शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

धरणग्रस्तांना मागून नव्हे, लढून मिळते : श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:33 IST

* चाफवडे येथील बैठकीत उचंगी धरणग्रस्तांचा निर्णय आजरा : धरणग्रस्तांना मागून मिळत नाही, लढून मिळते हा संघटनेचा इतिहास आहे. ...

* चाफवडे येथील बैठकीत उचंगी धरणग्रस्तांचा निर्णय

आजरा : धरणग्रस्तांना मागून मिळत नाही, लढून मिळते हा संघटनेचा इतिहास आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील सर्व धरणग्रस्तांनी संघटित व्हा, असे आवाहन माजी आमदार व धरणग्रस्तांचे नेते श्रीपतराव शिंदे यांनी केले.

चाफवडे (ता. आजरा) येथे उचंगी धरणग्रस्तांच्या परिषदेत ते बोलत होते. पुनर्वसनाचे प्रश्न सोडविल्याशिवाय अधिकाऱ्यांना धरणावर फिरकू द्यायचे नाही व धरणग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात एकजुटीने लढण्याचा निर्धार मंगळवारच्या परिषदेत करण्यात आला.

धरणग्रस्तांच्या व्यथा माजी सरपंच सुरेश पाटील व चाफवडेचे सरपंच विलास धडाम यांनी प्रास्ताविकात मांडल्या. उचंगीच्या धरणग्रस्तांनी सुरुवातीच्या काळात शासनाच्या अधिकाऱ्यांना पळवून लावलेले आहे हा इतिहास आहे. एकजुटीने लढण्याशिवाय पर्याय नाही. धरणग्रस्तांनी संघटित राहावे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे धरणग्रस्तांचे राज्याचे नेते कॉ. धनाजी गुरव यांनी सांगितले.

वशिल्याने धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत. एकजुटीने पुनर्वसन करण्यास भाग पाडूया, असे कॉ. अशोक जाधव यांनी सांगितले. उचंगीच्या शेवटच्या धरणग्रस्ताचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सर्व ताकदीनिशी पाठीशी राहणार असल्याचे बाळेश नाईक यांनी सांगितले. धरणग्रस्तांचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी निखराचा लढा करणार असल्याचे कॉ. संजय तर्डेकर यांनी सांगितले.

सर्व धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत एकजुटीने लढा उभा करणे व पुनर्वसनाचे प्रश्न सुटल्याशिवाय धरणाचे काम सुरू न करण्याचा निर्धार परिषदेत करण्यात आला.

परिषदेला शंकर पावले, सचिन पावले, आप्पा मणकेकर, संजय भडांगे, धनाजी दळवी, निवृत्ती बापट, दत्तात्रय बापट, रामचंद्र ठाकर, जेऊरचे सरपंच मारुती चव्हाण, चितळेचे जयवंत सरदेसाई यासह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-----------------------------------

धरणग्रस्तांच्या फुटीचा गैरफायदा अधिकारी व शासनकर्त्यांनी घेतला. मात्र, यापुढे सर्व धरणग्रस्त एकजुटीने लढणार आहोत. धरणग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत लढा सुरूच राहील, असे कॉ. अशोक जाधव यांनी जाहीर केले.

--------------------------------

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी दहा वेळा अटक झाली तरी तुरुंगात जायची तयारी आहे. ५१ वर्षांत दाढी राखली नाही, पण तुरुंगातील १६ दिवसांत दाढी केली नाही. धरणग्रस्तांना भीती वाटू नये. लढण्याची प्रेरणा मिळण्यासाठी दाढी राखल्याचे आंबेओहोळ धरणग्रस्त कॉ. शिवाजी गुरव यांनी सांगितले.

* फोटो ओळी : चाफवडे (ता. आजरा) येथे उचंगी धरणग्रस्तांच्या परिषदेत माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी धरणग्रस्तांना मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, अशोक जाधव, संजय तर्डेकर, आदी उपस्थित होते.

क्रमांक : २९१२२०२०-गड-१५