शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिव्या शाप देणे, चिखलफेक करणे बरे नव्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राजू शेट्टीसारख्या जबाबदार नेत्याला अशाप्रकारची वक्तव्य शोभत नाही, दुसऱ्यांना शिव्या शाप देणे, चिखलफेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राजू शेट्टीसारख्या जबाबदार नेत्याला अशाप्रकारची वक्तव्य शोभत नाही, दुसऱ्यांना शिव्या शाप देणे, चिखलफेक करणे व नाहक आरोप करणे बरे नव्हे, जनतेच्या आशीर्वादाने आपण लाभार्थी झाल्याचा असा पलटवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राजू शेट्टी यांच्यावर केला.

‘स्वाभिमानी’च्या आक्रोश मोर्चात, ‘हसन मुश्रीफ माझ्या नादाला लागू नका, महागात पडेल’ असा इशारा शेट्टी यांनी दिला होता. त्याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, महापुरातील नुकसानीचे ‘एसडीआरएफ’ निकषांनुसार प्राथमिक नुकसानभरपाईचा निर्णय झाला आहे. अंतिम निर्णय अद्याप नाही. पाणी गेलेल्या घरमालकांच्या खात्यावर दहा हजारांप्रमाणे पैसे जमा होत आहेत. पिकांच्या पंचनामे अंतिम टप्प्यात असताना शेट्टी यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. निर्णय झालेला नाही, त्यामुळे मोर्चा काढू नका, असे आपण व पालकमंत्री सतेज पाटील यांनी विनंती केली होती तरीही मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, अलीकडे त्यांच्या वक्तव्यांवरुन त्यांनी दिशा बदलल्याचे दिसते, असे सांगितले. गेली ३०-३५ वर्षे आपण सामाजिक कार्यकर्ता आहे, लोकांची सेवा करत जनतेच्या आशीर्वादाने लाभार्थी झालो. जिल्ह्यात पक्षातील एकालाच मंत्रिपद मिळते, ज्याप्रमाणे ‘स्वाभिमानी’मधून केवळ शेट्टीच आमदार, खासदार झाले. प्रतिमा बनवण्यासाठी आम्हाला अनेक वर्षे खर्ची घालावी लागली, वक्तव्ये करताना कोणाचा अपमान होणार नाही, मने दुखावणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. राजकारणात चढ-उतार येत असतात. मात्र, दुसऱ्याला शिव्या-शाप देऊन परिस्थिती बदलत नसते.