शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

धरणग्रस्तांना मागून नव्हे, लढून मिळते : श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:33 IST

* चाफवडे येथील बैठकीत उचंगी धरणग्रस्तांचा निर्णय आजरा : धरणग्रस्तांना मागून मिळत नाही, लढून मिळते हा संघटनेचा इतिहास आहे. ...

* चाफवडे येथील बैठकीत उचंगी धरणग्रस्तांचा निर्णय

आजरा : धरणग्रस्तांना मागून मिळत नाही, लढून मिळते हा संघटनेचा इतिहास आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील सर्व धरणग्रस्तांनी संघटित व्हा, असे आवाहन माजी आमदार व धरणग्रस्तांचे नेते श्रीपतराव शिंदे यांनी केले.

चाफवडे (ता. आजरा) येथे उचंगी धरणग्रस्तांच्या परिषदेत ते बोलत होते. पुनर्वसनाचे प्रश्न सोडविल्याशिवाय अधिकाऱ्यांना धरणावर फिरकू द्यायचे नाही व धरणग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात एकजुटीने लढण्याचा निर्धार मंगळवारच्या परिषदेत करण्यात आला.

धरणग्रस्तांच्या व्यथा माजी सरपंच सुरेश पाटील व चाफवडेचे सरपंच विलास धडाम यांनी प्रास्ताविकात मांडल्या. उचंगीच्या धरणग्रस्तांनी सुरुवातीच्या काळात शासनाच्या अधिकाऱ्यांना पळवून लावलेले आहे हा इतिहास आहे. एकजुटीने लढण्याशिवाय पर्याय नाही. धरणग्रस्तांनी संघटित राहावे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे धरणग्रस्तांचे राज्याचे नेते कॉ. धनाजी गुरव यांनी सांगितले.

वशिल्याने धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत. एकजुटीने पुनर्वसन करण्यास भाग पाडूया, असे कॉ. अशोक जाधव यांनी सांगितले. उचंगीच्या शेवटच्या धरणग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सर्व ताकदीनिशी पाठीशी राहणार असल्याचे बाळेश नाईक यांनी सांगितले. धरणग्रस्तांचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी निखराचा लढा करणार असल्याचे कॉ. संजय तर्डेकर यांनी सांगितले.

सर्व धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत एकजुटीने लढा उभा करणे व पुनर्वसनाचे प्रश्न सुटल्याशिवाय धरणाचे काम सुरू न करण्याचा निर्धार परिषदेत करण्यात आला.

परिषदेला शंकर पावले, सचिन पावले, आप्पा मणकेकर, संजय भडांगे, धनाजी दळवी, निवृत्ती बापट, दत्तात्रय बापट, रामचंद्र ठाकर, जेऊरचे सरपंच मारुती चव्हाण, चितळेचे जयवंत सरदेसाई यासह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------

धरणग्रस्तांच्या फुटीचा गैरफायदा अधिकारी व शासनकर्त्यांनी घेतला. मात्र, यापुढे सर्व धरणग्रस्त एकजुटीने लढणार आहोत. धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत लढा सुरूच राहील, असे कॉ. अशोक जाधव यांनी जाहीर केले.

--------------------------------

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दहा वेळा अटक झाली तरी तुरुंगात जायची तयारी आहे. ५१ वर्षांत दाढी राखली नाही, पण तुरुंगातील १६ दिवसांत दाढी केली नाही. धरणग्रस्तांना भीती वाटू नये. लढण्याची प्रेरणा मिळण्यासाठी दाढी राखल्याचे आंबेओहोळ धरणग्रस्त कॉ. शिवाजी गुरव यांनी सांगितले.

* फोटो ओळी : चाफवडे (ता. आजरा) येथे उचंगी धरणग्रस्तांच्या परिषदेत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी धरणग्रस्तांना मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, अशोक जाधव, संजय तर्डेकर, आदी उपस्थित होते.

क्रमांक : २९१२२०२०-गड-१५