शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाआड पाणीपुरवठा आॅगस्टपर्यंत कायम

By admin | Updated: July 3, 2016 00:48 IST

महापालिकेचे यशस्वी नियोजन : तीन महिन्यांत एकही तक्रार नाही

कोल्हापूर : यंदा राधानगरी धरणातील संपलेले पाणी आणि भविष्यात साठणारे पाणी यांचा विचार करता महापालिकेने कोल्हापूर शहरासाठी ‘एक दिवसाआड’पाणी पुरवठा आॅगस्टपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांतील या नियोजनाचा अनुभव चांगला आहे. शहरात पाणीपुरवठा सुरळीत राहिला. त्याबद्दल कोणतीही तक्रार आलेली नाही; त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांनी हातभार लावला आहे. टंचाईच्या काळातही प्रशासनाने समयसूचकतेने योग्य नियोजन केल्यामुळे एप्रिलपासून आजपर्यंत रोज किमान सुमारे ४० एमएलडी पाणीबचत करण्यात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला यश आले. गेल्यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे त्याचा परिणाम धरणे उशिरा व कमी भरण्यामध्ये झाला. परिणामी शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. एकेकाळी शहराला पाणीपुरवठा करणारा कळंबा तलाव यंदा पूर्णपणे प्रथमच आटला. त्यामुळे तलावातील गाळ उपसा करून पाण्याची खोली जास्तीत जास्त निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न झाला. दुष्काळाची झळ कोल्हापूर शहरालाही प्रथमच बसली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राधानगरी धरणातील पाणीसाठाही कमी होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. पुढे राधानगरी धरणाने तळ गाठलाच; त्यामुळे १ जूननंतर तुळशी धरणाचा आधार महापालिकेला प्रथमच घ्यावा लागला; पण भविष्यात उद्भवणारी परिस्थिती विचारात घेऊन पाणीपुरवठा प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने तशी पाणीटंचाईची झळ शहराला बसली नाही. दिवसाआड पाण्याचे नियोजन शहरवासीयांनीही अंगीकृत केले. त्यातून तक्रार उद्भवली नाही. दिवसाआड नियोजनामध्ये प्रतिदिनी किमान ८० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा पुरेसा असल्याने हेच ‘दिवसाआड’ पाण्याचे नियोजन आॅगस्टअखेर ठेवून त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) रोज ८० एमएलडी उपसा : आतापर्र्यंत ४० एमएलडी पाण्याची बचत शहराला रोज पाणीपुरवठा सुरू असताना शिंगणापूर आणि बालिंगा येथील उपसा पंपांतून सुमारे १२० एमएलडी पाणीउपसा रोज करण्यात येत होता; पण दिवसाआड नियोजनानंतर रोज सुमारे ८० एमएलडी पाणीउपसा होऊन सुमारे ४० एमएलडी पाण्याची बचत होत गेली. पाण्यासाठी आंदोलने गायब गेल्या तीन वर्षांत पाण्यासाठी अवघी तीनच आंदोलने झाली. बापट कॅम्प, कसबा बावडा आणि मोरेवाडीनजीक अशा तीनच ठिकाणी पाण्यासाठी रास्ता रोको झाले. याशिवाय आॅनलाईन तक्रारीमध्ये कसबा बावडा येथील एका महिलेने तिसऱ्या मजल्यावर पाणी चढण्याइतके जादा दाबाने पाणी येत नसल्याची तक्रार सहा महिन्यांपूर्वी केली होती. याशिवाय पाण्यासाठीची आंदोलने लुप्त झाली आहेत. गेल्या तीन महिन्यांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना पाणीपुरवठ्याबाबत एकही तक्रार आलेली नाही. याचाच अर्थ सुमारे ८० एमएलडी पाणी शहरासाठी पुरेसे आहे. पाणीपुरवठा विभागाचे योग्य नियोजन व लोकांचे सहकार्य यामुळे टंचाई स्थितीतही पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य झाले. - मनिष पवार, जलअभियंता, महापालिका कोल्हापूर. एक दिवसाआड पुरवठ्यामुळे पाणी पुरवून वापरण्याची सवय लागली. ही व्यवस्था कायम चालू ठेवावी. पाणी बचतीचा हा चांगला मार्ग आहे. राज्यात अनेक शहरांत आठ दिवसांतून एकदा पाणी येते. आपण कोल्हापूरकर त्या तुलनेत भाग्यवान आहोत. पुरेसे पाणी मिळत असल्याने व्यवस्था बदलण्याची गरज नाही. - किरण भोसले, निवृत्त उपसंचालक, अल्पबचत.