शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

विकास आराखड्याचा आज होणार फैसला ?

By admin | Updated: March 4, 2015 00:30 IST

शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित विकास आराड्यासाठी राज्य शासनाकडून मंगळवारी रात्री उशिरा पर्यंत मुदतवाढ मिळालेली नाही.

सरवडे : दुर्गमानवाड (ता. राधानगरी) येथील हिंडाल्को कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या गेले ३१ दिवस पगारवाढीसंदर्भात सुरू असलेल्या बंदमुळे बॉक्साईट वाहतूक ठप्प आहे. कंपनी आणि कामगार युनियन यांच्या वादात मात्र सुमारे ४०० ट्रकमालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान, सोमवारी कंपनी अधिकारी, कामगार युनियन व ट्रकमालक यांच्या संयुक्त बैठकीत तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्या उपस्थितीत कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय झाला. मात्र, बंद कालावधीतील पगार मिळावा, या कामगारांच्या मागणीवर आता घोडे अडले आहे.हिंडाल्को कंपनीने बेळगाव येथील कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली. मात्र, जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगारांना पगारवाढ दिली नाही. त्यामुळे कंपनीकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने २ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले. त्यानंतर एकदिवसीय उपोषणही करण्यात आले. हिंद मजदूर कामगार संघटनेने त्रैवार्षिक करारानुसार पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला. प्रत्येक तीन वर्षाने कंपनी पगारवाढ देते. सध्याच्या कराराची ३० जून २०१४ ला मुदत संपली तरी कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. म्हणून कामगारांनी पगारवाढीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनास अधिक वेळ लागल्याने ट्रकमालकांनीही बॉक्साईट वाहतूक सुरू करा; अन्यथा कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.त्यामुळे कंपनीचे अधिकारी, ट्रकमालक व कामगार युनियनचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांच्या उपस्थितीत सोमवारी झाली. त्यावेळी कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय झाला. मात्र, काम बंद कालावधीतील दिवसांचा पगार कंपनीने द्यावा, ही मागणी कंपनीने मान्य केली नाही. त्यामुळे अजून बॉक्साईट वाहतूक बंद आहे.दुर्गमानवाड येथून १९९२ पासून बॉक्साईट वाहतूक सुरू आहे. बॉक्साईट उत्खननास २००४ पर्यंत कोणतीच तक्रार नव्हती. परंतु, त्यानंतर विविध कारणामुळे तणाव, वाद सुरू झाले. सध्या त्रैवार्षिक करारानुसार कर्मचाऱ्यांना वेळेत पगार न दिल्यामुळे कंपनीच्या विरोधात कामगारांचा संताप व उद्रेक झाला. (वार्ताहर)ट्रकमालकांची मागणीगेले ३१ दिवस काम बंद असल्यामुळे बॉक्साईट वाहतूक बंद असल्याचा फटका बॉक्साईटची वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकांना बसत आहे. कंपनी व केवळ १८ ते २० कामगारांच्या वादात या विभागातील सुमारे ४०० ट्रकमालक-चालक आर्थिक अडचणीत आले आहेत. तरी या बंदबाबत दोन दिवसांत निर्णय व्हावा व १५ दिवसांत ७ ते ८ खेपा मिळाव्यात, प्रत्येक दिवशी १७० ट्रक भरावेत, अशी मागणी व्यवस्थापन बैठकीत ट्रकमालकांनी केली आहे.