शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

कोरोनावर मात करायची असेल तर कर्फ्यू लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाला खरोखरच जर कोरोनावर मात करायची असेल तर तात्पुरत्या आणि ...

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाला खरोखरच जर कोरोनावर मात करायची असेल तर तात्पुरत्या आणि अर्धवट उपाययोजना करण्यापेक्षा सरळ महाराष्ट्र राज्यात आठ दिवस कर्फ्यू जाहीर करावा, अशी मागणी येथील महाद्वार रस्ता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शाम जोशी यांनी केली आहे.

ते म्हणाले, शासनाने अत्यावश्यक सेवा सोडून अन्य दुकानदारांवर निर्बंध घातले तरी रस्त्यावरील गर्दी अजिबात कमी झालेली नाही. पाच दिवस चारपर्यंत दुकाने उघडी ठेवायला परवानगी आणि शनिवारी, रविवारी बंदी यामुळे कोरोना संपणार नाही. उलट पुढच्या सणासुदीच्या दिवसात जर दुकाने बंद ठेवायची नसतील तर आताच संपूर्ण महाराष्ट्रात आठ दिवसांचा कर्फ्यू जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता फक्त इतर व्यापाऱ्यांवर बंदी आणून शासन यामध्ये यशस्वी होणार नाही. म्हणून सरसकट सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, नाही तर सर्व शासनाचे कर माफ करावेत, अशीही त्यांनी व्यापाऱ्यांच्यावतीने मागणी केली आहे.

चौकट

कोरोनासोबत जगू; पण उपाशी मरणार नाही

व्यापारीच कोरोना वाढवत आहेत असा शासनाने समज करून घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत शासनाने योग्य निर्णय घेऊन व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. ही शासनाची जबाबदारी आहे. दुकाने बंद करून चालणार नाहीत. तर लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून कोरोनाला पायबंद घालणे ही शासनाची जबाबदारी आहे. एकवेळ आम्ही कोरोनासोबत जगू; परंतु उपाशी मरणार नाही, अशी आता व्यापाऱ्यांची भावना झाली आहे, असे जोशी यांनी सांगितले.