शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

धरणग्रस्तांना मागून नव्हे, लढून मिळते : श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:33 IST

* चाफवडे येथील बैठकीत उचंगी धरणग्रस्तांचा निर्णय आजरा : धरणग्रस्तांना मागून मिळत नाही, लढून मिळते हा संघटनेचा इतिहास आहे. ...

* चाफवडे येथील बैठकीत उचंगी धरणग्रस्तांचा निर्णय

आजरा : धरणग्रस्तांना मागून मिळत नाही, लढून मिळते हा संघटनेचा इतिहास आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील सर्व धरणग्रस्तांनी संघटित व्हा, असे आवाहन माजी आमदार व धरणग्रस्तांचे नेते श्रीपतराव शिंदे यांनी केले.

चाफवडे (ता. आजरा) येथे उचंगी धरणग्रस्तांच्या परिषदेत ते बोलत होते. पुनर्वसनाचे प्रश्न सोडविल्याशिवाय अधिकाऱ्यांना धरणावर फिरकू द्यायचे नाही व धरणग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात एकजुटीने लढण्याचा निर्धार मंगळवारच्या परिषदेत करण्यात आला.

धरणग्रस्तांच्या व्यथा माजी सरपंच सुरेश पाटील व चाफवडेचे सरपंच विलास धडाम यांनी प्रास्ताविकात मांडल्या. उचंगीच्या धरणग्रस्तांनी सुरुवातीच्या काळात शासनाच्या अधिकाऱ्यांना पळवून लावलेले आहे हा इतिहास आहे. एकजुटीने लढण्याशिवाय पर्याय नाही. धरणग्रस्तांनी संघटित राहावे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे धरणग्रस्तांचे राज्याचे नेते कॉ. धनाजी गुरव यांनी सांगितले.

वशिल्याने धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत. एकजुटीने पुनर्वसन करण्यास भाग पाडूया, असे कॉ. अशोक जाधव यांनी सांगितले. उचंगीच्या शेवटच्या धरणग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सर्व ताकदीनिशी पाठीशी राहणार असल्याचे बाळेश नाईक यांनी सांगितले. धरणग्रस्तांचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी निखराचा लढा करणार असल्याचे कॉ. संजय तर्डेकर यांनी सांगितले.

सर्व धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत एकजुटीने लढा उभा करणे व पुनर्वसनाचे प्रश्न सुटल्याशिवाय धरणाचे काम सुरू न करण्याचा निर्धार परिषदेत करण्यात आला.

परिषदेला शंकर पावले, सचिन पावले, आप्पा मणकेकर, संजय भडांगे, धनाजी दळवी, निवृत्ती बापट, दत्तात्रय बापट, रामचंद्र ठाकर, जेऊरचे सरपंच मारुती चव्हाण, चितळेचे जयवंत सरदेसाई यासह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------

धरणग्रस्तांच्या फुटीचा गैरफायदा अधिकारी व शासनकर्त्यांनी घेतला. मात्र, यापुढे सर्व धरणग्रस्त एकजुटीने लढणार आहोत. धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत लढा सुरूच राहील, असे कॉ. अशोक जाधव यांनी जाहीर केले.

--------------------------------

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दहा वेळा अटक झाली तरी तुरुंगात जायची तयारी आहे. ५१ वर्षांत दाढी राखली नाही, पण तुरुंगातील १६ दिवसांत दाढी केली नाही. धरणग्रस्तांना भीती वाटू नये. लढण्याची प्रेरणा मिळण्यासाठी दाढी राखल्याचे आंबेओहोळ धरणग्रस्त कॉ. शिवाजी गुरव यांनी सांगितले.

* फोटो ओळी : चाफवडे (ता. आजरा) येथे उचंगी धरणग्रस्तांच्या परिषदेत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी धरणग्रस्तांना मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, अशोक जाधव, संजय तर्डेकर, आदी उपस्थित होते.

क्रमांक : २९१२२०२०-गड-१५