शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

स्मशानभूमींची मरणासन्न अवस्था

By admin | Updated: January 16, 2016 00:53 IST

गगनबावडा तालुका : आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव

चंद्रकांत पाटील -- गगनबावडा--जीवनभर काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या मानवाला किमान मरण तरी चांगले यावे, अशी अपेक्षा असते; परंतु कित्येक ठिकाणच्या स्मशानभूमीत आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याने मृतदेहांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.गगनबावडा तालुक्यात तालुक्याच्या निर्मितीपासून बहुतांश स्मशानभूमींची ‘जैसे थे’ अवस्था आहे. काही तुरळक गावांत शासनाचा निधी खर्च करून स्मशानशेड बांधण्यात आले आहेत; परंतु त्यांची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. तालुक्यातील बहुतांश स्मशानभूमींच्या जमिनी खासगी मालकीच्या आहेत. खासगी मालकीत असलेल्या या जागा शक्यतो नदीकाठाला आहेत. प्रत्येक गावात वेगवेगळ्या समाजाच्या स्मशानभूमी आहेत; परंतु या सर्व स्मशानभूमींची वाताहत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याचप्रमाणे स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते व पायवाटा या खासगी मालकीच्या आहेत. शेतीच्या दिवसात एखाद्याचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीपर्यंत पोहोचताना ग्रमस्थांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या वाटा ग्रामपंचायतींच्या मालकीच्या असाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून गेली अनेक वर्षे केली जात आहे; परंतु शासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या व्यक्तींच्या वाट्याला मरणानंतरही वाईट यातना येत आहेत.पर्यटनाच्यादृष्टीने कितीही गाजावाजा केला जात असला तरी स्मशानभूमी हा महत्त्वाचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे. स्थानिक पदाधिकारी व सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन स्मशानभूमी व सुशोभीकरण होण्याच्यादृष्टीने शासनाच्या विविध योजनांचा निधी या कामासाठी खर्च करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.पाणीटंचाईचाही फटकातालुक्यातील बहुतांश स्मशानभूमी या घनदाट राई व काटेरी झाडाझुडपांत आहेत. मृतदेहांबरोबर आलेल्या व्यक्तींना काट्यातून मार्ग काढावा लागतो. त्याचप्रमाणे मृतदेहाच्या सर्व विधी पार पडेपर्यंत इतरांना स्मशानभूमी शेजारीच ताटकळत उभे राहावे लागते. काही ठिकाणी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने उन्हाचा त्रास, तसेच विधीवेळी लागणारे पाणी जवळपास नसल्याने काहीवेळा घराकडून पाणी घेऊन जावे लागते. या सर्व अडचणी प्रत्येकवेळी लोकांना भेडसावत आहेत.