शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा बुधवारी दीक्षांत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST

कसबा बावडा : येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ९वा दीक्षांत समारंभ बुधवारी (दि. १७) हॉटेल सयाजी येथील ...

कसबा बावडा : येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ९वा दीक्षांत समारंभ बुधवारी (दि. १७) हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरिया सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. संजय डी. पाटील असणार आहेत. यावेळी अभिनेते आर. माधवन, साहित्यिक प्रा. कुन्तीनाथ करके यांना डी.लिट. व एअर मार्शल अजित शंकरराव भोसले यांना डी.एस्सी. पदवीने सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. राकेशकुमार मुदगल यांनी दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, उपकुलसचिव संजय जाधव, परीक्षा नियंत्रक अरुण पोवार, आदी उपस्थित होते. डॉ. मुदगल म्हणाले, नवव्या दीक्षांत समारंभात एकूण ३६१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी नऊ विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने, तर दोन विद्यार्थ्यांना एक्सलन्स ऑफ रिसर्च म्हणून सन्मानित केले जाणार आहे.

चौकट:.... दीक्षांत समारंभात डी.लिट. पदवीने सन्मानित केले जाणारे रंगनाथन माधवन हे फिल्म इंडस्ट्री व समाजसेवा क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिनेता, लेखक आणि चित्रपट निर्माते आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिक्षण घेताना त्यांनी सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळविली. त्यांच्या ‘रंग दे बसंत’, ‘गुरू’ आणि ‘थ्री इडियट्स’ या तीन चित्रपटांनी प्रचंड यश मिळविले.

२)चौकट:.....

डी.एस्सी. पदवीने सन्मानित केले जाणारे भारतीय वायुसेनेचे निवृत्त एअर मार्शल अजित शंकरराव भोसले कोल्हापुरातील बस्तवडे गावात शेतकरी कुटुंबातले. त्यांनी नाशिकच्या भोसले मिलिटरी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि १९७३ मध्ये ते पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये दाखल झाले. एम.एस्सी., एमबीए आणि एम.फिल पदवी घेतलेल्या भोसले यांनी टोकियोमध्ये जपानी सशस्त्र दलात एक वर्षाचे प्रशिक्षणही घेतले आहे. सियाचीन व श्रीलंका मोहीम आणि कारगिल युद्धात त्यांनी भाग घेतला आहे. ३)चौकट:... डिलीटने सन्मानित केले जाणारे कुन्तिनाथ देवेंद्र करके-पाटील हे डॉ. बापूजी साळुंखे यांचे विद्यार्थी आहेत. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत त्यांनी मुख्याध्यापक ते प्राचार्य म्हणून काम केले. पाजर, चैत्रपालवी, कांचन कुंभ, जलधारा असे साहित्य त्यांचे प्रसिद्ध आहे. औंदा लगीन करायचं, बोला दाजीबा, सख्या सजना, सुळावरची पोळी, सोंगाड्या, आदी चित्रपटातील गीते त्यांनी लिहिली आहेत. दूरदर्शनवर त्यांचे लोकसंगीताचे अनेक कार्यक्रम झाले आहेत.

फोटो... एअर मार्शल अजित शंकरराव भोसले, डॉ. विजय खोले, रंगनाथन माधवन, प्रा. कान्तीनाथ कुरके.