शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांना मागून नव्हे, लढून मिळते : श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:33 IST

* चाफवडे येथील बैठकीत उचंगी धरणग्रस्तांचा निर्णय आजरा : धरणग्रस्तांना मागून मिळत नाही, लढून मिळते हा संघटनेचा इतिहास आहे. ...

* चाफवडे येथील बैठकीत उचंगी धरणग्रस्तांचा निर्णय

आजरा : धरणग्रस्तांना मागून मिळत नाही, लढून मिळते हा संघटनेचा इतिहास आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील सर्व धरणग्रस्तांनी संघटित व्हा, असे आवाहन माजी आमदार व धरणग्रस्तांचे नेते श्रीपतराव शिंदे यांनी केले.

चाफवडे (ता. आजरा) येथे उचंगी धरणग्रस्तांच्या परिषदेत ते बोलत होते. पुनर्वसनाचे प्रश्न सोडविल्याशिवाय अधिकाऱ्यांना धरणावर फिरकू द्यायचे नाही व धरणग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात एकजुटीने लढण्याचा निर्धार मंगळवारच्या परिषदेत करण्यात आला.

धरणग्रस्तांच्या व्यथा माजी सरपंच सुरेश पाटील व चाफवडेचे सरपंच विलास धडाम यांनी प्रास्ताविकात मांडल्या. उचंगीच्या धरणग्रस्तांनी सुरुवातीच्या काळात शासनाच्या अधिकाऱ्यांना पळवून लावलेले आहे हा इतिहास आहे. एकजुटीने लढण्याशिवाय पर्याय नाही. धरणग्रस्तांनी संघटित राहावे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे धरणग्रस्तांचे राज्याचे नेते कॉ. धनाजी गुरव यांनी सांगितले.

वशिल्याने धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत. एकजुटीने पुनर्वसन करण्यास भाग पाडूया, असे कॉ. अशोक जाधव यांनी सांगितले. उचंगीच्या शेवटच्या धरणग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सर्व ताकदीनिशी पाठीशी राहणार असल्याचे बाळेश नाईक यांनी सांगितले. धरणग्रस्तांचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी निखराचा लढा करणार असल्याचे कॉ. संजय तर्डेकर यांनी सांगितले.

सर्व धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत एकजुटीने लढा उभा करणे व पुनर्वसनाचे प्रश्न सुटल्याशिवाय धरणाचे काम सुरू न करण्याचा निर्धार परिषदेत करण्यात आला.

परिषदेला शंकर पावले, सचिन पावले, आप्पा मणकेकर, संजय भडांगे, धनाजी दळवी, निवृत्ती बापट, दत्तात्रय बापट, रामचंद्र ठाकर, जेऊरचे सरपंच मारुती चव्हाण, चितळेचे जयवंत सरदेसाई यासह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------

धरणग्रस्तांच्या फुटीचा गैरफायदा अधिकारी व शासनकर्त्यांनी घेतला. मात्र, यापुढे सर्व धरणग्रस्त एकजुटीने लढणार आहोत. धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत लढा सुरूच राहील, असे कॉ. अशोक जाधव यांनी जाहीर केले.

--------------------------------

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दहा वेळा अटक झाली तरी तुरुंगात जायची तयारी आहे. ५१ वर्षांत दाढी राखली नाही, पण तुरुंगातील १६ दिवसांत दाढी केली नाही. धरणग्रस्तांना भीती वाटू नये. लढण्याची प्रेरणा मिळण्यासाठी दाढी राखल्याचे आंबेओहोळ धरणग्रस्त कॉ. शिवाजी गुरव यांनी सांगितले.

* फोटो ओळी : चाफवडे (ता. आजरा) येथे उचंगी धरणग्रस्तांच्या परिषदेत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी धरणग्रस्तांना मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, अशोक जाधव, संजय तर्डेकर, आदी उपस्थित होते.

क्रमांक : २९१२२०२०-गड-१५