शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

गावच्या जत्रा - यात्रांबाबत निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या गावोगावच्या जत्रा - यात्रांबाबत योग्य ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा बावडा : गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या गावोगावच्या जत्रा - यात्रांबाबत योग्य ते धोरण ठरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आली. या सभेत अपंगांचे साहित्य वाटपाला विलंब केल्याने सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. शाळेतील रिक्त पदे भरा, विस्कळीत होत असलेल्या संगणक सेवेचा सर्विस चार्ज भरू नका, आदी विषयांवरही या सभेत जोरदार चर्चा झाली. प्रभारी सभापती सुनील पोवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी गटविकास अधिकारी जयंत उगले उपस्थित होते. गेल्या वर्षभरापासून गावच्या जत्रा-यात्रा बंद झाल्या आहेत. मात्र, सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून, लस उपलब्ध झाल्याने या जत्रा-यात्रा भरविण्यासाठी ग्रामस्थांना परवानगी कधी देणार, असा प्रश्न इंद्रजीत पाटील यांनी विचारला. यावर सभापती सुनील पोवार यांनी जिल्हा प्रशासनाशी तसा पत्रव्यवहार करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. चंद्रकांत पाटील, मोहन पाटील, सागर पाटील, प्रदीप झांबरे यांनीही या विषयावर मत मांडले. तालुक्यात अपंगांसाठी देण्यात येणाऱ्या सायकल अद्याप का दिल्या नाहीत, असे विचारत प्रदीप झांबरे यांनी सायकलसाठी चकरा मारणाऱ्या एका अपंग व्यक्तीला सभागृहात उपस्थित केले. विजय भोसले यांनी संबंधित अपंगाला तुम्ही कोणा -कोणाला कितीवेळा भेटलात आणि त्यांनी काय उत्तरे दिली, याचा तपशील सभागृहात सांगा, अशी मागणी केली. संबंधित व्यक्तीला सभागृहात हजर केल्याने अविनाश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांकडून सायकल देण्यास विलंब का झाला, त्याचा खुलासा करावा, अशी मागणी राजू सूर्यवंशी यांनी केली. या प्रश्नावरून सभापती पोवार आणि सहाय्यक गटविकास अधिकारी शरद भोसले यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या विभागाचे प्रमुख असलेल्या सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांवर याबाबत तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी इंद्रजीत पाटील यांनी केली. तालुक्यातील ग्रामपंचायतींमधील संगणक खराब झाले आहेत तसेच संगणक सेवाही विस्कळीत झाली आहे. त्यामुळे या सेवेचा सर्विस चार्ज कोणीही भरू नये, असा ठराव सागर पाटील यांनी मांडला. त्याला सभागृहाने लगेच मंजुरी दिली.

चौकट

पगार वेळेवर आहेत, पण काम समाधानकारक नाही

शिक्षकांचे पगार वेळेवर होत आहेत, परंतु त्यांचे काम समाधानकारक नाही. ऑनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाल्याचा आरोप रमेश चौगले यांनी केला. तालुक्यातील १२५ रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी राजेंद्र सूर्यवंशी व अश्विनी धोत्रे यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत शाळांचे सर्व वर्ग सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी अश्विनी धोत्रे व विजय भोसले यांनी यावेळी केली.

या सभेत यशोदा पाटील, सरिता कटेजा, अर्चना खाडे, सविता पाटील, शोभा राजमाने, सुनीता कांबळे, सुरेखा सातपुते, नेताजी पाटील, मोहन पाटील, रमेश चौगले आदींनी विविध विषयांवरील चर्चेत भाग घेतला.