शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

'महसूल'ची दादागिरी अमान्य

By admin | Updated: February 10, 2016 00:55 IST

हसन मुश्रीफ : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कागलमध्ये भीक मांगो आंदोलन

कागल : राज्यातील भाजप सरकार वेगवेगळ्या करांची व दंड आकारणी करून समाजातील कष्टकरी घटकांना आर्थिक त्रास देत पैसे गोळा करीत आहे. या शासनाला भीक लागल्याने ते गोरगरिबांच्या सेवासुविधा एकीकडे बंद करीत आहे, तर दुसरीकडे ठरवून पैसे वसुली करीत आहे, याचा निषेध करण्यासाठी आम्ही भीक मांगो आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेद्वारे सामान्य लोकांवर सुरू केलेली दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. प्रशासनाची वसुलीची ही दादागिरी मुळासकट उपटून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिला.राष्ट्रवादी काँग्रेस कागल तालुक्याच्यावतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले. गैबी चौकातून बसस्थानकमार्गे मोर्चाने भीक मागत आंदोलक येथील तहसील कार्यालयासमोर आले. याप्रसंगी मुश्रीफ बोलत होते. भीक मागून आणलेल्या रकमेची खोकी नायब तहसीलदार सरस्वती पाटील व शिवाजीराव गवळी यांच्याकडे दिली. दरम्यान, मंगळवारी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा देत कागलमध्ये व्यापाऱ्यांनीही कडकडीत बंद पाळला.मुश्रीफ म्हणाले, गेली दोन महिने भाजप शासन आर्थिक आघाडीवर डळमळत आहे. निराधार, अंगणवाडी सेविका, इतर घटकांबरोबरच नोकरांचे पगार वेळेवर देऊ शकत नसल्याने महसूल विभागामार्फत टार्गेट देऊन पैसे गोळा केले जात आहेत. कागल तालुक्याला पाच कोटींचे उद्दिष्ट आहे. यासाठी महसूल कर्मचारी यांच्याकडून वाळू, दगड, खडी काढणारे, बांधकाम करणारे यांना रात्री-अपरात्री पकडून दंड वसूल केला जात आहे. अकृषक कराच्या नावाखाली व्यापाऱ्यांवरही दंड आकारला जात आहे. म्हणून कागल बंद ठेवून हे आंदोलन केले. हा प्रकार त्वरित थांबावा; अन्यथा जनतेत उद्रेक होईल, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, जिल्हा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, प्रकाश गाडेकर, शिवानंद माळी, संजय हेगडे यांची भाषणे झाली. आंदोलनात नगराध्यक्ष संगीता गाडेकर, प्रदीप पाटील-भुयेकर, बळवंतराव माने, प्रवीण भोसले, विकास पाटील, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)कागल बंदला प्रतिसादव्यापारी वर्गाला अकृषक कराची आकारणी सुरू केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी पुकारण्यात आलेल्या कागल बंदला उत्स्फू र्त प्रतिसाद लाभला. सकाळपासून दुकाने उघडली नाहीत. मात्र एस.टी., शाळा, महाविद्यालये, दवाखाने सुरू होते.चाकांची हवा सोडापोलिसांनी नोटीस देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी तर प्रांत, तहसीलदार यांच्यावर वसुलीसाठी दबाव आणत आहेत. यापुढे जर कारवाईसाठी असे पथक आले तर त्यांच्या गाडीच्या चाकांची हवा सोडून गांधीगिरी मार्गाने आंदोलन करा. मारहाण, शिवीगाळ करू नका, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.