शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
4
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
5
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
6
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
7
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
8
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
9
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
10
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
11
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
12
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
13
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
14
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
15
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
16
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
17
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
18
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
19
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
20
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?

धरणग्रस्तांनी उचंगी धरणाचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST

धरणस्थळावर जे.सी.बी., डंपर तैनात आजरा : आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाचे सुरू केलेले काम धरणग्रस्तांनी मोर्चाने जाऊन बंद पाडले. ‘आधी ...

धरणस्थळावर जे.सी.बी., डंपर तैनात

आजरा : आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्पाचे सुरू केलेले काम धरणग्रस्तांनी मोर्चाने जाऊन बंद पाडले. ‘आधी पुनर्वसन, मगच धरण’असे धरणग्रस्तांनी अधिकाऱ्यांना सुनावले. धरणस्थळावरील रस्त्यांची साफसफाई व घळभरणीच्या कामांना सुरुवात केली होती.

धरणग्रस्तांनी प्रकल्पाचे काम बंद पाडल्यानंतर चाफवडे येथील विठ्ठल मंदिरात पाटबंधारेचे अधिकारी व धरणग्रस्तांची बैठक झाली. उचंगी प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. घळभरणीचे काम शिल्लक आहे. मात्र, धरणग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. धरणग्रस्त वसाहतीमध्ये अद्यापही सुविधा उपलब्ध नाहीत. संकलन दुरुस्ती, भूखंड वाटप, पॅकेजचे पैसे वाटप, पर्यायी जमीन वाटप या विषयांवर धरणग्रस्तांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी उचंगी धरणाच्या तारओहोळ ओढ्यातील विहिरीचे काम सुरू करण्यासाठी जेसीबी व डंपर प्रकल्पस्थळावर आणून परिसराच्या स्वच्छतेला सुरुवात केली होती.

विठ्ठल मंदिरातील चर्चेत धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा झाली. कार्यकारी अभियंता अमोल नाईक, उपविभागीय अभियंता अनिल कोरगावकर, विजयसिंह राठोड, कनिष्ठ अभियंता सुशील पाटील, धरणग्रस्तांचे नेते संजय तर्डेकर, निवृत्ती बापट, संजय गावडे, संजय भडांगे, शंकर लांडे, रघुनाथ धडाम, आप्पा मणकेकर, चंद्रकांत ठाकर, प्रकाश मस्कर, विठोबा सुपल, आप्पा धडाम व धरणग्रस्त उपस्थित होते.

------------------------

* आंबेओहोळपाठोपाठ उचंगीचेही काम बंद

आंबेओहोळ धरणग्रस्तांनी दोन दिवसांपूर्वी पुनर्वसनाच्या प्रश्नांसाठी धरणाचे काम बंद पाडले. त्यापाठोपाठ धरणग्रस्तांनी उचंगीचेही काम मोर्चाने जाऊन बंद पाडले. पुनर्वसनाशिवाय धरणाचे काम करू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

------------------------

* उचंगी प्रकल्पस्थळावर तात्पुरते कार्यालय होणार

धरणग्रस्तांच्या अडचणींसाठी यापुढे आजरा, गारगोटी, गडहिंग्लज येथे जावे लागते. त्यामुळे धरणग्रस्तांचा वेळ, पैसा व श्रम वाया जातात. ते होऊ नये यासाठी प्रकल्पस्थळावर तात्पुरते कार्यालय सुरू करून धरणग्रस्तांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत.