शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वेगळी ओळख जपलेला दाउदी बोहरा समाज

By admin | Updated: April 27, 2015 00:19 IST

शांतताप्रिय समाज : जिल्ह्यात फक्त २१० लोक संख्या--लोकमतसंगे जाणून घेऊ--दाउदी बोहरा समाज

संतोष पाटील-  कोल्हापूर  -शांतताप्रिय आणि उद्यमशील समाज म्हणून दाउदी बोहरा समाजाची ओळख आहे. समाजातील कोणावरही साध्या किरकोळ गुन्ह्याचीही नोंद नाही. शरीरासह परिसर स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. ज्या देशात, प्रदेशात राहणार तिथला कायदा-नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्याकडे या समाजाचा कल असतो. महिला व पुरुषांसाठी ड्रेसकोड आहे. अशा अनेक वैशिष्ट्यांसह उच्चतंत्रज्ञानाची कास धरत धर्मगुरूंचा सल्ला किंवा आदेश शिरसावंद्य मानत दाउदी बोहरा समाजाने आपले वेगळे अस्तित्व व ओळख टिकवण्यात यश मिळविले आहे. सामाजिक शिस्तबद्धतेसह पुरोगामीत्व जपत वाटचाल करत असलेल्या दाउदी बोहरा समाजाने वेगळा ठसा उमटविला आहे. या समाजाचे आचरण, विचारपद्धती, राहणीमान याबाबत ‘समाज ओळख’ या सदरात अधिक माहिती जाणून घेऊया..!जगाच्या कानाकोपऱ्यांत बोहरा समाज विखुरला आहे. व्यवसाय हाच चरितार्थचा पाया मानत या समाजाची वाटचाल सुरू आहे. बोहरा समाजातील लोक नोकरीपेक्षा व्यवसायास प्राधान्य देतात. त्यांची आडनावे गाव किंवा व्यवसायावरूनच असतात. जसे व्हीनस टॉकीजचे मालक म्हणून हकिमभाई बोहरा यांचे आडनाव ‘व्हीनसवाला’, तर एखादा लोखंडाचा व्यवसाय करत असेल तर तो ‘लोखंडवाला’. इतक्या खोलवर व्यवसायाचे महत्त्व रूजले आहे. या समाजाची जिल्ह्यात ५५ घरे असून, २१० लोकसंख्या आहे. ‘दाईल उल मुत्तलक’ म्हणजेच समाजाचे प्रमुख धर्मगुरू, ते जो आदेश देतील, जी कुराणाच्या साक्षीने दीक्षा देतील, ती अंतिम मानण्याचा प्रघात या समाजात आहे. जीवनात धर्मगुरूंचे स्थान सर्वाेच्च आहे. पांढरा शुभ्र कुर्ता, पायजमा अन् टोपी हा पुरुषांचा पेहराव, तर महिलांसाठी ‘रिदा’ हा पोशाख आहे. जगभरातील बोहरा समाजाची अरबीमिश्रित गुजराती ही मातृभाषा आहे. समाजातील प्रत्येकाला किमान कुराण समजण्याइतपत अरबी भाषा येतेच. ५२ वे दाईल उल मुत्तलक (सयैदना) मोहम्मद बुऱ्हाद्दिन यांनी अलिगड मुस्लिम विश्वविद्यालयाचे कुलगुरूपद भूषविले. त्यांनी सर्व धर्मांतील लोकांसाठी अनेक शाळा, महाविद्यालये, दवाखान्यांची उभारणी केली. सर्वधर्मियांसाठी व्यवसायाचे मार्गदर्शन व मदत करणारी ‘बुऱ्हानिया बिझनेस सेंटर’ची मुंबईत स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन बोहरा समाजाने पक्ष्यांसाठी तब्बल २० हजार ६३१ घरट्यांचे जतन केले. त्याची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली. या कार्यामुळे केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ने गौरविले. १७ जानेवारी २०१४ रोजी त्यांचे वयाच्या १०२व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीवेळी जगभरातून लाखोंच्या संख्येने आलेल्या बोहरा समाजातील व्यक्तींनी जगाला शिस्तबद्धतेचे दर्शन घडविले. सध्या ५३वे गुरू अलीकदर मुफद्दल सैफुद्दिन यांच्या मार्गदर्शनाखाली जगभरातील बोहरा समाजाची वाटचाल सुरू आहे.