शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

धरणग्रस्तांनी उचंगी धरणाचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST

धरणस्थळावर जे.सी.बी., डंपर तैनात आजरा : आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाचे सुरू केलेले काम धरणग्रस्तांनी मोर्चाने जाऊन बंद पाडले. ‘आधी ...

धरणस्थळावर जे.सी.बी., डंपर तैनात

आजरा : आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाचे सुरू केलेले काम धरणग्रस्तांनी मोर्चाने जाऊन बंद पाडले. ‘आधी पुनर्वसन, मगच धरण’असे धरणग्रस्तांनी अधिकाऱ्यांना सुनावले. धरणस्थळावरील रस्त्यांची साफसफाई व घळभरणीच्या कामांना सुरुवात केली होती.

धरणग्रस्तांनी प्रकल्पाचे काम बंद पाडल्यानंतर चाफवडे येथील विठ्ठल मंदिरात पाटबंधारेचे अधिकारी व धरणग्रस्तांची बैठक झाली. उचंगी प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. घळभरणीचे काम शिल्लक आहे. मात्र, धरणग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. धरणग्रस्त वसाहतीमध्ये अद्यापही सुविधा उपलब्ध नाहीत. संकलन दुरुस्ती, भूखंड वाटप, पॅकेजचे पैसे वाटप, पर्यायी जमीन वाटप या विषयांवर धरणग्रस्तांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी उचंगी धरणाच्या तारओहोळ ओढ्यातील विहिरीचे काम सुरू करण्यासाठी जेसीबी व डंपर प्रकल्पस्थळावर आणून परिसराच्या स्वच्छतेला सुरुवात केली होती.

विठ्ठल मंदिरातील चर्चेत धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली. कार्यकारी अभियंता अमोल नाईक, उपविभागीय अभियंता अनिल कोरगावकर, विजयसिंह राठोड, कनिष्ठ अभियंता सुशील पाटील, धरणग्रस्तांचे नेते संजय तर्डेकर, निवृत्ती बापट, संजय गावडे, संजय भडांगे, शंकर लांडे, रघुनाथ धडाम, आप्पा मणकेकर, चंद्रकांत ठाकर, प्रकाश मस्कर, विठोबा सुपल, आप्पा धडाम व धरणग्रस्त उपस्थित होते.

------------------------

* आंबेओहोळपाठोपाठ उचंगीचेही काम बंद

आंबेओहोळ धरणग्रस्तांनी दोन दिवसांपूर्वी पुनर्वसनाच्या प्रश्नांसाठी धरणाचे काम बंद पाडले. त्यापाठोपाठ धरणग्रस्तांनी उचंगीचेही काम मोर्चाने जाऊन बंद पाडले. पुनर्वसनाशिवाय धरणाचे काम करू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

------------------------

* उचंगी प्रकल्पस्थळावर तात्पुरते कार्यालय होणार

धरणग्रस्तांच्या अडचणींसाठी यापुढे आजरा, गारगोटी, गडहिंग्लज येथे जावे लागते. त्यामुळे धरणग्रस्तांचा वेळ, पैसा व श्रम वाया जातात. ते होऊ नये यासाठी प्रकल्पस्थळावर तात्पुरते कार्यालय सुरू करून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत.