शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढ फेरप्रस्तावाबाबत दहा दिवसात निर्णय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:59 IST

कोल्हापूर : कायदा, नियम हे लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच केलेले असतात. त्यामुळे कायदा आणि व्यवहाराची सांगड घालून हद्दवाढीचा फेरप्रस्ताव ...

कोल्हापूर : कायदा, नियम हे लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच केलेले असतात. त्यामुळे कायदा आणि व्यवहाराची सांगड घालून हद्दवाढीचा फेरप्रस्ताव शासनाकडे तत्काळ पाठवा, अशी मागणी सर्वपक्षीय हद्दवाढ समर्थक कृती समितीच्यावतीने सोमवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली. हा प्रस्ताव प्रशासन पाठविणार की नाही, याबाबत दहा दिवसात निर्णय द्यावा, असा आग्रहही समितीने धरला.

ज्या महापालिकेची मुदत संपली असेल तेथे निवडणूक होत नाही, तोपर्यंत सहा महिने क्षेत्रात बदल करता येत नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत. परिणामी हद्दवाढीचा फेरप्रस्ताव पाठविण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे सोमवारी प्रशासक डॉ. बलकवडे यांनी सांगितले. यानंतर हद्दवाढ समर्थ कृती समितीच्या कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. १० दिवसात वकिलांचा अभिप्राय घेऊन फेरप्रस्ताव पाठविणार की नाही, हे स्पष्ट करण्याची मागणी कृती समितीने प्रशासकांकडे केली. यावेळी अनिल घाटगे, किशोर घाटगे, दुर्गेश लिंग्रस, माणिक मंडलिक, अशोक भंडारे आदींनी मनोगत व्यक्त केले.

चौकट

आचारसंहिता लागू नाही, प्रस्ताव पाठवा

ॲड. बाबा इंदुलकर म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यांनी फेरप्रस्ताव देण्याची सूचना केल्यामुळे हे शासनाचे मत आहे, असे शहरवासियांना वाटत आहे. त्यांना कायदे, नियम माहीत नाहीत म्हणून मत व्यक्त केले की, कोल्हापूरकरांना ‘गाजर’ दाखवले, हे आम्हाला माहीत नाही. निवडणुकीची आचारसंहिता अद्यापही लागू झालेली नाही. त्यामुळे ताबडतोब फेरप्रस्ताव पाठवा. तुम्हाला जमणार नसेल तर सांगा आम्हाला प्रस्ताव द्या तो शासनाकडे पोहोच करु.

चौकट

हद्दवाढीनंतर ग्रामपंचायतींची एनओसी घ्या

कृती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, राज्यात विकासाबाबतीत पाचव्या क्रमांकावर असणारे शहर आता तेराव्या क्रमांकावर आले आहे. हद्दवाढ झाली नसल्यामुळेच हि स्थिती आहे. हद्दवाढ केल्यानंतर विरोध असणाऱ्यांची समजूत काढून एनओसी घ्यावी, प्रथम घेऊ नका.

चौकट

कोण काय म्हणाले,

आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे : क्षेत्र बदल करता येत नाही. मात्र, प्रस्ताव पाठविण्यास कोणतीच अडचण नाही. निवडणुकीनंतर शासन मंजूर करेल.

क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर : प्राधिकरणामुळे महापालिकेच्या हातात काहीच पडले नाही. लोकसंख्येच्या निकषावर केंद्राकडून निधी मिळतो, याचा फटका बसत आहे. यामुळेच स्मार्ट सिटीत कोल्हापूरचा समावेश झाला नाही.

अनिल कदम : पूर्वीचाच प्रस्ताव पाठवायचा असून, निवडणुकीची अडचण येणार नाही.

बाबा पार्टे : प्राधिकरण नेमून तीन वर्ष झाली. प्रशासनाने याअगोदरच पुन्हा प्रस्ताव पाठवायला हवा होता.

फोटो : ११०१२०२० कोल केएमसी हद्दवाढ बैठक

ओळी : कोल्हापूरच्या हद्दवाढीचा फेरप्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची मागणी सोमवारी सर्वपक्षीय हद्दवाढ समर्थक कृती समितीच्यावतीने महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली.