शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

दिवसाआड पाणीपुरवठा आॅगस्टपर्यंत कायम

By admin | Updated: July 3, 2016 00:48 IST

महापालिकेचे यशस्वी नियोजन : तीन महिन्यांत एकही तक्रार नाही

कोल्हापूर : यंदा राधानगरी धरणातील संपलेले पाणी आणि भविष्यात साठणारे पाणी यांचा विचार करता महापालिकेने कोल्हापूर शहरासाठी ‘एक दिवसाआड’पाणी पुरवठा आॅगस्टपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांतील या नियोजनाचा अनुभव चांगला आहे. शहरात पाणीपुरवठा सुरळीत राहिला. त्याबद्दल कोणतीही तक्रार आलेली नाही; त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनी हातभार लावला आहे. टंचाईच्या काळातही प्रशासनाने समयसूचकतेने योग्य नियोजन केल्यामुळे एप्रिलपासून आजपर्यंत रोज किमान सुमारे ४० एमएलडी पाणीबचत करण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यश आले. गेल्यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे त्याचा परिणाम धरणे उशिरा व कमी भरण्यामध्ये झाला. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. एकेकाळी शहराला पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव यंदा पूर्णपणे प्रथमच आटला. त्यामुळे तलावातील गाळ उपसा करून पाण्याची खोली जास्तीत जास्त निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न झाला. दुष्काळाची झळ कोल्हापूर शहरालाही प्रथमच बसली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राधानगरी धरणातील पाणीसाठाही कमी होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. पुढे राधानगरी धरणाने तळ गाठलाच; त्यामुळे १ जूननंतर तुळशी धरणाचा आधार महापालिकेला प्रथमच घ्यावा लागला; पण भविष्यात उद्भवणारी परिस्थिती विचारात घेऊन पाणीपुरवठा प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने तशी पाणीटंचाईची झळ शहराला बसली नाही. दिवसाआड पाण्याचे नियोजन शहरवासीयांनीही अंगीकृत केले. त्यातून तक्रार उद्भवली नाही. दिवसाआड नियोजनामध्ये प्रतिदिनी किमान ८० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा पुरेसा असल्याने हेच ‘दिवसाआड’ पाण्याचे नियोजन आॅगस्टअखेर ठेवून त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) रोज ८० एमएलडी उपसा : आतापर्र्यंत ४० एमएलडी पाण्याची बचत शहराला रोज पाणीपुरवठा सुरू असताना शिंगणापूर आणि बालिंगा येथील उपसा पंपांतून सुमारे १२० एमएलडी पाणीउपसा रोज करण्यात येत होता; पण दिवसाआड नियोजनानंतर रोज सुमारे ८० एमएलडी पाणीउपसा होऊन सुमारे ४० एमएलडी पाण्याची बचत होत गेली. पाण्यासाठी आंदोलने गायब गेल्या तीन वर्षांत पाण्यासाठी अवघी तीनच आंदोलने झाली. बापट कॅम्प, कसबा बावडा आणि मोरेवाडीनजीक अशा तीनच ठिकाणी पाण्यासाठी रास्ता रोको झाले. याशिवाय आॅनलाईन तक्रारीमध्ये कसबा बावडा येथील एका महिलेने तिसऱ्या मजल्यावर पाणी चढण्याइतके जादा दाबाने पाणी येत नसल्याची तक्रार सहा महिन्यांपूर्वी केली होती. याशिवाय पाण्यासाठीची आंदोलने लुप्त झाली आहेत. गेल्या तीन महिन्यांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना पाणीपुरवठ्याबाबत एकही तक्रार आलेली नाही. याचाच अर्थ सुमारे ८० एमएलडी पाणी शहरासाठी पुरेसे आहे. पाणीपुरवठा विभागाचे योग्य नियोजन व लोकांचे सहकार्य यामुळे टंचाई स्थितीतही पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य झाले. - मनिष पवार, जलअभियंता, महापालिका कोल्हापूर. एक दिवसाआड पुरवठ्यामुळे पाणी पुरवून वापरण्याची सवय लागली. ही व्यवस्था कायम चालू ठेवावी. पाणी बचतीचा हा चांगला मार्ग आहे. राज्यात अनेक शहरांत आठ दिवसांतून एकदा पाणी येते. आपण कोल्हापूरकर त्या तुलनेत भाग्यवान आहोत. पुरेसे पाणी मिळत असल्याने व्यवस्था बदलण्याची गरज नाही. - किरण भोसले, निवृत्त उपसंचालक, अल्पबचत.