शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

पहिला दिवस - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:23 IST

कोरोनाच्या आधी दोन वर्षे अशाच संकटांनी दणाणून गेली. वादळ, तुफान पाऊस, महापूर, भूकंप अशा नैसर्गिक संकटांनी जग गांजून ...

कोरोनाच्या आधी दोन वर्षे अशाच संकटांनी दणाणून गेली. वादळ, तुफान पाऊस, महापूर, भूकंप अशा नैसर्गिक संकटांनी जग गांजून गेलं होतं. ते संपतंय न संपतंय तोवर हा महाकाळ लोटला. त्यानं तर दोन वर्षे हैदोस घातलाय. प्रत्येकाच्या काळजात भीती. हुरहूर. संसर्गानं तर घेऊन टाकलंय. समोरच्या माणसाबद्दल गैरविश्वास. ना नाती, ना माया. सारे नातेबंध तोडून टाकलेत. घरातल्या घरात कोरोनाचं वादळ. भयंकर-महाभयंकर. या विषाणूंची कोटी-कोटींची उत्पत्ती; पण दिसत नाही, कळत नाही, जाणवत नाही, उमगत नाही, अवगत नाही, पण बघता-बघता श्वास बंद करून टाकतो. माय-लेकीचं नातं असो, नाही तर बाप-लेकांचं असो, यांचं मायाममतेचं नातं उद्ध्वस्त करून टाकतो, घराघरांची ताटातूट करतो, अख्खी कुटुंबच्या कुटुंबं बघता-बघता वाऱ्याला लावतो, अग्नीच्या तोंडी लावतो. कोण कुणाशी बोलू शकत नाही. आईचं बाळ आईचं राहू शकत नाही. जग अजून पुरतं पाहिलं नसेल, अशा अजाण बाळाच्या किलकिल्या डोळ्यादेखत बिचाऱ्या आईला कोरोना होत्याची नव्हती करतो. अजून लग्नाची हळद निघाली नसेल, त्यावेळी नववधूच्या कपाळाचं कुंकू पुसलं जातं. होमाभोवती सात फेरे पूर्ण व्हायच्या आधी कपाळीच्या मुंडावळ्या ओरबडून नेल्या जातात. परिश्रमाने भला संसार उभा केलेला; पण अर्ध्या वाटेवर तो उधळला जातो. कोण साधू, कोण संत, कोण सम्राट, कोण अनेक देशांचे प्रतिपालक, पण मी अजिंक्य म्हणणाऱ्यांच्या डोळ्यासमोर चांदण्या नाचायला लावणारा हा क्रूरकर्मा कोरोना.

घर हाच बंदीखाना बनलाय. इकडं यायचं नाही, तिकडं जायचं नाही, देवळा-मंदिराकडं फिरकायचं नाही, उत्सव बंद, महोत्सव थंड. आयुष्यभराचा साथीदार करायचा, जोडायचा चार-चौघांच्याच साक्षीनं, व्हराड नाही की वरात नाही, कुस्तीचं मैदान नाही की वर्षाची यात्रा नाही, सणांचे सोहळे गुपचूप. कुणीही यावं, कुणीही जावं. याचा खेळखंडोबा झालाय. खुशालीनं जगताय? नाही. तसं निवांतपणानं जगणं आणायचं कुठून. पूर्वी मामाच्या गावी जायचं. मावशीच्या हावी पळायचं; पण आता गावं बंद, वेश बंद, गल्ली बंद, बोळ बंद, सारंच बंद.

उद्योदधंदे बंद, रोजगार बंद, उपासमार. काय खायचं, काय प्यायचं? जिवाची नुसती तडफड-तडफड. लेकराबाळांच्या इवल्याशा डोळ्यात किती कोवळे हळवे अश्रू! जिवांचा आकांत. कसं जगायचं? कसं जगायचं? आधारासाठी कुणाच्या तोंडाकडं बघायचं? घरातला आधार तुटला की अख्खं घर कोसळून जातं. सारं जगच उद्ध्वस्त. धीर द्यायला कुणाला उसंत. नात्यातला माणूस गेला की आत्महत्यांच्या किती करूण कहाण्या ऐकाव्या. काळीज थरारून जातं. डोळ्याला पाझर फुटतात.

आजचीच गोष्ट. आज ‘फादर्स डे’ एकाची पत्नी जिनं रात्रंदिवस नवऱ्याबरोबर राबून संसार उभा केला, ती या कोरोनानं नेली. पत्नीच्या मृत्यूचा जबरदस्त मानसिक धक्का नवऱ्याला बसला. आपल्या दोन तरुण मुलींसह गळफास घेऊन नवऱ्यानं आत्महत्या केली. आजच्या ‘आदर्स डे’नं हे हृदयद्रावक चित्र आपल्या काळजात उभं केलं. या अशा भयानक कोरोनानं अशी असंख्य घरं उद्ध्वस्त केलीत. गावांचा विध्वंस केलाय. कुणी कुणाला सावरायचं? कोरोनानं अनेक रुग्णांना देशोधडीला लावलंय. रुण मेला की त्याचं गाठोळं बांधतात. ते घरी न नेता परस्पर स्मशानात नेतात. अग्नी देणाऱ्यांच्या रांगेत ठेवतात. केव्हा क्रम लागेल तेव्हा पेटवायचा. ना कसले सोपस्कार, ना कुटुंबियांचे दर्शन. मृत रुग्णांची संख्या न सावरण्यासारखी. मग ती प्रेताची गाठोडी भरल्या नदीत फेकून देतात. ही भयानक असहाय्यता. किती भयंकर अगतिकता!

अशा गाठोड्यांचे पवीड नदीतिरी लागलेले असतात. अशी ही दैन्यावस्था या कोरोनानं केलेली आहे. सारे व्यवहार विस्कळीत झाले आहेत. माणसाला लुळंपांगळं करून सोडले आहे.

भय, भीती माणसाला गांगरून टाकतेय. जिकडं-तिकडं ॲम्ब्युलन्सचे आवाज. नाना कठोर गोष्टींशी टक्कर देणारा माणूस हतबल झाला आहे. ती आवाज करणारी ॲम्ब्युलन्स नुसती नजरेस पडली, तरी धडकी भरते. लॉकडाऊनची नुसती जाणीव झाली, तरी माणूस हादरून जातो. काय करावं सूचत नाही. नको हे जगणं, असं वाटून जातं. मग आत्महत्या सूचतात. कशासाठी आणि कसं जगायचं, हे कळत नाही. आत्महत्याच्याच आत्महत्या!