शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
4
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
5
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
7
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
8
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
9
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
10
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
11
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
12
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
13
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
14
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
15
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
16
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
17
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
18
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
19
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
20
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर

कोरोनावर मात करायची असेल तर कर्फ्यू लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:17 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाला खरोखरच जर कोरोनावर मात करायची असेल तर तात्पुरत्या आणि ...

कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाला खरोखरच जर कोरोनावर मात करायची असेल तर तात्पुरत्या आणि अर्धवट उपाययोजना करण्यापेक्षा सरळ महाराष्ट्र राज्यात आठ दिवस कर्फ्यू जाहीर करावा, अशी मागणी येथील महाद्वार रस्ता व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शाम जोशी यांनी केली आहे.

ते म्हणाले, शासनाने अत्यावश्यक सेवा सोडून अन्य दुकानदारांवर निर्बंध घातले तरी रस्त्यावरील गर्दी अजिबात कमी झालेली नाही. पाच दिवस चारपर्यंत दुकाने उघडी ठेवायला परवानगी आणि शनिवारी, रविवारी बंदी यामुळे कोरोना संपणार नाही. उलट पुढच्या सणासुदीच्या दिवसात जर दुकाने बंद ठेवायची नसतील तर आताच संपूर्ण महाराष्ट्रात आठ दिवसांचा कर्फ्यू जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता फक्त इतर व्यापाऱ्यांवर बंदी आणून शासन यामध्ये यशस्वी होणार नाही. म्हणून सरसकट सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, नाही तर सर्व शासनाचे कर माफ करावेत, अशीही त्यांनी व्यापाऱ्यांच्यावतीने मागणी केली आहे.

चौकट

कोरोनासोबत जगू; पण उपाशी मरणार नाही

व्यापारीच कोरोना वाढवत आहेत असा शासनाने समज करून घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत शासनाने योग्य निर्णय घेऊन व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. ही शासनाची जबाबदारी आहे. दुकाने बंद करून चालणार नाहीत. तर लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून कोरोनाला पायबंद घालणे ही शासनाची जबाबदारी आहे. एकवेळ आम्ही कोरोनासोबत जगू; परंतु उपाशी मरणार नाही, अशी आता व्यापाऱ्यांची भावना झाली आहे, असे जोशी यांनी सांगितले.