शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

‘ई-पीक पाहणी’ नोंदणीस १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये सर्व शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपव्दारे पिकांची प्रत्यक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाच्या ई-पीक पाहणी या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये सर्व शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपव्दारे पिकांची प्रत्यक्ष नोंदणी व पिकांची माहिती फोटोसह अपलोड करावी. माहिती अपलोड करण्यास काही अडचण आल्यास तलाठी किंवा कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी केले आहे. १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी ॲपव्दारे नाेंदणी केली नाही, तर पीक कर्ज, पीक विम्यासह इतर योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागणार असल्याचे रेखावार यांंनी पत्रकात म्हटले आहे. राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२१ पासून ई-पीक पाहणी प्रकल्प राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पांतर्गत शासनाव्दारे ई-पीक पाहणी हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपव्दारे शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पीकपेरणीची माहिती भरण्यासाठी तालुकानिहाय प्रत्येक गावामध्ये तलाठी व कृषी सहायक हे प्रशिक्षक म्हणून नेमले आहेत. हे प्रशिक्षक सर्व शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी या मोबाईल ॲपचा वापर कसा करावा? याविषयी प्रशिक्षण देत आहेत. प्रत्येक गावात तंत्रस्नेही तरुणांचा गटसुध्दा सर्वाना मदत करण्यासाठी बनविण्यात आला आहे.

पूर्वी तलाठी गावामध्ये दवंडी देऊन व प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी करून पिकांच्या नोंदी घेत असत. यानंतर संगणीकृत ७/१२ वर पीक पेऱ्याची नोंदी करण्यात येऊ लागल्या. आता बदलते स्वरूप म्हणून शेतकऱ्यांना स्वतःच स्वतःच्या पिकांच्या नोंदी करण्यासाठी पारदर्शक सुविधा उपलब्ध झाली आहे. यापुढे याच पध्दतीने नोंदी करावयाच्या आहेत. तसेच तलाठी स्वतः पीक पेरा नोंदवू शकणार नाहीत. गाव नमुना १२ अद्ययावत करण्याची ही एकमेव सुविधा उपलब्ध राहणार आहे.

सर्व शेतकऱ्यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२१ पूर्वी आपल्या शेतातील पिकांच्या नोंदी पूर्ण कराव्यात. या नोंदी शेतकऱ्यांनी न केल्यास पीककर्ज, पीकविमा, ठिबक व तुषार सिंचन आदी लाभापासून वंचित रहावे लागेल, असे जिल्हाधिकारी रेखावार यांनी पत्रकात म्हटले आहे.