शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

दिवस-रात्र अवजड वाहनांची डोकेदुखी

By admin | Updated: November 2, 2014 23:53 IST

एकेरी रस्ता करा : शुक्रवार गेट पोलीस चौकी-शिवाजी पूल चिंचोळ््या रस्त्यावर शेकडो खड्डे

कोल्हापूर : दिवस-रात्र अवजड वाहने, त्यातच रस्त्यामध्ये पडलेले मोठमोठे खड्डे व वाहतुकीसाठी अगदी चिंचोळा रस्ता, अशी स्थिती शुक्रवार गेट पोलीस चौकी ते शिवाजी पूल या रस्त्याची झाली आहे. हा रस्ता एकेरी (वन-वे) करावा व पापाची तिकटीपासून लोणार गल्लीमार्गे जुना बुधवारपेठ मार्गे असलेल्या पर्यायी मार्गाने वाहने जावीत, अशी मागणी नागरिकांमधून आता जोर धरू लागली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या गलथान कारभारामुळे हा रस्ता गेली दहा वर्षे असाच आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.खड्ड्यातगेलंय कोल्हापूर माझं !या रस्त्यावरील डांबरीकरण उखडले आहे. वाहनांमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य झाले आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी घराचे दार बंद केल्याशिवाय पर्याय नाही. धुळीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.- राजू कोरे, नागरिक.सततच्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची संपूर्ण धूळधाण झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालवणे अवघड आहे. महापालिका नवीन रस्ता कधी करणार या प्रतीक्षेत आहोत, तो लवकर व्हावा.- शकुंतला मांगुरे, नागरिक.नुसतेच पॅचवर्कया रस्त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या दहा वर्षांत नुसत्या पॅचवर्कशिवाय काही झालेले नाही. डांबर लागलेले कधीच बघितलेले नाही. सततच्या अवजड वाहनांमुळे ड्रेनेजच्या प्रश्नाबरोबर अंतर्गत जलवाहिनीचा प्रश्न निर्माण झाला आहे. महानगरपालिका नागरिकांकडून एकीकडे घरफाळ्याच्या माध्यमातून विविध कर घेते, पण कधी ड्रेनेजची पाईपलाईन बदलली नाही. त्यातच कोंडाळ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरुन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंबरडे मोडणारा रस्ताशुक्रवार गेटपासून ते पंचगंगा नदी शिवाजी पुलापर्यंतच्या रस्त्याची हमखास कंबरडे मोडणारा म्हणून विशेष ओळख होत आहे. शिवाजी पूल ब्रह्मपुरी पिकनिक पॉर्इंट सेंटरजवळील रस्त्यावरच घरगुती जलवाहिनी वरती आली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत अपघात होण्याचा धोका संभवतो. गेले कित्येक दिवस ही पाईपलाईन उघड्यावर पडली आहे. त्यामुळे कुठं रस्ता आहे हे समजतच नाही, असे नागरिक म्हणत आहेत.२० लाख मंजूर, असे म्हणतातया रोजच्या त्रासाला नागरिक अक्षरश: कंटाळले आहेत. नागरिक जेव्हा खराब रस्ता व अन्य प्रश्नांसाठी गेल्यावर महापालिका प्रशासन नुसती उडवाउडवीची उत्तरे देऊन ‘तुमच्या रस्त्याला २० लाख रुपये मंजूर’ झाले आहेत, असे थातुरमातुर उत्तरे देते. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे गाऱ्हाणे सांगितल्यावर त्यांच्याकडूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे आम्ही दाद मागायची कोणाकडे, अशा भावना व्यक्त होत आहेत.