांचा संताप व उद्रेक झाला. (वार्ताहर)ट्रकमालकांची मागणीगेले ३१ दिवस काम बंद असल्यामुळे बॉक्साईट वाहतूक बंद असल्याचा फटका बॉक्साईटची वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकांना बसत आहे. कंपनी व केवळ १८ ते २० कामगारांच्या वादात या विभागातील सुमारे ४०० ट्रकमालक-चालक आर्थिक अडचणीत आले आहेत. तरी या बंदबाबत दोन दिवसांत निर्णय व्हावा व १५ दिवसांत ७ ते ८ खेपा मिळाव्यात, प्रत्येक दिवशी १७० ट्रक भरावेत, अशी मागणी व्यवस्थापन बैठकीत ट्रकमालकांनी केली आहे.