समाजातील प्रत्येकाला ‘युनिक आयडेंटी कार्ड’ दिले जाते. मूल जन्माला आल्यानंतर दिल्या जाणाऱ्या या स्मार्टकार्डवर त्याचे नाव, छायाचित्र, जन्मदिनांक, पत्ता, कौटुंबिक आर्थिक स्थिती, रक्तगटासह एखादा आजार असल्याची माहिती, आदी नोंदी असतात. जगभरातील सर्व बोहरा समाजातील प्रत्येक व्यक्तीकडे अशा प्रकारचे कार्ड असते. ेएकमेकास साहाय्यसमाजातील व्यक्तींना घरबांधणीसाठी आर्थिक मदत केली जाते. समाजाची बँकेसारखी अर्थव्यवस्था आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले लोक निधी जमा करतात. गरज असेल त्यावेळी हा निधी परत केला जातो, तर याच निधीतून समाजातील गरीब व गरजूंना आवश्यकतेनुसार बिनव्याजी आर्थिक मदत केली जाते.मोफत भोजनधर्मगुरू सैफुद्दिन यांनी जगभरातील बोहरा समाजासाठी धाली पद्धत (कम्युनिटी किचन संकल्पना) सुरू केली. जगभरात दहा लाखांहून अधिक बोहरा कुटुंबांना मोफत भोजनाचा डबा पोहोच केला जातो. वेगवेगळ्या आर्थिक स्तरांत जगणाऱ्या समाजबांधवाला एकसमान भोजन मिळाले पाहिजे, ही यामागील उदात्त भावना आहे. कोल्हापुरातील बोहरा समाजाचे अमील (जमातीचे प्रमुख) भाईसाहेब हसन शाकीर यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक व वैयक्तिक वाटचाल सुरू आहे. कोल्हापुरातील ५५ घरांत सकाळी भोजनाचा डबा पोहोचतो.ज्या देशात व प्रदेशात राहता, तेथील कायदे- नियम कटाक्षाने पाळा. समाजात वावरत असताना कोणतीही भाषा बोला. मात्र, घरी आल्यानंतर मातृभाषेतूनच संवाद साधा. बोहरासह सर्व धर्मातील लोकांबाबत सहिष्णूता बाळगा. स्वत:सह समाजाची, देशाची प्रगती करा. ही धर्मगुरूंनी दिलेली शिकवण समोर ठेवूनच बोहरा समाजाची वाटचाल सुरू आहे. - हकिमभाई बोहरा-व्हीनसवालामाजी सचिव, बोहरा समाज बोहरा समाज हा उच्च तंत्रज्ञानाच्या वापरात आघाडीवर आहे. त्याच्या माध्यमातून जगभरातील समाजबांधव एकत्र बांधले गेले आहेत. धर्मगुरूंचे आदेश, सूचना, प्रवचन, आदींची माहिती इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून घेतली जाते. समाजाने आयोजित केलेले कार्यक्रम सुनियोजित असतात. त्यात कोणताही गोंधळ किंवा गर्दी होताना दिसत नाही. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पडतात. रमजान, मोहरम किंवा धार्मिक विधीवेळी समक्ष दर्शन शक्य नसल्यास इंटरनेटच्या माध्यमातून धर्मगुरूंचे ‘लाईव्ह’ दर्शन घेतले जाते.समाजाची वैशिष्ट्येप्रत्येकाची युनिक आयडेंटीलग्नात खर्च कमी, उधळपट्टीला चाप‘कम्युनिटी किचन’ संकल्पनापूर्णत: शिक्षित समाजअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरमहिला व पुरुषांसाठी ड्रेसकोड‘अत्यंत शांतताप्रिय लोक’म्हणून ओळखपुरोगामी विचारांची कासमुलांप्रमाणेच मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण अधिकवास्तव्य असणाऱ्या देशांतील कायदे-नियमाचे पालननोकरीपेक्षा व्यवसायाकडे कलघरबांधणीसह व्यापारासाठी समाजाकडून आर्थिक मदतगाव, कामधंद्यांवरून आडनावेधर्मगुरूंना अनन्यसाधारण महत्त्वघटस्फोटाचे प्रमाण अत्यल्पवेगळी मशिद, तीनवेळा नमाज पठणशारीरिक व परिसर स्वच्छतेला महत्त्व व प्राधान्य